AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explainer : 1952 नंतरची सर्वात दीर्घ निवडणूक, लोकसभा निवडणुकीत 4 आकडा महत्वाचा का?

देशातील ती पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे देशात अनेक समस्या होत्या. कर्मचारी संख्या, मतदार संख्या, मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक मनुष्यबळ तसेच हवामाना यासह इतर अनेक आव्हाने निवडणूक आयोगासमोर होती.

Explainer : 1952 नंतरची सर्वात दीर्घ निवडणूक, लोकसभा निवडणुकीत 4 आकडा महत्वाचा का?
LOKSABHA ELECTIONImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Mar 22, 2024 | 9:35 PM
Share

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने 18 व्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. निवडणुकीच्या घोषित झालेल्या या तारखा म्हणजे एक प्रकारे राजकीय युद्धच आहे. इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए असा हा सामना होणार आहे. 18 व्या लोकसभेच्या स्थापनेसाठी देशात 7 टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिला टप्पा 19 एप्रिल रोजी सुरू होईल. तर 1 जून रोजी सातव्या टप्प्यात निवडणुका समाप्त होतील. तर निकाल 4 जून रोजी लागणार आहे. एकूण 44 दिवसांच्या कालावधीत या निवडणुका होणार आहेत. देशात 1952 नंतरची ही सर्वात दीर्घ निवडणूक असणार आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत 4 हा आकडा महत्वाचा ठरत आहे असे दिसून येते.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. मात्र, सर्वांचे लक्ष वेधून घेणारी बाब होती ती म्हणजे मतदानाचा कालावधी. हा तब्बल 44 दिवस इतका आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर देशात पहिली सार्वत्रिक निवडणूक 1952 मध्ये झाली. या पहिल्याच निवडणुकीची मतदान प्रक्रिया 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 पर्यंत अशी तब्बल 4 महिने चालली होती.

देशातील ती पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे देशात अनेक समस्या होत्या. कर्मचारी संख्या, मतदार संख्या, मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक मनुष्यबळ तसेच हवामाना यासह इतर अनेक आव्हाने निवडणूक आयोगासमोर होती. त्यामुळे मतदानाला इतका वेळ लागला होता.

पहिल्या लोकसभा निवडणुकीनंतर या प्रक्रियेत बदल होत गेले. त्यामुळे नंतर नंतर ही प्रक्रिया लहान कालावधीत घेण्यात आली. 1980 मध्ये झालेल्या निवडणुकांनी तर विक्रम प्रस्थापित केला होता. 1980 मध्ये फक्त 4 दिवसात लोकसभा निवडणुका पार पडल्या होत्या.

पहिल्या निवडणुकीनंतर जवळपास सर्वच निवडणुका कमी कालावधीत झाल्या. परंतु, गेल्या दोन दशकांपासून त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. 2004 पासून निवडणुकीचा कालावधी दुपटीने वाढला आहे. 2004 मध्ये लोकसभा निवडणूक प्रक्रिया 21 दिवसांत पार पडली. त्यानंतर 2009 मध्ये ही प्रक्रिया 28 दिवस सुरू होती.

2014 मध्ये 36 दिवस आणि 2019 मध्ये 43 दिवस मतदान प्रक्रिया सुरु होती. यावेळी 2024 मध्ये हा कालावधी वाढून 44 दिवसांचा झाला आहे. त्यामुळे 1952 नंतरची ही सर्वात मोठी निवडणूक ठरली आहे. आताची निवडणूक लांबणीवर पडण्याची अनेक कारणे निवडणूक आयोगाने दिली आहेत. सार्वजनिक सुट्ट्या, राज्यात येणारे प्रमुख सण, परीक्षा वेळापत्रक हे सर्व लक्षात घेऊन निवडणुकांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे असे निवडणूक आयोगाचे म्हटले आहे.

Follow Us
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा