AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेन्शन योजनेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ मोठा निकाल; कर्मचाऱ्यांना होणार फायदा

सर्वोच्च न्यायालयाने मात्र 2014 ची सुधारित पेन्शन योजना वैध ठरवली. परंतु 15 हजार रुपयांच्या मासिक वेतनाची कमाल मर्यादा हटवत कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

पेन्शन योजनेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला 'हा' मोठा निकाल; कर्मचाऱ्यांना होणार फायदा
पेन्शन योजनेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकालImage Credit source: tv9 marathi
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Nov 04, 2022 | 8:43 PM
Share

नवी दिल्ली : सरकारी तसेच खाजगी कंपन्यांमध्ये सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचार करत सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा निकाल दिला आहे. केंद्र सरकारने 2014 मध्ये कर्मचारी पेन्शन योजनेमध्ये सुधारणा करीत मासिक पगाराची मर्यादा 15 हजार रुपये एवढी आखून दिली होती. या मर्यादेमुळे देशभरातील मोठ्या प्रमाणावर कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ करण्यापासून वंचित राहणार होते. या पार्श्वभूमीवर अनेक कर्मचारी संघटनांनी विविध उच्च न्यायालयांमध्ये दाद मागितली होती. त्यावर उच्च न्यायालयांनी योजनाच रद्दबातल ठरवली होती. सर्वोच्च न्यायालयाने मात्र 2014 ची सुधारित पेन्शन योजना वैध ठरवली. परंतु 15 हजार रुपयांच्या मासिक वेतनाची कमाल मर्यादा हटवत कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

कर्मचाऱ्यांना वाढीव सहा महिन्यांची मुदत

सर्वोच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना पगाराची मर्यादा हटवताना पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी वाढीव सहा महिन्यांची मुदत देखील दिली आहे. देशभरातील मोठ्या प्रमाणावर कर्मचारी हे पेन्शन योजनेबाबत स्पष्टता नसल्यामुळे या योजनेत सहभागी होऊ शकलेले नाही. अशा कर्मचाऱ्यांना पुढील सहा महिन्यांमध्ये पेन्शनसाठी आपली नोंदणी करता येणार आहे.

दिल्ली, केरळ आणि राजस्थान या उच्च न्यायालयांनी 2014 ची सुधारित कर्मचारी पेन्शन योजना रद्दबातल ठरवली होती. त्या निर्णयांमुळे मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांमध्ये योजनेबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

योजनेच्या अस्पष्टतेमुळे बरेच कर्मचारी पेन्शन योजनेमध्ये नोंदणी करू शकले नाहीत. ही वस्तुस्थिती विचारात घेत न्यायालयाने वाढीव सहा महिन्यांची मुदत दिली आहे.

केंद्र सरकार आणि भविष्यनिर्वाह निधी संघटनेने दाखल केले होते अपील

उच्च न्यायालयांच्या निकालांना केंद्र सरकार आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सरकारच्या या अपीलांवर शुक्रवारी सरन्यायाधीश उदय लळीत, न्यायमूर्ती सुधांशु धुलिया आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

या खंडपीठाने 2014 ची सुधारित कर्मचारी पेन्शन योजना कायदेशीर आणि वैध ठरवली. मात्र कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचार करीत मासिक वेतनाची(मूळ वेतन आणि महागाई भत्ता यांचा समावेश) कमाल 15 हजारांची मर्यादा हटवली आहे.

सरकारने 2014 मध्ये पेन्शन योजनेत सुधारणा करण्यापूर्वी कमाल वेतन मर्यादा साडेसहा हजार रुपये निश्चित करण्यात आली होती.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं