AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसचं ठरलं..! आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसने शड्डू ठोकला…

नियुक्त केलेले राज्यपाल ओबीसींच्या आरक्षणात वाढ करण्याची जी फाईल आहे ती थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सर्व विषय घेऊन 2024 ची निवडणूक लढवण्याची काँग्रेसची तयारी असल्याचेही सांगण्यात आले आहे.

काँग्रेसचं ठरलं..! आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसने शड्डू ठोकला...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jun 15, 2023 | 10:43 PM
Share

नवी दिल्ली : आगामी काळातील निवडणुकांना अजून बराच अवधी आहे, तरीही देशातील राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच कर्नाटकात काँग्रेसने विजयावर आपली मोहर उमटवली असल्याने आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसने ओबीसींच्या मुद्यावरून शड्डू ठोकला आहे. 2024 च्या निवडणुकीपूर्वी ओबीसींच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपमधील राजकीय लढाई अधिक रंजक बनली आहे. भाजपने केलेल्या या हल्ल्यानंतर काँग्रेसने आता भाजपला ओबीसीविरोधी ठरवले आहे. त्यातच काँग्रेसकडून सातत्याने जातीनुसार जनगणना करण्याची मागणीही केली आहे.

त्यासोबतच आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांवरून वाढवण्याची मागणी करून भाजपला गोत्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक लढवण्साठी आता या पक्षांनी जोरदारपणे कंबर कसली आहे.

काँग्रेसची अश्वासनं

येणाऱ्या निवडणुकीसाठी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून आता राष्ट्रीय ओबीसी अधिवेशन भरवण्याची तयारी केली जात आहे. तर दुसरीकडे राज्यातील ओबीसींच्या मागण्यांची यादी प्रत्येक राज्यातील ओबीसी विभागाकडून मागविण्यात आली असून, काँग्रेसने दिलेली अश्वासने आहेत, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

त्याचबरोबर क्रिमी लेयरची मर्यादाही 8 लाखांवरून वाढवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तर काँग्रेसकडून केंद्र सरकारकडे ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाची मागणी करत आहे.

भाजप ओबीसीविरोधी

काँग्रेसकडून आता आगामी निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी त्यांच्या चार ओबीसींपैकी तीन मुख्यमंत्र्यांकडे देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर भाजपला ओबीसीविरोधी बनवण्याचा काँग्रेसचा सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे.

त्यासाठी झारखंड आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या राज्य सरकारने ओबीसी आरक्षण 14 टक्क्यांवरून 27 टक्के केले आहे मात्र तो निर्णय आता राज्यपालांनी थांबवला आहे.

फाईल  थांबवण्याचा प्रयत्न

या प्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते आणि झारखंड काँग्रेसचे माजी अध्यक्षांनी सांगितले की, भाजपच्या लोकांना जात जनगणना नको आहे. त्यामुळे त्यांनी नियुक्त केलेले राज्यपाल ओबीसींच्या आरक्षणात वाढ करण्याची जी फाईल आहे ती थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सर्व विषय घेऊन 2024 ची निवडणूक लढवण्याची काँग्रेसची तयारी असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे ओबीसीचा मुद्दा हा आगामी काळातील निवडणुकीसाठी मोठी भूमिका बजावणारा ठरणारा आहे.

Follow Us
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
PM Modi | भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना म्हणाले, निराशा पसरवू नका...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
OBC Morcha | ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात आंदोलक आक्रमक; मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम! 75 वर्षीय आजींच्या धैर्याची कहाणी थक्क करणारी
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत सर्वच महागलं
भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...
Sanjay Raut | भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर घणाघाती हल्ला
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा
फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन्....
Video | फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन् प्रशासकीय छळाच्या आरोपांनी प्रकरणाला नवं वळण!
जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
Manoj Jarange Health Issues | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद