Rain : मराठवाड्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, उर्वरित राज्यात कसे राहणार चित्र?

राज्यात पावसाचे आगमन झाल्यापासून कोकणावर कृपादृष्टी राहिलेली आहे. आगामी काळातही या कोकणपट्ट्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, पाळघर, रायगडमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसणार आहे. तर दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस बरसणार आहे.

Rain : मराठवाड्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, उर्वरित राज्यात कसे राहणार चित्र?
मराठवाड्यात मेघगर्जनेसह तर उर्वरित राज्यातही पाऊस सक्रीय होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 9:26 AM

मुंबई : जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच (Monsoon) मान्सून आपले रुपडे बदलणार असल्याचा अंदाज आहे. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही मान्सूनच्या शाखा सक्रीय होत असल्याने मंगळवारपासून (Marathwada) मराठवाड्यात तर मेघगर्जनेसह पावसाला सुरवात होणार आहे तर कोकणात अति मुसळधार पावसाचा इशारा (Meteorological Department) हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे जे जूनमध्ये घडले नाही ते या महिन्यात होईल का असा प्रश्न आहे. आतापर्यंत सबंध राज्यात समप्रमाणात पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पण आता या महिन्यात किमान सरासरीप्रमाणे पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला जात आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार तर ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

कोकणावर वरुणाराजाची कृपादृष्टी

राज्यात पावसाचे आगमन झाल्यापासून कोकणावर कृपादृष्टी राहिलेली आहे. आगामी काळातही या कोकणपट्ट्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, पाळघर, रायगडमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसणार आहे. तर दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस बरसणार आहे. सुरवातीपासूनच या विभागात पावसाने हजेरी लावल्याने यंदा केवळ कोकणात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झालेला आहे. उर्वरित महाराष्ट्राला पावसाची अपेक्षा कायम आहे.

मध्य महाराष्ट्रात काय राहणार स्थिती?

जून महिन्यात मध्य महाराष्ट्रात देखील मान्सूनने आपला लहरीपणा दाखवलेला आहे. पुणे वगळता इतर जिल्ह्यामध्ये पावसाची अवकृपाच राहिलेली आहे. मात्र, 5 जुलैपासून पुण्यासह सातारा, कोल्हापूरसह घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस राहणार आहे. त्यामुळे राज्यात तुरळक ठिकाणीच पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे कुठे दिलासा तर कुठे चिंता ही कायम होती. पण आता पावसाचा जोर तर वाढणार आहेच शिवाय सर्वत्र हजेरीही लावली जाणार असल्याचा अंदाज आहे.

हे सुद्धा वाचा

मराठवाड्याला मिळणार का दिलासा ?

आतापर्यंत सर्वात कमी पाऊस मराठवाड्यात झाला आहे. या विभागातील 8 जिल्ह्यात सरासरी सोडा खरीप पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊस झाला नाही. पण जुलै महिन्यात या विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेडमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. आता पावसाने हजेरी लावली तरच रखडलेल्या पेरण्या मार्गी लागतील आणि ज्या क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत तेथील पिके बहरतील. अन्यथा शेतकऱ्यांचा पैसा आणि मेहनत दोन्हीही पाण्यात अशीच स्थिती ओढावेल.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.