श्रमजीवी, बुद्धिजीवी ऐकले होते, आता आंदोलनजीवी अशी नवी जमात आलीय: मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत भाषण करताना देशात आंदोलनाच्या नावाखाली गोंधळ घालणाऱ्यांवर जोरदार टीका केली. (Today there is a new class of people called 'andolan jivi' says narendra modi)

श्रमजीवी, बुद्धिजीवी ऐकले होते, आता आंदोलनजीवी अशी नवी जमात आलीय: मोदी
देशातील सर्वात जुन्या पक्षाची आजची अवस्था अत्यंत वाईट आहे. या पक्षाचे खासदार राज्यसभेत एक भूमिका घेतात आणि लोकसभेत दुसरीच भूमिका घेतात
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 12:07 PM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत भाषण करताना देशात आंदोलनाच्या नावाखाली गोंधळ घालणाऱ्यांवर जोरदार टीका केली. आपण या पूर्वी श्रमजीवी, बुद्धिजीवी हे शब्द ऐकले होते. आता आंदोलनजीवी नावाची जमात निर्माण झाली आहे. ही टोळी देशभरात सक्रिय असून या टोळीने उपद्रव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी घणाघाती टीका नरेंद्र मोदी यांनी केली. (Today there is a new class of people called ‘andolan jivi’ says narendra modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी कृषी कायद्यावर आपली भूमिका व्यक्त केली. तसेच देशात काही ठिकाणी आंदोलकांची एक टोळी निर्माण झाल्याचंही त्यांनी हसता हसता सांगितलं. काही बुद्धिजीवी असतात. काही श्रमजीवी असतात. परंतु मागच्या काही काळात आंदोलनजीवी पाहायला मिळत आहेत. देशात कुठेही काहीही झाले तर हे आंदोलनजीवी सर्वात आधी तिथे असतात. कधी पडद्याच्या मागे असतात तर पडद्या पुढे असतात. अशा लोकांना ओळखून आपल्याला त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. हे लोक स्वत: आंदोलन करत नाहीत. त्यांची ती क्षमताही नाही. मात्र, एखादं आंदोलन सुरू असेल तर हे लोक तिथे पोहोचतात. हे आंदोलनजीवी परजीवी आहेत. ते प्रत्येक ठिकाणी मिळतात, अशी शब्दांत उपद्रव निर्माण करणाऱ्यांचा मोदींनी समाचार घेतला.

देशात एक नवा एफडीआय आला

तुमचेही अनेक राज्यात सरकार असेल. तुम्हीही सरकार चालवत असाल. त्यावेळी तुम्हालाही या आंदोलनजीवींचा अनुभव आला असेल. त्यांचा त्रासही जाणवला असेल, असंही ते म्हणाले. आता देशात एक नवा एफडीआय आला आहे. त्याला Foreign destructive ideology म्हणतात. त्यापासून देशाला वाचवणं गरजेचं आहे, असं सांगतानाच आत्मनिर्भर भारत हा कोणत्या सरकारची नव्हे तर देशाची मोहीम आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

डाव्यांवर टीका

यावेळी मोदींनी डाव्यांवर टीका केली. देशात कोणतीही सुधारणा घडवून आणली की ती अमेरिकेच्या इशाऱ्यावरूनच होत असल्याचा डावे नेहमी आरोप करतात. पूर्वी काँग्रेसचं सरकार असताना हे आरोप खूप व्हायचे. आता आमचं सरकार आलं तेव्हाही हेच आरोप होत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

मोदी आहेत, संधी साधा

कोरोनामुळे तुम्ही बरेच दिवस घरात अडकून होता. त्यामुळे तुमचा राग माझ्यावर काढल्याने तुमचं मन हलकं झालं असेल. किमान तुमचा राग घालवण्याच्या कामी मी आलो. हे माझं सौभाग्य आहे. हा आनंद तुम्ही वारंवार घ्यावा आणि मोदी आहे तर ही संधी हमेशा घ्याच, असा चिमटा त्यांनी काढला. (Today there is a new class of people called ‘andolan jivi’ says narendra modi)

संबंधित बातम्या:

शरद पवार सुधारणांच्या बाजूनं, राजकारणासाठी काहींचा यूटर्न; मोदींचा टोला

Narendra Modi Parliament Speech | भाषण संसदेत, डोळा बंगालच्या मतांवर? नरेंद्र मोदी यांच्या भाषणात बंगाल

‘अवसर तेरे लिए खडा है, फिर भी तू चूपचाप पडा है’; मैथिली शरण गुप्त यांच्या कवितेतून मोदींचा संवाद!

(Today there is a new class of people called ‘andolan jivi’ says narendra modi)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.