AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Election: बिहारच्या रणांगणात उतरले भाजपाचे दिग्गज, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली मोठ्या विजयाची भविष्यवाणी

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी भाजपाच्या समर्थनार्थ आज बिहारात जाहीर सभा घेतली, सीतामढी येते उमेदवाराच्या अर्ज भरण्याच्या सभेतही ते सामील झाले. तर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सारण जिल्ह्यात जाहीर सभेला संबोधित केले.

Bihar Election: बिहारच्या रणांगणात उतरले भाजपाचे दिग्गज, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली मोठ्या विजयाची भविष्यवाणी
Union Minister Prahlad Joshi
| Updated on: Oct 17, 2025 | 9:43 PM
Share

बिहारच्या विधानसभा निवडणूकांचा प्रचार टीपेला पोहचला आहे. सर्व पक्ष आता जनतेचा कौल मिळवण्याासाठी मैदानात उतरले होते. अनेक केंद्रीय मंत्री बिहारच्या निवडणूकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. तसेच निवडणूक अर्ज दाखल करताना नेते हजर राहून उमेदवारांसाठी रॅली काढत आहेत. अशाच प्रकारे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी भाजपाच्या उमेदवाराच्या समर्थनासाठी सभा घेत भाषण केले. सीतामढी येथे पार्टीचे उमेदवाराचा अर्ज भरताना केलेल्या सभेत ते सामी झाले. त्यांच्या सोबत राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा देखील सामील झाले. या दरम्यान दोन्ही नेत्यांनी उपस्थित जनसमुदाया समोर भाषण करीत एनडीएच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन केले.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी सभा घेतली आणि प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला. या वेळी जोशी यांनी सांगितले आम्ही आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवू. जनता पीएम मोदी आणि सीएम नितीश कुमार यांच्या नेतृत्वाला मोठ्या संख्येने आपला आशीर्वाद देणार आहे. काँग्रेस आणि आरजेडीची निती छोट्या पक्षांना अनादर करण्याची आहे असेही त्यांनी सांगितले.

येथे व्हिडीओ पाहा –

सारणमध्ये गृहमंत्री अमित शाह यांची जाहीरसभा

दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील सारण जिल्ह्यात जाहीरसभेला संबोधित केले. ते म्हणाले की गेल्या २० वर्षांत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्याला जंगलराजमधून मुक्त केले आहे. या विधानसभा निवडणूकीत एनडीए ऐतिहासिक जनादेशांसह पुन्हा सरकार स्थापन करेल. सारण लोकनायक जयप्रकाश नारायण आणि भिखारी ठाकूर यांनी कर्मभूमी राहीली आहे. ही ती भूमी देखील आहे जेथे लोकांना लालूराबडीच्या जंगलराजची देखील आठवण देऊ शकते.

येथे पाहा पोस्ट –

बिहारचे लोक यंदा चौथी दिवाळी साजरी करणार

अमित शाह यांनी सांगितले की बिहारचे लोक यंदा चार वेळा दिवाळी साजरे करणार आहेत. एक पारंपारिक, दुसरी जेव्हा सरकारने जीविका दिदींच्या खात्यात १० हजार रुपये पाठवले, तिसरी जेव्हा सरकारने जीएसटी घटवला आणि चौथी दिवाळी १४ नोव्हेंबर रोजी होईल जेव्हा निकाल जाहीर होतील. यावेळी शाह यांनी केंद्र सरकारच्या योजनांचीही माहिती दिली. अमित शाह म्हणाले की मोदींनी अयोध्येत राम मंदिराची पुनर्निमाण केला. कलम ३७० हटवले.

असले लोक बिहारची सुरक्षा करु शकत नाहीत

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात अतिरेकी देशात रक्ताची होळी खेळत होते. परंतू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगामच्या हल्ल्यानंतर पीओकेच्या अतिरेकी अड्ड्यांना उद्ववस्थ केले. अमित शाह यांनी यावेळी शहाबुद्दीनच्या मुलाचाही उल्लेख केला. ते म्हणाले की आरजेडीच्या यादीत डॉन राहिलेल्या शहाबुद्दीनच्या मुलाचे देखील नाव आहे. असे लोक बिहारची सुरक्षा करु शकत नाहीत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...