AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

योगी सरकारनं अयोध्या विमानतळाचं नाव बदललं, ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम’ असं नामकरण

उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने अयोध्यात तयार होणाऱ्या विमानतळाचं नाव बदललं आहे. आता या विमानतळाचं नाव 'मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ' असं असणार आहे.

योगी सरकारनं अयोध्या विमानतळाचं नाव बदललं, ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम’ असं नामकरण
| Updated on: Nov 24, 2020 | 10:35 PM
Share

लखनौ : उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने अयोध्यात तयार होणाऱ्या विमानतळाचं नाव बदललं आहे. आता या विमानतळाचं नाव ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ’ असं असणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या (24 नोव्हेंबर) कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. या विमानतळाचं काम सुरु असून पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे (Uttar Pradesh cabinet rename the Ayodhya airport as Maryada Purushottam Sriram airport).

अयोध्येतील हे विमानतळ उत्तर प्रदेशमधील पाचवं आंतरराष्ट्रीय विमानतळ असणार आहे. बुद्धांची जडणघडणीत महत्त्वाचं स्थान असलेल्या कुशीनगर आणि जेवरमध्ये देखील अशाचप्रकारे आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार होत आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने लव जिहादविरोधातही (Love Jihad) अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशाचं नाव ‘बेकायदेशीर धर्मांतरण अध्यादेश 2020’ असं आहे. योगी सरकारच्या कॅबिनेटने आज (24 नोव्हेंबर) झालेल्या बैठकीत लव जिहादसह 21 प्रस्तावांना मंजूरी दिली आहे. या नव्या कायद्यात लव जिहाद प्रकरणांमध्ये पीडितेला आर्थिक मदतीची आणि दोषींना 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. आंतरधर्मीय विवाहाबाबत हा कायदा आहे.

उत्तर प्रदेश सरकारच्या या कायद्यानुसार आता आंतरधर्मीय विवाहासाठी 2 महिन्यांची नोटीस द्यावी लागणार आहे. तसेच जिल्हा दंडाधिकाऱ्यांची परवानगी देखील घ्यावी लागणार आहे. जर कोणत्याही तरुणाने आपलं नाव लपवून लग्न केलं तर त्याला 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी कॅबिनेट बैठकीची माहिती देताना सांगितलं, “राज्यात सातत्याने लव जिहादच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना फसवून लग्न केलं जात आहे. तसेच त्यांचं धर्मांतरण केलं जात आहे. हे रोखण्यासाठी नवी व्यवस्था लागू करण्यात आली आहे.”

या नव्या कायद्यानुसार नाव आणि धर्म लपवून लग्न करणे आणि फसवणूक करण्यावर आळा बसेल, असा दावा मौर्या यांनी केलाय. जबरदस्तीने धर्मांतरण करणं चुकीचं आहे आणि आता या कायद्याप्रमाणे अशा दोषींवर कारवाई होईल, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

Love Jihad | जोडीदार निवडताना धर्म-लिंगाचे निर्बंध नाहीत, हायकोर्टाचा योगी सरकारला झटका

‘तरुणांचं बेरोजगारीवरुन लक्ष हटवण्यासाठी भाजपचं नाटक’, लव जिहादच्या मुद्द्यावर असदुद्दीन ओवेसी यांचं प्रत्युत्तर

एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला, तरीही महाविकास आघाडीचे सरकार आले आणि टिकले; शिवसेनेचा भाजपला टोला

Uttar Pradesh cabinet rename the Ayodhya airport as Maryada Purushottam Sriram airport

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.