AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : ‘वो है गलवान के वीर…’ गलवान खोऱ्यातील चकमकीला 1 वर्ष पूर्ण, भारतीय लष्कराकडून शहीदांना श्रद्धांजली

गलवान खोऱ्यातील चकमकीला आज 1 वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्त भारतीय लष्कराने शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केलीय. वो है गलवान के वीर... या गीताद्वारे गलवान खोऱ्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

Video : 'वो है गलवान के वीर...' गलवान खोऱ्यातील चकमकीला 1 वर्ष पूर्ण, भारतीय लष्कराकडून शहीदांना श्रद्धांजली
गलवान खोऱ्यातील चकमकीला 1 वर्ष पूर्ण
| Edited By: | Updated on: Jun 15, 2021 | 6:31 PM
Share

मुंबई : आजपासून बरोबर वर्षभरापूर्वी भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात दोन्ही देशाच्या सैन्यात हिंसक झडक झाली होती. यात 20 भारतीय जवान शहीद झाले. भारतीय लष्कराने त्याबाबत माहिती दिली होती. महत्वाची बाब म्हणजे या झडपेत एकही गोळी चालवली गेली नव्हती. मात्र, या रक्तरंजित संघर्षात आपल्या 20 जवानांना वीरमरण आलं. तर चीनच्या सैन्याचंही मोठं नुकसान जाल्याचं भारतीय लष्कराने सांगितलं होतं. या चकमकीला आज 1 वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्त भारतीय लष्कराने शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केलीय. वो है गलवान के वीर… या गीताद्वारे गलवान खोऱ्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. (one year Completes of Galwan Valley clash, Indian Army pays homage to martyred)

15 जूनच्या रात्री नेमकं काय घडलं?

भारत आणि चीन दरम्यान लडाखमधील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर 6 जून रोजी जनरल रँक लेव्हलची चर्चा झाली होती. त्यात दोन्ही देशांकडून सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती झाली. चर्चेत ठरल्याप्रमाणे चीनच्या सैनिकांना त्यांच्या सीमेत अडून मागे जाण्यास सांगण्यात आलं. मात्र, शांततेत चर्चा करण्याऐवजी चीनने वाद घालण्यास सुरुवात केली.

15 जूनच्या रात्री भारतीय सैनिक आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झडप झाली. त्यावेळी चीन सैनिकांच्या तुलनेत भारतीय सैनिकांची संख्या कमी होती. त्यावेळी चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर लाठ्याकाठ्या, दगड आणि टोकदार हत्यारांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात भारताचे 20 जवान जखमी झाले. त्यानंतर 16 जून रोजी सकाळी भारतीय सैन्याने याबाबत माहिती दिली. त्यात एका अधिकाऱ्यासह 3 जवान शहीद झाल्याचं सांगण्यात आलं.

त्यावेळी मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या अंधारात जवळपास 3 तास ही हिंसक झडप सुरु होती. चीनच्या हल्ल्यानंतर भारतीय जवानांना परत आणण्यात आलं मात्र 20 पैकी 17 जवान गंभीर जखमी होती. तर एका अधिकाऱ्यासह 3 जवान शहीद झाल्याची माहिती 16 जून रोजी सकाळी मिळाली होती. मात्र, या हल्ल्यात भारतीय लष्कराचे एकूण 20 जवान शहीद झाल्याचं नंतर सांगण्यात आलं. तसंच चीन सैन्याचंही मोठं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण चीनकडून त्याबाबत अधिकृत माहिती कधीही देण्यात आली नाही.

45 वर्षांनी शांतता कराराचा चीनकडून भंग

1993 च्या सीमेवरील शांतता कराराचा चीनकडून भंग करण्यात आला आहे. भारत-चीन सीमेवर 1975 नंतर प्रथमच असा गोळीबार होऊन सैनिक शहीद झाल्याची घटना घडली आहे. 1975 मध्ये भारताचे 4 जवान शहीद झाले होते. 1975 ला अरुणाचल प्रदेशात संघर्ष उफाळला होता.

संबंधित बातम्या :

‘माझं करिअर संपलं, पदवी फेकून देतो..’, चीनमधून शिकून आलेला इंजिनिअर पाकिस्तानात विकतोय कलिंगड ज्यूस!

चीनची लस घेतल्यास सौदी अरबमध्ये ‘नो एन्ट्री’, पाकिस्तानचीही चिंता वाढली

one year Completes of Galwan Valley clash, Indian Army pays homage to martyred

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.