AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : ‘वो है गलवान के वीर…’ गलवान खोऱ्यातील चकमकीला 1 वर्ष पूर्ण, भारतीय लष्कराकडून शहीदांना श्रद्धांजली

गलवान खोऱ्यातील चकमकीला आज 1 वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्त भारतीय लष्कराने शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केलीय. वो है गलवान के वीर... या गीताद्वारे गलवान खोऱ्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

Video : 'वो है गलवान के वीर...' गलवान खोऱ्यातील चकमकीला 1 वर्ष पूर्ण, भारतीय लष्कराकडून शहीदांना श्रद्धांजली
गलवान खोऱ्यातील चकमकीला 1 वर्ष पूर्ण
| Edited By: | Updated on: Jun 15, 2021 | 6:31 PM
Share

मुंबई : आजपासून बरोबर वर्षभरापूर्वी भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात दोन्ही देशाच्या सैन्यात हिंसक झडक झाली होती. यात 20 भारतीय जवान शहीद झाले. भारतीय लष्कराने त्याबाबत माहिती दिली होती. महत्वाची बाब म्हणजे या झडपेत एकही गोळी चालवली गेली नव्हती. मात्र, या रक्तरंजित संघर्षात आपल्या 20 जवानांना वीरमरण आलं. तर चीनच्या सैन्याचंही मोठं नुकसान जाल्याचं भारतीय लष्कराने सांगितलं होतं. या चकमकीला आज 1 वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्त भारतीय लष्कराने शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केलीय. वो है गलवान के वीर… या गीताद्वारे गलवान खोऱ्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. (one year Completes of Galwan Valley clash, Indian Army pays homage to martyred)

15 जूनच्या रात्री नेमकं काय घडलं?

भारत आणि चीन दरम्यान लडाखमधील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर 6 जून रोजी जनरल रँक लेव्हलची चर्चा झाली होती. त्यात दोन्ही देशांकडून सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती झाली. चर्चेत ठरल्याप्रमाणे चीनच्या सैनिकांना त्यांच्या सीमेत अडून मागे जाण्यास सांगण्यात आलं. मात्र, शांततेत चर्चा करण्याऐवजी चीनने वाद घालण्यास सुरुवात केली.

15 जूनच्या रात्री भारतीय सैनिक आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झडप झाली. त्यावेळी चीन सैनिकांच्या तुलनेत भारतीय सैनिकांची संख्या कमी होती. त्यावेळी चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर लाठ्याकाठ्या, दगड आणि टोकदार हत्यारांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात भारताचे 20 जवान जखमी झाले. त्यानंतर 16 जून रोजी सकाळी भारतीय सैन्याने याबाबत माहिती दिली. त्यात एका अधिकाऱ्यासह 3 जवान शहीद झाल्याचं सांगण्यात आलं.

त्यावेळी मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या अंधारात जवळपास 3 तास ही हिंसक झडप सुरु होती. चीनच्या हल्ल्यानंतर भारतीय जवानांना परत आणण्यात आलं मात्र 20 पैकी 17 जवान गंभीर जखमी होती. तर एका अधिकाऱ्यासह 3 जवान शहीद झाल्याची माहिती 16 जून रोजी सकाळी मिळाली होती. मात्र, या हल्ल्यात भारतीय लष्कराचे एकूण 20 जवान शहीद झाल्याचं नंतर सांगण्यात आलं. तसंच चीन सैन्याचंही मोठं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण चीनकडून त्याबाबत अधिकृत माहिती कधीही देण्यात आली नाही.

45 वर्षांनी शांतता कराराचा चीनकडून भंग

1993 च्या सीमेवरील शांतता कराराचा चीनकडून भंग करण्यात आला आहे. भारत-चीन सीमेवर 1975 नंतर प्रथमच असा गोळीबार होऊन सैनिक शहीद झाल्याची घटना घडली आहे. 1975 मध्ये भारताचे 4 जवान शहीद झाले होते. 1975 ला अरुणाचल प्रदेशात संघर्ष उफाळला होता.

संबंधित बातम्या :

‘माझं करिअर संपलं, पदवी फेकून देतो..’, चीनमधून शिकून आलेला इंजिनिअर पाकिस्तानात विकतोय कलिंगड ज्यूस!

चीनची लस घेतल्यास सौदी अरबमध्ये ‘नो एन्ट्री’, पाकिस्तानचीही चिंता वाढली

one year Completes of Galwan Valley clash, Indian Army pays homage to martyred

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.