आसाममध्ये पोलीस आणि स्थानिकांमध्ये राडा, 2 जणांचा मृत्यू, पोलीसही जखमी, सरकारकडून 800 घरांवर बुलडोजर!

अनाधिकृत बांधकामं पाडण्यासाठी ही प्रशासनाची एक टीम या भागात पोहचली होती, त्याचवेळी स्थानिकांनी पोलिसांवर हल्ला चढवला.

आसाममध्ये पोलीस आणि स्थानिकांमध्ये राडा, 2 जणांचा मृत्यू, पोलीसही जखमी, सरकारकडून 800 घरांवर बुलडोजर!
दरांग जिल्ह्यात्लया धौलपूर गोरुखुटी भागात गुरुवारी पोलीस आणि स्थानिकांमध्ये हिंसक झडप झाली
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 7:14 PM

आसामच्या (Assam) दरांग जिल्ह्यात्लया धौलपूर गोरुखुटी भागात गुरुवारी पोलीस (Police) आणि स्थानिक लोकांमध्ये हिंसक झडप झाली. या झडपेदरम्यान सध्या 2 आंदोलनकर्ते मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे. याशिवाय, अनेकजण या हिंसाचारात जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांमध्यो पोलिस कर्मचारीही सामील आहेत. अनाधिकृत बांधकामं पाडण्यासाठी ही प्रशासनाची एक टीम या भागात पोहचली होती, त्याचवेळी स्थानिकांनी पोलिसांवर हल्ला चढवला. (Violence between police and locals in Assam, 2 killed, Assam government demolishes 800 unauthorized houses in eviction drive)

आसाम सरकारकडून सोमवारपासून दरांड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बेदखली अभियान चालवण्यात आलं.  या अभियानादरम्यान धौलपूर गोरुखुटी गावातील शेकडो घरं तोडण्यात आली, या अतिक्रमण हटाव मोहिमेत तब्बल 800 कुटुंबं रस्त्यावर आली, त्यांची घरं अनधिकृत होती असा प्रशासनाचा दावा आहे. तर सरकारी दाव्यानुसार, ही सरकारी जागा आहे, आणि त्यावर लोकांनी अतिक्रमण केलं आहे. या गावांमध्ये बहुतांश पूर्वी बंगालमधील मूळ निवासी मुसलमान कुटुंब राहतात. पोलीस आणि स्थानिक लोकांमध्ये झालेल्या झडपेचा एक व्हिडीओही समोर आला आहे, जो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

जून महिन्यातही अतिक्रमण हटवण्यात आलं

या गावामध्ये पहिलं बेदखली अभियन हे जून महिन्यात चालवण्यात आलं होतं, ज्यानंतर खरंच हे अतिक्रमण होतं का हे पाहण्यासाठी एखा समितीने दौराही केला होता. समितीच्या म्हणण्यानुसार, या अभियानात 49 मुस्लीम कुटुंबं आणि एका हिंदू कुटुंबाचं घर तोडण्यात आलं. त्याच अभियानाचा दुसरा पार्ट सोमवारी करण्यात आला, ज्यात तब्बल 800 कुटुंबांची घरं तोडण्यात आली. दुसरीकडे धौलपूर गोरुखुटीच्या काही स्थानिकांनी द वायर या माध्यमाला सांगितलं की, घरं तोडलेल्या कुटुंबांची संख्या तब्बल 900 हून जास्त आहे, आणि त्यापासून तब्बल 20000 लोक रस्त्यावर आले आहेत.

पाहा व्हिडीओ:

काँग्रेसकडून सरकारच्या कारवाईची निंदा

दुसरीकडे आता आसाममधील या बेदखल कारवाईवरुन राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. आसाम काँग्रेस अध्यक्ष भूपेन कुमार यांनी राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले की कोरोनाकाळात अशा प्रकारच्या अभियानाविरोधात कोर्टाचा आदेश होता, तो आदेश झुगारुन राज्य सरकारने हे अभियान हाती घेतले. लोकांना बेघर करण्याआधी सरकारने त्यांच्या निवासाची व्यवस्था करणं गरजेचं होतं.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.