AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणत्या बिळात जरी हेडक्वॉर्टर शिफ्ट केले, तरी पाहिजे तेव्हा उडवू, भारतीय सैन्याचे खुले चॅलेंज

ऑपरेशन सिंदूरने जगाला भारताची ताकद दाखवून दिली आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे कोणत्याही प्रकारच्या आधुनिक युद्धात, विशेषतः ड्रोन आणि इतर प्रगत तंत्रज्ञान निष्क्रीय करण्यात भारताची तत्परता जगाला दिसली आहे.

कोणत्या बिळात जरी हेडक्वॉर्टर शिफ्ट केले, तरी पाहिजे तेव्हा उडवू, भारतीय सैन्याचे खुले चॅलेंज
| Updated on: May 20, 2025 | 1:35 PM
Share

‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानात दाणादाण उडवल्याने भारतीय सैन्याच्या ताकदीचा अंदाज आल्याने पाक नरमला आहे. आता एका एअर डिफेन्स सैन्य अधिकाऱ्याने मोठे वक्तव्य केले आहे. हा अधिकारी म्हणाला की संपूर्ण पाकिस्तान आमची सीमा आहे. आम्ही एका आदेशाची वाट पाहात आहोत. जेव्हा पाहीजे तेव्हा आम्ही पाकिस्तान सैन्याचे हेडक्वॉर्टर नष्ट करु शकतो. काय केले नेमके वक्तव्य…वाचा

भारतीय सैन्याचे वायू संरक्षण महासंचालक लेफ्टनंट जनरल सुमेर इवान डी कुन्हा यांनी सोमवारी भारतीय सैन्याच्या क्षमतेसंदर्भात जे वक्तव्य केले आहे, त्यानंतर पाकिस्तानात हडकंप माजला आहे. कुन्हा यांनी खूपच स्पष्ट शब्दात सांगितले की ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय वायू सेनेने मोठा हल्ला केला आणि अजूनही सर्व पर्याय खुले ठेवलेले आहेत. भारताकडे शस्रास्र भंडार मोठे आहे. जे पाकिस्तानच्या कोणत्याही भागाला लक्ष्य करु शकतात. न्यूज एजन्सी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत लेफ्टनंट जनरल डी. कुन्हा यांनी भारतीय सैन्य क्षमतेवर मोठे भाष्य केले आहे.

येथे पोस्ट आहे –

पाकिस्तानी सैन्याचे जनरल हेडक्वार्टर (जीएचक्यू) रावलपिंडीतून खैबर पख्तुनख्वा( केपीके) वा अन्य कुठेही शिफ्ट करो. तरी त्यांना खोल खड्डा शोधावा लागेल. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत इतके अचूक हल्ले आम्ही केले आहेत. त्यात पाकिस्तानचे हवाईतळ बर्बाद झाले आहेत.यात लॉइटरिंग मुनिशन्सचा ( बराच काळ हवेत असणारे हत्यार ) वापर करुन उच्च क्षमतेच्या लक्ष्यांना नष्ट केले आहे.यात स्वदेशी क्षमतेचे लांबपल्ल्याचे ड्रोन आणि गायडेट मुनिशन्सने ऑपरेशन्सने या ऑपरेशन सिंदुरमध्ये यशस्वी भूमिका निभावली आहे.

मी आता एवढंच सांगू शकतो. भारताच्याजवळ पाकिस्तानचा संपूर्ण बंदोबस्त करण्यासाठी पर्याप्त हत्यारं आहेत. सर्वात रुंद भाग असो किंवा सर्वात अरुंद भाग आहे. संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये आहे. आम्ही आपल्या सीमेपासून खोलपर्यंत संपूर्ण पाकिस्तानला निशाणा बनवू शकतो. जीएचक्यू रावलपिंडीपासून केपीके वा कुठेही घेऊन जाऊ शकते. परंतू ते आमच्या रेंज आहे.त्यांना खरोखरच मोठा खड्डा शोधावा लागेल असे लेफ्टनंट जनरल डी. कुन्हा यांनी सांगितले.

पाकिस्तान आपले नुकसान करु शकला नाही

सैन्याचे प्राथमिक कर्तव्य देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि लोकांचे रक्षण करणे आहे असे सांगतानाच लेफ्टनंट जनरल डी. कुन्हा म्हणाले,की “आमचे काम आपल्या सार्वभौमत्वाचे आणि लोकांचे रक्षण करणे आहे. आम्ही आमच्या मातृभूमीला या हल्ल्यापासून वाचवले, हा हल्ला रहिवासी भागात आणि आमच्या लष्करी छावण्यांना लक्ष्य करण्यासाठी होता. कोणतीही जीवितहानी होणार नाही, याची संपूर्ण दक्षता आम्ही घेतली.त्यामुळे केवळ आमच्या नागरिकांनाच नाही तर आमचे सैनिक, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांनाही अभिमान वाटला. ही भारतातील लोकांसाठीही अभिमानाची गोष्ट आहे असेही ते म्हणाले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...