AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मान्सूनच्या नव्या अंदाजाने खळबळ! यंदा दुष्काळाने परिस्थिती महाभयंकर? 40 कोटी लोकांवर मोठं संकट!

Monsoon Prediction : यंदा मान्सूनच्या नव्या अंदाजामुळे खळबळ उडाली आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मान्सूनच्या नव्या अंदाजाने खळबळ! यंदा दुष्काळाने परिस्थिती महाभयंकर? 40 कोटी लोकांवर मोठं संकट!
DroughtImage Credit source: Google
| Updated on: Apr 08, 2026 | 6:28 PM
Share

भारतात अवघ्या दोन महिन्यांमध्ये पावसाळा सुरू होणार आहे. साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये मान्सूनचे आगमन होते. यानंतर मान्सून संपूर्ण भारतात पोहोचतो, मात्र यंदा मान्सूनच्या नव्या अंदाजामुळे खळबळ उडाली आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे देशातील 40 कोटी लोकांवर मोठे संकट ओढवण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मान्सूनबाबतच्या नव्या अंदाजाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

यंदा कमी पाऊस पडण्याची शक्यता

भारतात मान्सून दाखल होण्यापूर्वीच एप्रिलच्या सुरुवातीला महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात गारवा टिकून आहे, मात्र प्रत्यक्ष मान्सूनच्या काळात पावसाची कमतरता जाणवू शकते. खासगी हवामान अंदाज संस्था स्कायमेट वेदरने 2026 च्या मान्सूनबाबत गंभीर इशारा दिला आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार या वर्षी देशातील एकूण सरासरीच्या सुमारे 94% पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा आकडा 5 टक्के कमी किंवा जास्त असू शकतो. याचाच अर्थ जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी 868.6 मिमी पावसाच्या तुलनेत सुमारे 816 मिमी पाऊस पडू शकतो. यामुळे देशातील अनेक भागांत दुष्काळ पडू शकतो, ज्यामुळे कृषी अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो.

एल-नीनो चिंता वाढवणार

भारतात कमी पाऊस पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे एल नीनो प्रवाह हे आहे. दीड वर्ष ला निनोचा प्रभाव राहिल्यानंतर आता प्रशांत महासागर ENSO-न्यूट्रल स्थितीकडे जात आहे, पण लवकरच एल-नीनो सक्रिय होण्याची शक्यता आहे. स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतीन सिंग यांनी सांगितले की, ‘एल-नीनो मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात दिसून येईल आणि पुढे अधिक तीव्र होईल, ज्यामुळे मान्सून कमकुवत होऊ शकतो. विशेषतः हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस अनियमित राहील.’ त्यामुळे सुरुवातीला कमी पाऊस झाल्यास दुष्काळाची परिस्थिती तयार होऊ शकतो.

देशाच्या या भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता

समोर आलेल्या माहितीनुसार, जूनमध्ये सरासरीच्या 101% पाऊस पडण्याची शक्यता आहे, पण जुलै (95%), ऑगस्ट (92%) आणि सप्टेंबर (89%) मध्ये तो घटत जाण्याचा अंदाज आहे. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या पूर्वेकडील राज्यांत तुलनेने चांगला पाऊस पडू शकतो, तर उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात पावसाची कमतरता राहू शकते. याचा थेट परिणाम भातासह इतर मान्सून पिकांवर होईल.

Follow Us
युद्धविरामानंतर इराणच्या तेल रिफायनरीमध्ये मोठा स्फोट! परिसरात खळबळ
युद्धविरामानंतर इराणच्या तेल रिफायनरीमध्ये मोठा स्फोट! परिसरात खळबळ.
काम करा नाहीतर पद...व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये एकनाथ शिंदेंचा थेट इशारा
काम करा नाहीतर पद...व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये एकनाथ शिंदेंचा थेट इशारा.
राऊतांच्या त्या वक्तव्यावर नवनाथ बन भडकले; म्हणाले, तुम्ही पाकिस्तान..
राऊतांच्या त्या वक्तव्यावर नवनाथ बन भडकले; म्हणाले, तुम्ही पाकिस्तान...
LPG वाटपाबाबत केंद्राचा मोठा निर्णय, पेट्रोलियम मंत्रालयाकडून...
LPG वाटपाबाबत केंद्राचा मोठा निर्णय, पेट्रोलियम मंत्रालयाकडून....
अवकाळीच्या 'अवकृपे'ने शेतकरी हवालदिल, वाशिमच्या 729 हेक्टवरील पिकांचं
अवकाळीच्या 'अवकृपे'ने शेतकरी हवालदिल, वाशिमच्या 729 हेक्टवरील पिकांचं.
राष्ट्रवादीत पुन्हा ठिणगी! पटेलांच्या सभेत अजित पवारांचा फोटो नाहीच
राष्ट्रवादीत पुन्हा ठिणगी! पटेलांच्या सभेत अजित पवारांचा फोटो नाहीच.
भोंदू खरातचा पाय आणखी खोलात! आता शिर्डी पोलीस खरातचा ताबा मागणार, कारण
भोंदू खरातचा पाय आणखी खोलात! आता शिर्डी पोलीस खरातचा ताबा मागणार, कारण.
युद्धविरामाचा भारतावर काय परिणाम होणार? निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन
युद्धविरामाचा भारतावर काय परिणाम होणार? निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन.
युद्धविराम फसला? इराण-इस्त्रायलचे हल्ले सुरूच, होर्मूझ समुद्रधुनीबाबत
युद्धविराम फसला? इराण-इस्त्रायलचे हल्ले सुरूच, होर्मूझ समुद्रधुनीबाबत.
युद्धविरामाच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, सामान्या
युद्धविरामाच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, सामान्या.