AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

West Bengal Election 2021 : पंतप्रधान मोदींकडून आचारसंहितेचा भंग, TMCची निवडणूक आयोगाकडे तक्रार

पंतप्रधान मोदींनी आचारसंहितेचा भंग केल्याचा दावा TMCने केलाय. पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी TMCच्या नेत्यांनी केलीय.

West Bengal Election 2021 : पंतप्रधान मोदींकडून आचारसंहितेचा भंग, TMCची निवडणूक आयोगाकडे तक्रार
बांग्लादेश दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांची मातुआ समाजाच्या मंदिराला भेट
| Updated on: Mar 30, 2021 | 4:49 PM
Share

कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांग्लादेश दौऱ्यात ओराकांडी मतुआ समाजाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यावर तृणमूल काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. पंतप्रधान मोदींनी आचारसंहितेचा भंग केल्याचा दावा TMCने केलाय. पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी TMCच्या नेत्यांनी केलीय. पंतप्रधान मोदी आपल्यासोबत पश्चिम बंगालमधून खासदार शांतनु ठाकूर यांना सोबत घेऊन गेले, जे कुठल्याही अधिकार पदावर नाहीत, असा दावाही TMC नेत्यांनी केलाय.(TMC complains to EC that PM Narendra Modi has violated the code of conduct)

पंतप्रधान मोदी यांच्या बांग्लादेशातील मंदिराचा दौऱ्यामागे पश्चिम बंगालमधील मतदारांना प्रभावित करण्याचा उद्देश होता, असा आरोप तृणमूल काँग्रेसनं केलाय. तृणमूल काँग्रेसनं तक्रार दाखल केल्यानंतर निवडणूक आयोग यावर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

पंतप्रधान मोदींचा 2 दिवसीय बांग्लादेश दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 मार्च रोजी दोन दिवसाच्या बांग्लादेश दौऱ्यावर होते. या दरम्यान त्यांनी मतुआ समाजाचं मंदिर ओराकांडीचाही दौरा केला. इतकच नाही तर पंतप्रधान मतुआ समजाचे संस्थापक हरिश्चंद्र ठाकूर यांच्या जन्मस्थानावरही गेले होते.

पंतप्रधान मोदी बांग्लादेशच्या 50 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी मतुआ समाजातील लोकांशी संवाद साधताना त्यांनी म्हटलं होतं की, एखादा भारतीय पंतप्रधान इथं येईल आणि मतुआ समाजाच्या मंदिरात पूजा करेल असा विचार कुणीही केला नव्हता.

‘बंगालच्या हिंदू मतदारांना भाजपविषयी तितकसं ममत्व नाही’

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपची सर्व मदार पाच गोष्टींवर अवलंबून आहे. मात्र, हे सर्व डावपेच लढवले तरी बंगालमध्ये भाजपला 100 पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत, असा पुनरुच्चार निवडणूक रणनीतीतज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी केला. पश्चिम बंगालमध्ये थेट लढत ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रसचे कितीही नेते पक्ष सोडून गेले असले तरी त्याचा फटका ममता बॅनर्जींना बसणार नाही, असा दावाही प्रशांत किशोर यांनी केला.

संबंधित बातम्या :

VIDEO: ममता बॅनर्जींनी सांगितलं तरी प्रचार करणार नाही; तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँचा पारा चढला

VIDEO: पश्चिम बंगालमध्ये भाजप खासदाराने होळी समारंभातच कार्यकर्त्याच्या थोबाडीत लगावली, बाबुल सुप्रियो नव्या वादात

TMC complains to EC that PM Narendra Modi has violated the code of conduct

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.