AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

What India Thinks Today | आव्हाने पेलून भारत मोठी झेप घेणार, टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी सांगितले हे धोके

What India Thinks Today | 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' च्या दुसऱ्या दिवसाची टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांच्या दमदार भाषणाने सुरुवात झाली. त्यांनी बदलत्या जागतिक घडामोडींचा अचूक वेध घेत, महागाई आणि धोक्याचे भान करुन दिले. त्यांचे भाषण यादृष्टीने महत्वपूर्ण ठरले.

What India Thinks Today | आव्हाने पेलून भारत मोठी झेप घेणार, टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी सांगितले हे धोके
| Updated on: Feb 26, 2024 | 11:05 AM
Share

नवी दिल्ली | 26 February 2024 : जागतिक पटलावर एकामागून एक वेगाने घडामोडी घडत आहेत. या संपूर्ण घडामोडींची अचूक नस टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी पकडली. ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ च्या दुसऱ्या दिवसाची दमदार सुरुवात त्यांच्या या सर्व घडामोडींचा आढावा घेणाऱ्या भाषणाने झाली. त्यांनी घटना, कारणे आणि परिणामांना जणू एका माळेत सुरेख गुंफले. त्यांचा शब्द न शब्द समोरील प्रेक्षक कान देऊन ऐकत होता. त्यांनी सध्याच्या जागतिक घडामोडींचा आणि त्याच्या परिणाम यावर भाष्य केले. त्यांनी महागाई आणि धोक्याचे भान करुन दिले.

भारत जगाच्या केंद्रस्थानी

सीईओ बरुण दास यांनी, भारताची या घटनाक्रमातील स्थिती काय असेल याचे चित्र स्पष्ट केले. भारत आता जगाच्या केंद्रस्थानी आला आहे. भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेचा नवीन केंद्रबिंदू असल्याचे योग्य विधान जागतिक नाणेनिधीने केले आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले. भारतीय अर्थव्यवस्था तिसरी महासत्ता म्हणून आगेकूच करत असल्याचे ते म्हणाले.

चीनची विस्तारवादी भूमिका

इतर अर्थव्यवस्थांना सध्या आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचे ते म्हणाले. चीनची विस्तारवादी महत्वकांक्षा ही जगासाठी धोक्याचा इशारा ठरली आहे. त्यामुळे जगातील लोकशाहीवादी राष्ट्रे चीनपासून दूरावत आहेत. भारताला त्याचा फायदा होत असल्याचे त्यांनी अधोरेखीत केले.

स्वावंलबी होण्यासाठी धडपड

भारताला मोठी झेप घ्यायची आहे. पण त्यासाठी अनेक आव्हांनाचा सामना करावा लागणार आहे. युरोप आणि पश्चिम आशियात अनेक घटनाक्रम घडत आहेत. त्याच्यामुळे जगात केव्हा पण संकट येऊ शकते. त्याचवेळी जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरु आहे. अनेक देशांना स्वावलंबी होण्याची स्वप्न पडत आहेत.

महागाईचे दुष्परिणाम

जगात दरवाढ होत आहे. त्याचा परिणाम व्यापार आणि वाणिज्य यांच्यातील संघर्षातून समोर येईल. त्यामुळे ग्राहकांना होणारे फायदे लक्षणियरित्या कमी होतील. जागतिक संकटांचा संदर्भ देत दास म्हणाले की, त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर दिसेल. या अनिश्चिततेमुळे महागाई भडकू शकते आणि लाखो लोक गरिबीत ढकलले जाऊ शकतात. भारतासह जगात अनेक समस्या आहेत आणि आपल्याला त्यावर समाधान शोधायचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख..
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख...
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?.
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.