AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

What India Thinks Today | आव्हाने पेलून भारत मोठी झेप घेणार, टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी सांगितले हे धोके

What India Thinks Today | 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' च्या दुसऱ्या दिवसाची टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांच्या दमदार भाषणाने सुरुवात झाली. त्यांनी बदलत्या जागतिक घडामोडींचा अचूक वेध घेत, महागाई आणि धोक्याचे भान करुन दिले. त्यांचे भाषण यादृष्टीने महत्वपूर्ण ठरले.

What India Thinks Today | आव्हाने पेलून भारत मोठी झेप घेणार, टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी सांगितले हे धोके
| Updated on: Feb 26, 2024 | 11:05 AM
Share

नवी दिल्ली | 26 February 2024 : जागतिक पटलावर एकामागून एक वेगाने घडामोडी घडत आहेत. या संपूर्ण घडामोडींची अचूक नस टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी पकडली. ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ च्या दुसऱ्या दिवसाची दमदार सुरुवात त्यांच्या या सर्व घडामोडींचा आढावा घेणाऱ्या भाषणाने झाली. त्यांनी घटना, कारणे आणि परिणामांना जणू एका माळेत सुरेख गुंफले. त्यांचा शब्द न शब्द समोरील प्रेक्षक कान देऊन ऐकत होता. त्यांनी सध्याच्या जागतिक घडामोडींचा आणि त्याच्या परिणाम यावर भाष्य केले. त्यांनी महागाई आणि धोक्याचे भान करुन दिले.

भारत जगाच्या केंद्रस्थानी

सीईओ बरुण दास यांनी, भारताची या घटनाक्रमातील स्थिती काय असेल याचे चित्र स्पष्ट केले. भारत आता जगाच्या केंद्रस्थानी आला आहे. भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेचा नवीन केंद्रबिंदू असल्याचे योग्य विधान जागतिक नाणेनिधीने केले आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले. भारतीय अर्थव्यवस्था तिसरी महासत्ता म्हणून आगेकूच करत असल्याचे ते म्हणाले.

चीनची विस्तारवादी भूमिका

इतर अर्थव्यवस्थांना सध्या आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचे ते म्हणाले. चीनची विस्तारवादी महत्वकांक्षा ही जगासाठी धोक्याचा इशारा ठरली आहे. त्यामुळे जगातील लोकशाहीवादी राष्ट्रे चीनपासून दूरावत आहेत. भारताला त्याचा फायदा होत असल्याचे त्यांनी अधोरेखीत केले.

स्वावंलबी होण्यासाठी धडपड

भारताला मोठी झेप घ्यायची आहे. पण त्यासाठी अनेक आव्हांनाचा सामना करावा लागणार आहे. युरोप आणि पश्चिम आशियात अनेक घटनाक्रम घडत आहेत. त्याच्यामुळे जगात केव्हा पण संकट येऊ शकते. त्याचवेळी जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरु आहे. अनेक देशांना स्वावलंबी होण्याची स्वप्न पडत आहेत.

महागाईचे दुष्परिणाम

जगात दरवाढ होत आहे. त्याचा परिणाम व्यापार आणि वाणिज्य यांच्यातील संघर्षातून समोर येईल. त्यामुळे ग्राहकांना होणारे फायदे लक्षणियरित्या कमी होतील. जागतिक संकटांचा संदर्भ देत दास म्हणाले की, त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर दिसेल. या अनिश्चिततेमुळे महागाई भडकू शकते आणि लाखो लोक गरिबीत ढकलले जाऊ शकतात. भारतासह जगात अनेक समस्या आहेत आणि आपल्याला त्यावर समाधान शोधायचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Follow Us
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून ठिकठिकाणी ध्वजारोहण करत....
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून ठिकठिकाणी ध्वजारोहण करत.....
एअरबॅगमुळे भाजप खासदार सावरांचा थोडक्यात जीव वाचला, घोडबंदर रोडवर भीषण
एअरबॅगमुळे भाजप खासदार सावरांचा थोडक्यात जीव वाचला, घोडबंदर रोडवर भीषण.
नंदनवनवर भेट, राजकारणात खळबळ, परांजपे शिंदे गटाच्या वाटेवर?
नंदनवनवर भेट, राजकारणात खळबळ, परांजपे शिंदे गटाच्या वाटेवर?.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हुतात्मा स्मारकास अभिवादन
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हुतात्मा स्मारकास अभिवादन.
थरकाप उडवणारा घटनाक्रम, टँकरचा भीषण अपघात, विरार पश्चिमेला जोडणाऱ्या प
थरकाप उडवणारा घटनाक्रम, टँकरचा भीषण अपघात, विरार पश्चिमेला जोडणाऱ्या प.
ठाकरेंचा दगाबाजी करायचा संकल्प, पण संधी मिळाली नाही; भाजप नेत्याचं...
ठाकरेंचा दगाबाजी करायचा संकल्प, पण संधी मिळाली नाही; भाजप नेत्याचं....
एकच जागा, वाढती नाराजी? ठोंबरे पाटील यांचे ते स्टेटस चर्चेत
एकच जागा, वाढती नाराजी? ठोंबरे पाटील यांचे ते स्टेटस चर्चेत.
साहेब, आपला आदेश..., ती ट्वीटर पोस्ट अन् चर्चेला उधाण, विधान परिषदेची
साहेब, आपला आदेश..., ती ट्वीटर पोस्ट अन् चर्चेला उधाण, विधान परिषदेची.
सपकाळांच्या अंतरात्मा वक्तव्यावर शिंदेंचा चिमटा; आत्मा हरवला तर....
सपकाळांच्या अंतरात्मा वक्तव्यावर शिंदेंचा चिमटा; आत्मा हरवला तर.....