AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुरुंगातून कैदी पळून गेल्यास शिक्षा किती वाढते? जाणून घ्या महत्त्वाचे नियम

तुरुंगातून एखादा कैदी पळून गेल्यास त्याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल होतो का, असा प्रश्न अनेकांना पडतो. चला तर, याविषयीच्या कायद्याबद्दल जाणून घेऊया कि तुरुंगातून पळून जाणाऱ्या कैद्याला काय शिक्षा होते आणि त्याला जामीन मिळण्याची शक्यता किती असते.

तुरुंगातून कैदी पळून गेल्यास शिक्षा किती वाढते? जाणून घ्या महत्त्वाचे नियम
prisoners
| Edited By: | Updated on: Aug 03, 2025 | 10:48 PM
Share

जेव्हा एखादी व्यक्ती गुन्हा करते, तेव्हा कायद्यानुसार तिला शिक्षा होते आणि तुरुंगात टाकले जाते. तुरुंगात असताना काही कैदी सुधारण्याचा प्रयत्न करतात, तर काहीजण पळून जाण्याचा प्रयत्न करतात. असे कैदी पुन्हा पकडले गेल्यास, त्यांच्यावर पळून गेल्याबद्दल वेगळा गुन्हा दाखल होतो की, आणखी काही शिक्षा होते, असा प्रश्न अनेकांना पडतो. चला, याविषयीच्या कायद्याची माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया.

तुरुंगातून पळून जाणाऱ्या कैद्यांसाठी शिक्षा

भारतीय दंड संहितेनुसार: भारतात जर एखादा कैदी तुरुंगातून पळून गेला, तर त्याला भारतीय दंड संहिता (IPC) कलम 224 नुसार दोषी मानले जाते. या गुन्ह्यासाठी त्याला 2 वर्षांपर्यंतची अतिरिक्त शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

पळून जाण्यात मदत केल्यास: पळून जाणाऱ्या कैद्याला मदत करणाऱ्या किंवा त्याला लपवून ठेवणाऱ्या व्यक्तीलाही कलम 222 किंवा 225 नुसार शिक्षा होते.

वेगळा खटला चालतो का?

तुरुंगातून पळून गेलेल्या कैद्याची शिक्षा त्याच्या परिस्थितीवर अवलंबून असते. पळून जाण्यासाठी मिळालेली अतिरिक्त शिक्षा त्याच्या आधीच्या शिक्षेत जोडली जाते. म्हणजेच, त्याला आधीची शिक्षा तर पूर्ण करावीच लागते, पण त्यात पळून जाण्याचा कालावधी आणि अतिरिक्त शिक्षा यांचाही समावेश होतो.

अनेकदा पळून गेलेल्या कैद्याला दुसऱ्या तुरुंगातही हलवले जाते. पळून जाण्यामागच्या कारणांची चौकशी करण्यासाठी न्यायिक समिती नेमली जाते. जर पळून जाण्यादरम्यान कैद्याने कोणाला धमकी दिली असेल किंवा काही गुन्हा केला असेल, तर त्याच्यावर वेगळा खटला चालतो आणि त्यानुसार शिक्षा वाढते.

जामीन मिळण्याची शक्यता कमी

तुरुंगातून पळून गेलेल्या कैद्याला जामीन मिळण्याची शक्यता खूप कमी असते, कारण त्याने शिक्षा भोगत असतानाच आणखी एक गंभीर गुन्हा केलेला असतो. जर पळून जाण्याच्या प्रयत्नात त्याने चोरी, दरोडा किंवा हिंसा यांसारखे गुन्हे केले असतील, तर त्यासाठीही त्याला दोषी ठरवून शिक्षा दिली जाते.

एकंदरीत, तुरुंगातून पळून जाणे हा एक गंभीर गुन्हा आहे, ज्याचे परिणामही गंभीर असतात. त्यामुळे अशी कृती करणे कैद्यांसाठी अधिक धोकादायक ठरू शकते.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.