AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

National Maritime Day : व्यापाराला नवसंजीवनी देणारा दिवस, राष्ट्रीय नौकानयन दिनाचा जाणून घ्या इतिहास?

दळवळणासाठी केवळ रस्ते, हवाई मार्ग एवढेच पुरेसे नाही. व्यापार हे देशाचं जीवनदायी रक्तच आहे त्यानुसार काळाच्या ओघात त्याची व्याप्ती होणेही तेवढेच गरजेचे आहे. याच दळवळणाच्या दृष्टीकोनातून 5 एप्रिला एक वेगळेच महत्व आहे. 103 वर्षापूर्वी याच दिवशी भारतीय मालकीच्या सिंदिया शिपिंग कंपनीची बोट मुंबईहून इंग्लडला निघाली होती. तेव्हापासून आधुनिक भारतामधले मर्चंट नेव्ही सुरु झालं होत. ही घटना 1919 ची असली तरी 1964 पासून हा राष्ट्रीय सागर दिन म्हणून साजरा केला जात आहे.मात्र, या सिंदिया शिपचे अस्तित्वच संपवण्याचा प्रयत्न ब्रिटीश शिपिंग कंपन्यांनी त्यांच्या सरकारच्या माध्यमातून केला होता.

National Maritime Day : व्यापाराला नवसंजीवनी देणारा दिवस, राष्ट्रीय नौकानयन दिनाचा जाणून घ्या इतिहास?
नौकानयन
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Apr 05, 2022 | 5:20 AM
Share

मुंबई : दळवळणासाठी केवळ रस्ते, हवाई मार्ग एवढेच पुरेसे नाही. व्यापार हे देशाचं जीवनदायी रक्तच आहे त्यानुसार काळाच्या ओघात त्याची व्याप्ती होणेही तेवढेच गरजेचे आहे. याच दळवळणाच्या दृष्टीकोनातून 5 एप्रिला एक वेगळेच महत्व आहे. 103 वर्षापूर्वी याच दिवशी भारतीय मालकीच्या (Scindia Shipping) सिंदिया शिपिंग कंपनीची बोट मुंबईहून इंग्लडला निघाली होती. तेव्हापासून आधुनिक भारतामधले (Merchant Navy) मर्चंट नेव्ही सुरु झालं होत. ही घटना 1919 ची असली तरी 1964 पासून हा (National Maritime Day) राष्ट्रीय सागर दिन म्हणून साजरा केला जात आहे.मात्र, या सिंदिया शिपचे अस्तित्वच संपवण्याचा प्रयत्न ब्रिटीश शिपिंग कंपन्यांनी त्यांच्या सरकारच्या माध्यमातून केला होता. आणि तेथेच अस्तित्वाचा लढा सुरु झाला. हा इतिहास असला तरी देशाला लाभलेला समुद्र किनारा आणि या माध्यमातून होणारी आयात-निर्यात देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारी आहे. या राष्ट्रीय नौकानयनाचे महत्व सर्वसामान्यांपर्यंत पोहचले नसले तरी हा दिवस देशाच्या अर्थकारणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे.

म्हणून हा दिवस साजरा केला जातो

भारताच्या पूर्व किनार्‍यावरील चोल आणि पांड्य, पश्चिम किनार्‍यावरील चेर, विजयनगर आणि हिंदवी स्वराज्य या सागरी सत्तांच्या अस्तानंतर उदयाला आलेली पहिली संघटित व्यापारी पूर्णपणे भारतीय कंपनी आहे. या कंपनीचं पहिलं जहाज ‘सिंदिया शिपिंग’ 5 एप्रिल 1919 रोजी मुंबईहून लंडनकडे माल घेऊन निघाले होते. मात्र, याला ब्रिटिश शिपिंग कंपनीने विरोध केला होता. असे असताना त्यांच्या नाकावर टिच्चून एक भारतीय कंपनी जहाज ही मार्गस्थ झाली होती. याच दिवसाचे औचित्य साधून 5 एप्रिल हा ‘राष्ट्रीय नौकानयन दिवस’ सजरा केला जात आहे.

आयात-निर्यातीवरच देशाच अस्तित्व अवलंबून

देशातील आयात-निर्यात ही अखंड सुरु राहणारी प्रक्रिया आहे. याचे वेळोवेळी महत्व यापूर्वीही निदर्शनास आले होते. याच नौकानयनाच्या माध्यमातून 1960-70 या दशकामध्ये भारताला गहू आणि इतर धान्याची आयात करावी लागली होती. त्यावेळी याच व्यापारी जहाजांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती.एवढेच काय अन्नधान्य थेट पोहचवलं गेल्याने याला ‘शिप टू माऊथ’ असंही संबोधले गेले होते. एकंदरीत ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अन्नधान्यासह इतर साहित्य आणि अर्थकारणाला बळकटी देणाऱ्या वस्तूंची आयात-निर्यात केली जाणारा हा दिवस असून याचे महत्व प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे.

नौदलाच्या शिक्षणाला वेगळे महत्व

बोटीवर काम करताना विविध देशातल्या इमिग्रेशन, कस्टम, पोर्ट हेल्थ, एजंट, चार्टरर अशा अनेक लोकांशी संबंध येत असतो. भारतीय वकिलातीत जाण्याचे प्रसंग येतात. तिथल्या फर्स्ट सेक्रेटरीपासून कॉन्सल, राजदुताशी गाठीभेटी होतात. त्यामधून शिकायला तर मिळतंच, पण आपलं जीवन समृद्धही होतं. बोटी महासागरातून नेण्या-आणण्यासाठी नौकानयन करू शकणारे प्रशिक्षित नाविक लागतात. त्यांना शिक्षण देणाऱ्या नॉटिकल अकॅडमी- नेव्हिगेशन स्कुल असतात. त्यात प्रवेश मिळवायला स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात.

भारत एक ‘दर्यावर्दी’ देश

भारत देशाला मोठ्या प्रमाणात समुद्र किनारा लाभलेला आहे. देशाच्या पूर्व-पश्चिम किनारपट्टीची लांबी आहे 7 हजार 516 किलोमीटर आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, प्रत्येक स्वतंत्र आणि सार्वभौम देशाचा, त्याच्या किनार्‍यापासून पुढे 200 सागरी मैल इतक्या अंतरापर्यंतचा, समुद्रातला आणि हवेतला प्रदेश हा रीतसर त्या देशाच्या मालकीचा असतो. त्या अनुशंगाने भारताची एकंदर किनारपट्टी 23 लाख, 5 हजार, 143 चौ.किमी इतक्या लांबीची आहे. म्हणजेच भारत हा एक ‘दर्यावर्दी’ देश आहे; तरीही आज भारताच्या जनमानसात सर्वात दुर्लक्षित विषय जर कोणता असेल, तर तो म्हणजे नौकानयन. आज अत्याधुनिक जगात व्यापारी माल वाहतुकीसाठी रेल्वे, रस्ते आणि विमानसेवा उपलब्ध आहे. त्या मार्गांनी मालवाहतूक होतेदेखील. पण, सर्वात स्वस्त वाहतूक म्हणजे नौकानयनच्या माध्यमातूनच होत आहे.

इतर बातम्या :

मोठी बातमी! पाकिस्तानची बोट भारताच्या हद्दीत घुसली, BSF जवानांकडून बोट जप्त

हिजाब परिधान करणाऱ्यांची परीक्षेच्या कामांपासून मुक्तता, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय

मोठी घोषणा, एचडीएफसी आणि HDFC बँकेच्या विलीनीकरणास मान्यता, काय होणार परिणाम?

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं.

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा