AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा शेवटचा रस्ता कोणता? देशातील 99 टक्के लोकांना नावही नाही माहिती, एका क्लिकवर जाणून घ्या

The Last Road of India: भारताचा अखेरचा, शेवटचा रस्ता कोणता आहे? असा प्रश्न विचारला तर अनेकजण म्हणतील अरे असं कधी डोक्यातच आलं नाही. असा कधी विचारच केला नाही. देशातील अनेक लोकांना याची माहितीची नाही. चला तर जाणून घेऊयात या शेवटच्या रस्त्याविषयी...

भारताचा शेवटचा रस्ता कोणता? देशातील 99 टक्के लोकांना नावही नाही माहिती, एका क्लिकवर जाणून घ्या
भारताचा अखेरचा, शेवटचा रस्ता
| Updated on: Nov 30, 2025 | 4:38 PM
Share

भारताचा शेवटचा रस्ता कोणता? अनेक जण म्हणतील अरे, असा विचार तर आम्ही कधीच केला नव्हता. भारतात रस्त्यांचं मजबूत जाळं तयार झाले आहे. आता तर ग्रीन रोड, समृद्धी महामार्ग, वेगवेगळे कॉरिडोअर भारताला पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण असे जोडत आहेत. तर भारताचा हा अखेरचा रस्ता थेट धनुषकोडीपर्यंत जातो. धनुषकोडी हे ठिकाण तामिळनाडू राज्यातील रामनाथपूरम या जिल्ह्यात आहे. या जिल्ह्याच्या दक्षिण-पूर्व किनाऱ्यावर हे शहर वसलेले आहे. हा रस्ता अरिचल मुनाई येथे जाऊन संपतो. थांबतो. त्यापुढे रस्ता नाही. हा भारतीय जमिनीवरील अखेरचा बिंदू आहे. त्यानंतर समुद्रीमार्ग सुरु होतो. येथून हिंद महासागरातून श्रीलंका अगदी 18–20 किलोमीटर अंतरावर आहे.

धनुष्यकोडीचा इतिहास आणि सांस्कृतिक महत्त्व काय?

धनुष्यकोडीचा उल्लेख रामायणात येतो. असं मानल्या जाते की भगवान श्रीराम आणि त्यांची सेना, लष्कर हे श्रीलंकेत जाण्यासाठी येथेच पोहचले. येथूनच रामसेतू (Ram Setu-Adam’s Bridge) तयार करण्यात आला. धनुष्यकोडी म्हणजे धनुष्याचे टोक. या नावाला किती ऐतिहासिक आणि पवित्र संदर्भ आहे हे तुम्हाला नावातूनच लक्षात आले असेल.

धनुष्यकोडी एकदम खास शहर

1964 पूर्वी धनुष्यकोडी हे एक छोटे पण दळणवळणाचे मुख्य शहर होते. येथे रेल्वे स्टेशन, टपाल घर, बंदर आणि इतर अनेक सुविधा होत्या. 1964 मध्ये येथे चक्रीवादळ घोंगावले. त्याला रामेश्वरम चक्रीवादळ म्हणतात. त्याने सगळं काही उद्धवस्त केलं. यानंतर धनुषकोडी जाणारी रेल्वे बंद करण्यात आली. आज NH 87 चा प्रगत, उन्नत मार्ग हा रामेश्वरमला धनुषकोडीशी जोडतो. हाच रस्ता पुढे अरिचल मुनाई येथे जाऊन समाप्त होतो. या शेवटच्या रस्त्याच्या एका बाजूला बंगालचा उपसागर तर दुसऱ्या बाजूला हिंद महासागर अंथाग पसरलेला आहे. हे एक विलोभनिय दृश्य आहे, जे तुमच्या मनाचा ठाव घेते.

धनुषकोडीपर्यंत पोहचणार कसं?

रामेश्वरम ते धनुषकोडीपर्यंत रस्त्याने जाता येते. हे अंतर जवळपास 20 किलोमीटर इतके आहे. हा रस्ता खासगी आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे. हा परिसर त्याच्या सौंदर्य स्थळांनी मन आकर्षून घेतो. भारत आणि श्रीलंकेतील अंतरही अगदी काही किलोमीटर असल्याने याठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते. भारताच्या या शेवटच्या रस्त्याची मुशाफिरी एकदा कराच. तेव्हा त्याचे महत्त्व अधोरेखित होईल.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....