AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकेकाळी Air India मध्ये ट्रेनी, आता एयरलाईन्स खरेदी करण्याची तयारी, पाहा कोण आहे मीनाक्षी!

गेल्या काही दिवसांपासून एअर इंडियाच्या निलामीच्या बातम्या येत आहेत. यासाठी टाटा ग्रुप आणि सिंगापुर एअरलाइन्सची बोली लावण्याची तयारी सुरू आहे.

एकेकाळी Air India मध्ये ट्रेनी, आता एयरलाईन्स खरेदी करण्याची तयारी, पाहा कोण आहे मीनाक्षी!
| Updated on: Dec 29, 2020 | 5:46 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून एअर इंडियाच्या (Air India) लिलावाच्या बातम्या येत आहेत. यासाठी टाटा ग्रुप आणि सिंगापुर एअरलाइन्सची बोली लावण्याची तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे, एअर इंडियाच्या 209 कर्मचाऱ्यांना एका खासगी फायनेसरच्या मदतीने एअर इंडियासाठी बोली लावण्याची संधी मिळाली आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना या लिलावात बोली लावण्याची संधी मिळत असल्याने याला एतिहासीक गोष्ट मानली जात आहे.(Who is Meenakshi Malik preparing to buy Air India?)

आणि हे सर्व मीनाक्षी मलिक (Meenakshi Malik) यांच्यामुळे शक्य झाले आहे. तर नेमक्या कोण आहेत या मीनाक्षी मलिक काय आहे त्यांचा संघर्ष हे आपण जाणून घेऊयात. मीनाक्षी मलिक एअर इंडियाची व्यावसायिक दिशानिर्देश राहिल्या आहेत. आणि 31 वर्षांपासून त्या एअर लाईनसोबत काम करत आहेत. त्याचप्रमाणे एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना लिलावात बोली लावण्याची संधी ही मीनाक्षी मलिक यांच्यामुळेच मिळत आहे. मिनाक्षी ह्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी झाल्या आहेत.

ते कर्मचारी अगोदरच्या मॅनेजमेंटचा विरोध करत होते. मलिक आणि 218 कर्मचाऱ्यांनी ने एअर लाईनच्या लिलावासाठी ईओआई दिला आहे. टाटाने आणि यूएसच्या एका कंपनी देखील ईओआई दिला आहे.

आता जानेवारीमध्ये समजणार आहे की, यासाठी कोणी कोणी बोली लावली आहे आणि त्यासाठी नेमके कितीजण क्वालिफाईड झाले आहेत. मात्र, यासाठी मीनाक्षी मलिक गेल्या अनेक दिवसांपासून मेहनत घेत आहेत. त्यानंतर खासगी कंपनी फायनांस करेल पण त्यामध्ये एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे देखील महत्व राहिल.

मीनाक्षी मलिक 1989 ला कोलकातामध्ये मॅनेजमेंट ट्रेनि म्हणून काम करत होत्या. त्यांनी ओडिशा येथून बीएससी ऑनर्स आणि एमबीए केले आहे. त्यांचे वडिल उपेंद्रनाथ मलिक हे 1961 बॅचचे आयएएस होते. त्यांच्या वडिलांनी ओडिशा राज्यात विविध मोठ्या पदावर काम केले आहे. त्यांची आई राजकुमारी मलिक ह्या डॉक्टर आहेत.

कसा होणार लिलाव

या लिलावाबद्दल बोलायचे झाले तर एअर इंडियाचे 219 कर्मचारी प्रत्येकी 1-1 लाख रुपये लिलावाच्या करारासाठी देणार आहेत. बाकी सर्व पैसे त्यांचे फायन्सशीयल पार्टनर देणार आहे. एअर इंडिया 2017 पासून लिलावासाठी तयार आहे. या काही वर्षांमध्ये एअर इंडियाचे कर्मचारी वेगळ्या परिस्थितीतून जात आहेत.

मलिक यांचे म्हणणे आहे की, इतर कोणापेक्षाही एअर इंडियाचे कर्मचारीचे कर्मचारी एअरलाइनला खूप चांगल्या प्रकारे ओळखतात. सर्वजण प्रशिक्षित आहेत. आम्हाला माहिता आहे की, समस्या नेमक्या कुढे आहेत. आम्ही या लिलावात जिंकण्यासाठी किंवा हरण्यासाठी सहभागी होत नाहीतर आम्हाला एअर इंडियाला चांगले दिवस दाखवायचे आहेत, असे मिनाक्षी मलिक यांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या :

Ratan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल 500 कोटींची मदत

(Who is Meenakshi Malik preparing to buy Air India?)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.