पुरुष का जात आहेत नैराश्याच्या गर्तेत ? तज्ज्ञांच्या मते काय आहेत उपाय ?
देशात दर दिवसाला 468 लोक स्वत:ला संपवत आहेत. यात 72 टक्के पुरुषांचा समावेश आहे. लाखमोलाचं आयुष्य संपवण्यात पुरुषांचे प्रमाण का जास्त आहे. यात कोणते घटक जबाबदार आहेत. नैराश्यावर कशी मात करावी याचा घेतलेला आढावा

मानसिक तणावाने अनेक लोक नैराश्याच्या गर्तेत जात आहेत. यातील अनेक जण मृत्यूला कवठाळत आहेत. अशा प्रकारे स्वत:चे आयुष्य संपवणाऱ्यात भारतात पुरुषाचे प्रमाण सर्वाधिक आहे. देशात दरदिवशी ४६८ हून अधिक लोक स्वत:चे लाख मोलाचे प्राण गमावत आहेत. त्यात ७२ टक्के पुरुषांचे प्रमाण आहे. दरवर्षी मे महिना मानसिक आरोग्य जागरुकता मास म्हणून साजरा केला जातो. यंदाची थीम ‘In Every Story, There’s Strength’ अशी होती. यावेळी पुरुषांच्या मेंटल हेल्थ संदर्भात अधिक लक्ष पुरवण्यात आले होते. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो ( NCRB ) च्या २०२२ च्या अहवालानुसार साल २०२२ मध्ये १ लाख ७१ हजार लोकांनी आत्महत्या केली...
