AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

POK मध्ये का भडकलेत लोकं, भारताने पहिल्यांदाच दिले अधिकृत निवेदन

पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओके क्षेत्रात सध्या संघर्ष पाहायला मिळत आहे. येथील स्थानिक प्रशासन आणि लोकांमध्ये हा संघर्ष सुरु आहे. पीठाचे भाव आणि विजेचे दर गगणाला भिडल्याने लोकं रस्त्यावर उतरले आहेत. सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर काही जखमी झाले आहेत.

POK मध्ये का भडकलेत लोकं, भारताने पहिल्यांदाच दिले अधिकृत निवेदन
shailesh musale
shailesh musale | Updated on: May 17, 2024 | 6:49 PM
Share

पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने सुरू आहेत. त्यामुळे पीओकेमधील नागरिक आणि जवानांमध्ये संघर्ष सुरु आहे. पीओकेमध्ये आंदोलकांवर सुरक्षा दलांनी गोळीबार केल्याने तीन लोकं ठार झाले आहेत तर सहा जण जखमी झालेत. आता भारताने याबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे. पीओकेमध्ये होत असलेल्या निदर्शनांबद्दल, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदे घेत सांगितले की, पीओकेची संसाधने लुटली जात आहेत ज्यामुळे तेथील लोक संतप्त आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, “गेल्या काही दिवसांत तेथे निदर्शने होत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे तेथील संसाधने लुटली जात आहेत. लोकांना त्यांच्या संसाधनांपासून वंचित ठेवले जात आहे. तेथील प्रशासनाकडून लोकांचे शोषण होत आहे. जम्मू, लडाख आणि काश्मीर हे भारताचे अविभाज्य भाग आहेत आणि राहतील.

PoK मधील आंदोलक गव्हाच्या पिठाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. याशिया विजेच्या किंमती ही वाढल्या आहेत. याच्याविरोधात येथील नागरिकांनी आंदोलन केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी येथे संघर्ष वाढल्यानंतर या प्रदेशासाठी 23 अब्ज रुपयांच्या अनुदानांला तातडीने मंजुरी दिली. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सबसिडी जाहीर करुन येथील लोकांना शांत करण्यात प्रयत्न केला. आता  40 किलो पिठासाठी सबसिडीचा दर 3,100 पाकिस्तानी रुपयांवरून 2,000 पाकिस्तानी रुपये करण्यात आला आहे. बातम्यांनुसार, 100, 300 आणि 300 पेक्षा जास्त युनिटसाठीच्या विजेच्या दरात अनुक्रमे 3 रुपये, 5 रुपये आणि 6 रुपये प्रति युनिट अशी कपात करण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी पाकव्याप्त काश्मीरबाबत वक्तव्य केले होते. ते म्हणाले की, ‘फारुख अब्दुल्ला आम्हाला घाबरवतात की पीओके मागू नका, त्यांच्याकडे (पाकिस्तान) अणुबॉम्ब आहेत. हा १४० कोटी लोकांचा महान भारत आहे, हा कुणाला घाबरत नाही. आज मी सीता मातेच्या भूमीवर जाऊन म्हणतो, पीओके भारताचे आहे, भारताचाच राहणार आणि आम्ही तो घेऊ.’

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा