AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभेत महिला आक्षरण विधेयक नामंजूर, काय म्हणाले राहुल गांधी ?

महिला आरक्षण विधेयक संसदेत पास होऊ शकले नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले की हा घटनेवर हल्ला होता, परंतू आम्ही तो रोखला आहे..

लोकसभेत महिला आक्षरण विधेयक नामंजूर, काय म्हणाले राहुल गांधी ?
rahul gandhi and priyanka gandhi
| Updated on: Apr 17, 2026 | 9:05 PM
Share

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले नाही. शुक्रवारी ( १७ एप्रिल ) रोजी संसदेत झालेल्या मतदानात विधेयकाच्या बाजूने २९८ मते पडली तर विरोधात २३० मते पडली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विधेयक मंजूर न झाल्यावर प्रतिक्रीया दिली आहे. राहुल गांधी म्हणाले की संविधानावर हा हल्ला होता जो आम्ही रोखला आहे. राहुल यांनी केंद्र सरकारवर टीका करताना साल २०२३ चे महिला विधेयक आणा विरोधक त्याला एकजूटीने पाठींबा देतील असे ठणकावत सांगितले. काँग्रेस नेता प्रियंका गांधी यांनी देखील या विधेयकाच्या कोसळल्यावर प्रतिक्रीया दिली आहे.

राहुल गांधी यांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर प्रतिक्रीया देताना सांगितले की,’ हे संविधानावरील आक्रमण होते. आणि आम्ही त्याला हरवले आहे. ही चांगली गोष्ट आहे. आम्ही स्पष्ट पणे सांगितले होते की हे महिला बिल नाही. ही हिंदुस्थानचे राजकीय स्ट्रक्चर बदलण्याचा प्रयत्न आहे आणि आम्ही तो रोखला आहे. मी पंतप्रधानांना सांगू इच्छीत आहे की तुम्हाला महिला बिल हवे आहे तर तुम्ही २०२३ ते बिल आणा आणि लागू करा, संपूर्ण विरोधी पक्ष समर्थन करेल.’

प्रियंका गांधी काय म्हणाल्या ?

काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी प्रतिक्रीया देताना सांगितले की महिला आरक्षणाची ही गोष्ट नव्हती ती लोकशाहीची गोष्ट होती. देशाच्या अखंडतेची ही गोष्ट होती. आम्ही कधी यावर सहमत होऊ शकणार नाही. तुम्ही महिला आरक्षण बिला या प्रकारे मतदार संघ पुनर्रचनेशी जोडणार जी जुन्या लोकसंख्येवर आधारित आहे ज्यात ओबीसी सामील नाहीत. हे शक्य नव्हते की बिल पारित होईल. देशाच्या लोकशाहीसाठी, देशाच्या अखंडतेसाठी हा सर्वात मोठा विजय आहे.

लोकसभेत बिघडले सरकारचे गणित

लोकसभेत घटना दुरुस्ती विधेयक पारित होण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज असते. संसदेत ‘घटना (१३१ वी ) दुरुस्ती विधेयक २०२६’ वर झालेल्या मतदानाच्या वेळी याच्या बाजूने २९८ आणि विरोधात २३० मते पडली. सरकारने या विधेयकासोबत मतदार पुनर्रचना विधेयक २०२६ आणि संघ राज्य विधी ( दुरुस्ती ) विधेयक,२०२६ ला देखील संसदेत चर्चा आणि मंजूरीसाठी ठेवले होते. परंतू घटना दुरुस्ती विधेयक पडल्याने सरकारने उर्वरित दोन विधेयक पुढे आणलीच नाहीत.

Follow Us
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक.
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल, म्हणाल
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल, म्हणाल.
Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर... आरोप
Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर... आरोप.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी....
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी.....
नाशिक IT प्रकरण, फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाख
नाशिक IT प्रकरण, फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाख.
उन्हाचा तडाखा वाढला, अहिल्यानगरमध्ये तापमान 41 अंशावर
उन्हाचा तडाखा वाढला, अहिल्यानगरमध्ये तापमान 41 अंशावर.
नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर...
नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर....
TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!
TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!.
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन.
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का.