AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आपका बंटी’, ‘महाभोज’च्या प्रख्यात लेखिका मन्नू भंडारी यांचं निधन

'महाभोज' आणि 'आप का बंटी' सारख्या अजरामर कादंबऱ्यांनी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लेखिका मन्नू भंडारी यांचं आज निधन झालं.

'आपका बंटी', 'महाभोज'च्या प्रख्यात लेखिका मन्नू भंडारी यांचं निधन
mannu bhandari
| Edited By: | Updated on: Nov 15, 2021 | 3:56 PM
Share

नवी दिल्ली: ‘महाभोज’ आणि ‘आप का बंटी’ सारख्या अजरामर कादंबऱ्यांनी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लेखिका मन्नू भंडारी यांचं आज निधन झालं. वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचं नेमकं कारण समजू शकलं नाही. मात्र, त्यांच्या निधनावर साहित्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मन्नू भंडारी यांचा जन्म 3 एप्रिल 1939 रोजी झाला होता. मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील भानपुरा गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे पती राजेंद्र यादवही प्रसिद्ध साहित्यिक होते. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचं नाव महेंद्र कुमारी ठेवलं होतं. मात्र, साहित्य क्षेत्राकडे मोर्चा वळवल्यानंतर त्यांनी त्यांचं नाव मन्नू ठेवलं होतं. बालपणी त्यांना सर्वच जण मन्नू म्हणून संबोधत असत. त्यामुळे त्यांनी याच नावाने लिखान केलं. पुढे मन्नू भंडारी हीच त्यांची ओळख झाली.

पुरुषप्रधान संस्कृतीवर ताशेरे

मन्नू भंडारी या प्रख्यात स्त्रीवादी लेखिका होत्या. त्यांच्या लेखनातून त्यांनी कायमच पुरुष प्रधान संस्कृती आणि वर्चस्वावर ताशेरे ओढले. त्यांनी अेक कादंबऱ्या लिहिल्या होत्या. त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांवर सिनेमेही प्रदर्शित झालेले आहेत. त्यांच्या ‘यही सच है’ या कथेवर 1974मध्ये ‘रजनीगंधा’ सिनेमा बनला होता. प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक बासु चॅटर्जी यांनी हा सिनेमा बनवला होता.

दशकभरानंतर घटस्फोट

दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजामध्ये त्यांनी दीर्घकाळ अध्यापनाचं काम केलं. ‘मैं हार गई’, ‘तीन निगाहों की एक तस्वीर’, ‘एक प्लेट सैलाब’, ‘यही सच है’, ‘आंखों देखा झूठ’ और ‘त्रिशंकु’ या त्यांच्या कादंबऱ्या विशेष गाजल्या. या कादंबऱ्या वाचल्यानंतर त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची झलक पाहायला मिळते. प्रसिद्ध साहित्यिक राजेंद्र यादव यांच्यासोबत त्यांनी विवाह केला होता. ते ‘हंस’चे संपादकही होते. लग्नाच्या एक दशकानंतर या दोघांमध्ये वितुष्ट आलं आणि दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. यादव यांच्या निधनापर्यंत दोघेही वेगळे राहत होते.

स्वत:चीच वेदना मांडली

‘आपका बंटी’ ही त्यांची कादंबरी विशेष गाजली. सामान्य माणसाच्या आयुष्यातील दु:खाचं विश्व त्यांनी या कादंबरीत मांडलं आहे. घटस्फोट घेतल्यानंतर झालेल्या त्रासाचं चित्रण त्यांनी या कादंबरीत केलं आहे. या कादंबरीने त्यांना यश मिळवून दिलं. त्यांची ‘महाभोज’ ही कादंबरीही गाजली. राजकीय आणि सामाजिक जीवनात आलेल्या मूल्यहीनतेवर या कादंबरीत भाष्य करण्यात आलं आहे. सिरोहा गावातील ही कहानी आहे. बिसेसर नावाच्या व्यक्तिच्या मृत्यूनंतर त्याच्या मृत्यूचा राजकीय लाभ उठवण्यासाठी कसे राजकारणी प्रयत्न करतात, याचं वास्तवादी चित्रं या पुस्तकातून रेखाटण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या:

विक्रम गोखले म्हणाले, कंगना खरंच बोलली; शरद पवारांनी लावला गोखलेंच्या विधानाचा एका वाक्यात निक्काल

संप मागे घ्या, चर्चा करु; उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांना बंधनकारक असेल- अनिल परब

विक्रम गोखले म्हणाले, कंगना खरंच बोलली; शरद पवारांनी लावला गोखलेंच्या विधानाचा एका वाक्यात निक्काल

Follow Us
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून...

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून..

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?.

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा