AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आपका बंटी’, ‘महाभोज’च्या प्रख्यात लेखिका मन्नू भंडारी यांचं निधन

'महाभोज' आणि 'आप का बंटी' सारख्या अजरामर कादंबऱ्यांनी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लेखिका मन्नू भंडारी यांचं आज निधन झालं.

'आपका बंटी', 'महाभोज'च्या प्रख्यात लेखिका मन्नू भंडारी यांचं निधन
mannu bhandari
| Edited By: | Updated on: Nov 15, 2021 | 3:56 PM
Share

नवी दिल्ली: ‘महाभोज’ आणि ‘आप का बंटी’ सारख्या अजरामर कादंबऱ्यांनी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लेखिका मन्नू भंडारी यांचं आज निधन झालं. वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचं नेमकं कारण समजू शकलं नाही. मात्र, त्यांच्या निधनावर साहित्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मन्नू भंडारी यांचा जन्म 3 एप्रिल 1939 रोजी झाला होता. मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील भानपुरा गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे पती राजेंद्र यादवही प्रसिद्ध साहित्यिक होते. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचं नाव महेंद्र कुमारी ठेवलं होतं. मात्र, साहित्य क्षेत्राकडे मोर्चा वळवल्यानंतर त्यांनी त्यांचं नाव मन्नू ठेवलं होतं. बालपणी त्यांना सर्वच जण मन्नू म्हणून संबोधत असत. त्यामुळे त्यांनी याच नावाने लिखान केलं. पुढे मन्नू भंडारी हीच त्यांची ओळख झाली.

पुरुषप्रधान संस्कृतीवर ताशेरे

मन्नू भंडारी या प्रख्यात स्त्रीवादी लेखिका होत्या. त्यांच्या लेखनातून त्यांनी कायमच पुरुष प्रधान संस्कृती आणि वर्चस्वावर ताशेरे ओढले. त्यांनी अेक कादंबऱ्या लिहिल्या होत्या. त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांवर सिनेमेही प्रदर्शित झालेले आहेत. त्यांच्या ‘यही सच है’ या कथेवर 1974मध्ये ‘रजनीगंधा’ सिनेमा बनला होता. प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक बासु चॅटर्जी यांनी हा सिनेमा बनवला होता.

दशकभरानंतर घटस्फोट

दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजामध्ये त्यांनी दीर्घकाळ अध्यापनाचं काम केलं. ‘मैं हार गई’, ‘तीन निगाहों की एक तस्वीर’, ‘एक प्लेट सैलाब’, ‘यही सच है’, ‘आंखों देखा झूठ’ और ‘त्रिशंकु’ या त्यांच्या कादंबऱ्या विशेष गाजल्या. या कादंबऱ्या वाचल्यानंतर त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची झलक पाहायला मिळते. प्रसिद्ध साहित्यिक राजेंद्र यादव यांच्यासोबत त्यांनी विवाह केला होता. ते ‘हंस’चे संपादकही होते. लग्नाच्या एक दशकानंतर या दोघांमध्ये वितुष्ट आलं आणि दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. यादव यांच्या निधनापर्यंत दोघेही वेगळे राहत होते.

स्वत:चीच वेदना मांडली

‘आपका बंटी’ ही त्यांची कादंबरी विशेष गाजली. सामान्य माणसाच्या आयुष्यातील दु:खाचं विश्व त्यांनी या कादंबरीत मांडलं आहे. घटस्फोट घेतल्यानंतर झालेल्या त्रासाचं चित्रण त्यांनी या कादंबरीत केलं आहे. या कादंबरीने त्यांना यश मिळवून दिलं. त्यांची ‘महाभोज’ ही कादंबरीही गाजली. राजकीय आणि सामाजिक जीवनात आलेल्या मूल्यहीनतेवर या कादंबरीत भाष्य करण्यात आलं आहे. सिरोहा गावातील ही कहानी आहे. बिसेसर नावाच्या व्यक्तिच्या मृत्यूनंतर त्याच्या मृत्यूचा राजकीय लाभ उठवण्यासाठी कसे राजकारणी प्रयत्न करतात, याचं वास्तवादी चित्रं या पुस्तकातून रेखाटण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या:

विक्रम गोखले म्हणाले, कंगना खरंच बोलली; शरद पवारांनी लावला गोखलेंच्या विधानाचा एका वाक्यात निक्काल

संप मागे घ्या, चर्चा करु; उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांना बंधनकारक असेल- अनिल परब

विक्रम गोखले म्हणाले, कंगना खरंच बोलली; शरद पवारांनी लावला गोखलेंच्या विधानाचा एका वाक्यात निक्काल

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक