
बॉलिवूडमधील कलाकारांची मैत्री आणि नाते पाहून अनेकांना वाटतं की, इंडस्ट्रीमधील लोक एकमेकांना नेहमी सहकार्य करत असतील पण किती खरं आहे हे अनेकांना माहिती नसेल.

आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिच्या मृत्यूनंतर तिच्या अंत्ययात्रेला खांदा देण्यासाठी कोणीच नव्हतं.

आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती 1960 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिचा जन्म हा पंजाबी कुटुंबात झाला होता. तिचे नाव विमी आहे. विमी यांच्या सौंदर्याची त्या काळात प्रचंड चर्चा होत असायची.

‘हमराज’ चित्रपटातून तिला एका रात्रीत प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या निळ्या डोळ्यांनी आणि मोहक सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घातली. मात्र, याच काळात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळं सुरू झाली.

कारण, विमी यांनी कोणता चित्रपट करावा, कोणता नाही, हे सर्व निर्णय पतीच घेत असत. त्यांच्या या हस्तक्षेपामुळे अनेक मोठ्या निर्मात्यांनी विमीपासून अंतर ठेवायला सुरुवात केली. या तणावामुळे त्या पूर्णपणे खचून गेल्या. अखेर त्यांनी पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

पतीपासून वेगळ्या झाल्यानंतर विमी पूर्णपणे एकट्या पडल्या. त्यांच्यावर असणाऱ्या कर्जामुळे त्या तीव्र नैराश्यात गेल्या. यामधून सुटका होण्यासाठी त्यांनी दारूचा आधार घेतला. त्यानंतर त्यांच्याकडे औषधांसाठी देखील पैसे उरले नाहीत.

दारुमुळे लिव्हर खराब झाला. त्यांना रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळी एकही जवळचा व्यक्ती त्यांना भेटायला आला नाही. 34 व्या वर्षी त्यांना जगाचा निरोप घेतला.

कधीकाळी त्यांना पाहण्यासाठी लाखोंची गर्दी जमायची. पण शेवटी त्यांच्या अंत्ययात्रेला खांदा देण्यासाठी कोणीच नव्हतं. त्यांचा मृतदेह कचऱ्याच्या ठेल्यावरून स्मशानभूमीकडे नेण्यात आला.