AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti: आयुष्याच्या प्रत्येक स्थरावर यशश्वी बनवते आचार्य चाणाक्य यांच्या ‘या’ चार नीति

महान गणितज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि विचारवंत आचार्य चाणक्य यांनी आपल्या जीवनातील अनुभव अतिशय सोप्या पद्धतीने आणि सखोलपणे आपल्या नीतिशास्त्रात स्पष्ट केले आहेत. आचार्य चाणक्याची धोरणे जीवनातील आव्हानांशी लढण्यास मदत करतात आणि यशाच्या मार्गावर मार्गदर्शक म्हणून काम करतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही चाणक्यजींच्या या पाच मूलभूत मंत्रांचा अवलंब केला तर तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. […]

Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 12, 2022 | 8:41 AM
Share
आचार्य चाणक्य यांनी जगातील सर्वोत्तम ज्ञान म्हणजेच ज्ञानाची देणगी मानली आहे. आचार्यांनी विद्येची तुलना कामधेनू गाईशी केली आहे. आचार्य म्हणतात की, विद्या ही अशी संपत्ती आहे जी कधीही खर्च करता येत नाही. तुम्ही ते जितके वाटाल तितके ते वाढते.  विद्या एका आई सारखी असते जी आपल्या मुलांचे रक्षण करते.

आचार्य चाणक्य यांनी जगातील सर्वोत्तम ज्ञान म्हणजेच ज्ञानाची देणगी मानली आहे. आचार्यांनी विद्येची तुलना कामधेनू गाईशी केली आहे. आचार्य म्हणतात की, विद्या ही अशी संपत्ती आहे जी कधीही खर्च करता येत नाही. तुम्ही ते जितके वाटाल तितके ते वाढते.  विद्या एका आई सारखी असते जी आपल्या मुलांचे रक्षण करते.

1 / 4
आचार्य चाणक्य सांगतात की, अन्नदान, वस्त्रदान किंवा जमीन दान केल्याने तुम्ही काही काळासाठी माणसाचे भले करू शकता. पण जर तुम्ही ज्ञानाचे दान केले तर कोणाचे तरी आयुष्य घडवता. हे असे दान आहे, जे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाते आणि त्याचे पुण्य शाश्वत असते. हे एखाद्या व्यक्तीला दर्जात्मक जीवन, संपत्ती इत्यादी सर्व काही प्रदान करते. वाईट काळातही योग्य मार्ग दाखवतो. म्हणून ज्ञानाचे दान हे श्रेष्ठ आहे.

आचार्य चाणक्य सांगतात की, अन्नदान, वस्त्रदान किंवा जमीन दान केल्याने तुम्ही काही काळासाठी माणसाचे भले करू शकता. पण जर तुम्ही ज्ञानाचे दान केले तर कोणाचे तरी आयुष्य घडवता. हे असे दान आहे, जे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाते आणि त्याचे पुण्य शाश्वत असते. हे एखाद्या व्यक्तीला दर्जात्मक जीवन, संपत्ती इत्यादी सर्व काही प्रदान करते. वाईट काळातही योग्य मार्ग दाखवतो. म्हणून ज्ञानाचे दान हे श्रेष्ठ आहे.

2 / 4
मात्र, दान पात्र व्यक्तीलाच द्यावे, तरच त्याचे मोल होते, असेही आचार्यांचे मत होते. जसे तुम्ही एखाद्या भुकेल्याला अन्न दिले तर ते त्याच्यासाठी ते मोलाचे असेल. ज्याचे पोट आधीच भरले आहे, त्याला अन्नाची काय गरज आहे? ज्ञानाच्या बाबतीतही असेच आहे. ज्याला खरोखरच शिकण्याची आवड आहे, ज्याच्यात शिक्षणाची जिज्ञासा आहे त्या व्यक्तीला ज्ञान दिले पाहिजे. अशी व्यक्ती नेहमी त्या ज्ञानाचा चांगला उपयोग करेल आणि कायम तुमचा आदर करेल.

मात्र, दान पात्र व्यक्तीलाच द्यावे, तरच त्याचे मोल होते, असेही आचार्यांचे मत होते. जसे तुम्ही एखाद्या भुकेल्याला अन्न दिले तर ते त्याच्यासाठी ते मोलाचे असेल. ज्याचे पोट आधीच भरले आहे, त्याला अन्नाची काय गरज आहे? ज्ञानाच्या बाबतीतही असेच आहे. ज्याला खरोखरच शिकण्याची आवड आहे, ज्याच्यात शिक्षणाची जिज्ञासा आहे त्या व्यक्तीला ज्ञान दिले पाहिजे. अशी व्यक्ती नेहमी त्या ज्ञानाचा चांगला उपयोग करेल आणि कायम तुमचा आदर करेल.

3 / 4
आचार्य सांगतात की, इतर कोणत्याही गोष्टीचे दान करून तुम्ही केवळ एकाच व्यक्तीचे कल्याण करता, परंतु ज्ञानदान करून तुम्ही संपूर्ण समाजाचे कल्याण करता. म्हणून ज्ञान स्वतःकडे ठेवू नका. जास्तीत जास्त लोकांचे भले करा.

आचार्य सांगतात की, इतर कोणत्याही गोष्टीचे दान करून तुम्ही केवळ एकाच व्यक्तीचे कल्याण करता, परंतु ज्ञानदान करून तुम्ही संपूर्ण समाजाचे कल्याण करता. म्हणून ज्ञान स्वतःकडे ठेवू नका. जास्तीत जास्त लोकांचे भले करा.

4 / 4
Follow Us
दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... गांधींवर मस्केंची टीका
Naresh Maske | दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... राहुल गांधींवर नरेश मस्केंची बोचरी टीका!
देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार मुंबईसाठी २३८ एसी लोकल मंजूर
मुंबईला मिळणार २३८ एसी लोकल; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार
मुंबईत डोमिनोजच्या तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मुंबईत डॉमिनोजवर एफडीएची कारवाई: तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आमदारांच्या...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आज आमदारांच्या अपात्रतेवरुन युक्तीवाद, थेट....
बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
Mallikarjun Kharge | माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?