
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने देखील . 'ऑपरेशन सिंदूर' राबवल्यानंतर भारतीय सैन्याला पाठिंबा दिला आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीने एक पोस्ट लिहिली आहे.

'ऑपरेशन सिंदूर' राबवल्यानंतर पाठिंबा देत प्राजक्ता हिने भगवद्गीतेतील एक श्लोक लिहिला आहे. 'परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्ध र्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे' हा श्लोक प्राजक्ताने लिहिला आहे.

भगवद्गीतेतील या श्लोकाचा अर्थ सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि वाईट वृत्तीचा नाश करण्यासाठी, धर्माची तत्त्व पुन्हा स्थापित करण्यासाठी मी युगानुयुगे या पृथ्वीवर अवतरतो.. असा आहे.

22 एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्याचा बदला भरताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवत घेतला. भारताने सुरुवातील 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला.

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, मुझफ्फराबाद, कोटली, गुलपूर, बिंबर, सियालकोट, चक अमरू, मुरीदके, बहावलपूर या 9 ठिकाणी भारताने हल्ले करत दहशतवाद्याची तळं उद्ध्वस्त केली आहे.