
पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत वेस्ट इंडिजने 2-1 ने आघाडी घेतली. तिसरा टी20 सामना जिंकत भारताने आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. सूर्यकुमार यादव याने 44 चेंडूत 83 धावा केल्या. तर कुलदीप यादव याने भेदक गोलंदाजी करत वेस्ट इंडिजला पराभूत केलं.

या दोघांशिवाय तिलक वर्मा याची नाबाद 49 धावांच्या खेळी महत्त्वपूर्ण ठरली. त्याने 37 चेंडूत 49 धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली.

तिलक वर्मा याने टी 20 मालिकेत खेळलेल्या तीन सामन्यात 69.50 सरासरीने आणि 139 च्या स्ट्राईक रेटने 139 धावा केल्या आहेत. उर्वरित दोन सामन्यात तिलकला विराट कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

विराट कोहली याने मार्च 2021 मध्ये पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत तीन नाबाद अर्धशतकं झळकावली होती. त्याने इंग्लंड विरुद्ध 231 धावा केल्या होत्या. यासह टी20 मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे.

पाच सामन्यांच्या द्विपक्षीय टी20 मालिकेत दोनशे पेक्षा जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये केएलराहुल दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत त्याने 224 धावा केल्या आहेत.

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर युवा फलंदाज इशान किशन येतो. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 206 धावा केल्या.

चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर हा मधल्या फळीतील फलंदाज आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध 153 धावा केल्या आहेत.

वेस्ट इंडिजविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. त्यापैकी दोन सामने शिल्लक आहेत. तिलक वर्माला हा विक्रम मोडण्यासाठी फक्त 92 धावांची गरज आहे.