AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 महिन्यात भाजपच्या 3 बड्या नेत्यांचा मृत्यू, तिघांनाही मृत्यूची चाहूल?

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षातील (भाजप) वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनानंतर देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. माजी पंतप्रधान अटलबिहार वाजपेयी यांच्या मृत्यूनंतर भाजपच्या दिग्गज नेत्यांपैकी मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar), सुषमा स्वराज (Sushma Swaraj) आणि आता अरूण जेटली (Arun Jaitley) यांचंही निधन झालं. हे निधन सर्वांच्याच मनाला चटका लावणारं होतं. […]

5 महिन्यात भाजपच्या 3 बड्या नेत्यांचा मृत्यू, तिघांनाही मृत्यूची चाहूल?
| Updated on: Aug 24, 2019 | 8:47 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षातील (भाजप) वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनानंतर देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. माजी पंतप्रधान अटलबिहार वाजपेयी यांच्या मृत्यूनंतर भाजपच्या दिग्गज नेत्यांपैकी मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar), सुषमा स्वराज (Sushma Swaraj) आणि आता अरूण जेटली (Arun Jaitley) यांचंही निधन झालं. हे निधन सर्वांच्याच मनाला चटका लावणारं होतं. या तिघांनाही आपल्या मृत्यूची चाहूल खूप अगोदर लागली होती का? असाही प्रश्न यानिमित्ताने पडतो आहे.

सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि मनोहर पर्रिकर या तिन्ही दिग्गज नेत्यांनी आपल्या मृत्यूच्या बरोबर अगोदर महत्त्वाची पदे सोडली होती. यापैकी माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केंद्रातून संरक्षणमंत्री पद सोडत गोव्यात येण्यास पसंती दिली. यावेळी त्यांनी अखेरपर्यंत गोवा मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. मात्र, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांनी शेवटच्या काळात कोणतेही पद घेतले नाही. सुषमा स्वराज यांनी तर निवडणूक लढवण्यास देखील नकार दिला. अरुण जेटली यांनी देखील प्रकृतीचे कारण देत कोणतंही मंत्रीपद घेण्यास नकार दिला.

मनोहर पर्रिकर, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली हे तिन्ही नेते आपल्या शेवटच्या काळापर्यंत सार्वजनिक आयुष्यात कार्यरत होते. त्यांनी नेहमीच लोकांशी संवाद कायम ठेवला होता. तिघांनीही केंद्रीय मंत्रीमंडळात महत्वाच्या पदांवर काम केले आणि आपल्या कामाचा ठसा उमटवला. तसेच योग्यवेळी महत्त्वाच्या पदावरुन पायउतारही केला. अखेरपर्यंत आपल्यालाच मंत्रीपद हवे, असा अट्टाहास करणाऱ्या राजकीय संस्कृतीत या सर्वांचेच वेगळेपण उठून दिसणारे आहे. समाज माध्यमांवरही त्यांच्या या गुणांची स्तुती होताना पाहायला मिळत आहे.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.