AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 महिन्यात भाजपच्या 3 बड्या नेत्यांचा मृत्यू, तिघांनाही मृत्यूची चाहूल?

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षातील (भाजप) वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनानंतर देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. माजी पंतप्रधान अटलबिहार वाजपेयी यांच्या मृत्यूनंतर भाजपच्या दिग्गज नेत्यांपैकी मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar), सुषमा स्वराज (Sushma Swaraj) आणि आता अरूण जेटली (Arun Jaitley) यांचंही निधन झालं. हे निधन सर्वांच्याच मनाला चटका लावणारं होतं. […]

5 महिन्यात भाजपच्या 3 बड्या नेत्यांचा मृत्यू, तिघांनाही मृत्यूची चाहूल?
| Updated on: Aug 24, 2019 | 8:47 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षातील (भाजप) वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनानंतर देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. माजी पंतप्रधान अटलबिहार वाजपेयी यांच्या मृत्यूनंतर भाजपच्या दिग्गज नेत्यांपैकी मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar), सुषमा स्वराज (Sushma Swaraj) आणि आता अरूण जेटली (Arun Jaitley) यांचंही निधन झालं. हे निधन सर्वांच्याच मनाला चटका लावणारं होतं. या तिघांनाही आपल्या मृत्यूची चाहूल खूप अगोदर लागली होती का? असाही प्रश्न यानिमित्ताने पडतो आहे.

सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि मनोहर पर्रिकर या तिन्ही दिग्गज नेत्यांनी आपल्या मृत्यूच्या बरोबर अगोदर महत्त्वाची पदे सोडली होती. यापैकी माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केंद्रातून संरक्षणमंत्री पद सोडत गोव्यात येण्यास पसंती दिली. यावेळी त्यांनी अखेरपर्यंत गोवा मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. मात्र, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांनी शेवटच्या काळात कोणतेही पद घेतले नाही. सुषमा स्वराज यांनी तर निवडणूक लढवण्यास देखील नकार दिला. अरुण जेटली यांनी देखील प्रकृतीचे कारण देत कोणतंही मंत्रीपद घेण्यास नकार दिला.

मनोहर पर्रिकर, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली हे तिन्ही नेते आपल्या शेवटच्या काळापर्यंत सार्वजनिक आयुष्यात कार्यरत होते. त्यांनी नेहमीच लोकांशी संवाद कायम ठेवला होता. तिघांनीही केंद्रीय मंत्रीमंडळात महत्वाच्या पदांवर काम केले आणि आपल्या कामाचा ठसा उमटवला. तसेच योग्यवेळी महत्त्वाच्या पदावरुन पायउतारही केला. अखेरपर्यंत आपल्यालाच मंत्रीपद हवे, असा अट्टाहास करणाऱ्या राजकीय संस्कृतीत या सर्वांचेच वेगळेपण उठून दिसणारे आहे. समाज माध्यमांवरही त्यांच्या या गुणांची स्तुती होताना पाहायला मिळत आहे.

Follow Us
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.