AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 महिन्यात भाजपच्या 3 बड्या नेत्यांचा मृत्यू, तिघांनाही मृत्यूची चाहूल?

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षातील (भाजप) वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनानंतर देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. माजी पंतप्रधान अटलबिहार वाजपेयी यांच्या मृत्यूनंतर भाजपच्या दिग्गज नेत्यांपैकी मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar), सुषमा स्वराज (Sushma Swaraj) आणि आता अरूण जेटली (Arun Jaitley) यांचंही निधन झालं. हे निधन सर्वांच्याच मनाला चटका लावणारं होतं. […]

5 महिन्यात भाजपच्या 3 बड्या नेत्यांचा मृत्यू, तिघांनाही मृत्यूची चाहूल?
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Aug 24, 2019 | 8:47 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षातील (भाजप) वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनानंतर देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. माजी पंतप्रधान अटलबिहार वाजपेयी यांच्या मृत्यूनंतर भाजपच्या दिग्गज नेत्यांपैकी मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar), सुषमा स्वराज (Sushma Swaraj) आणि आता अरूण जेटली (Arun Jaitley) यांचंही निधन झालं. हे निधन सर्वांच्याच मनाला चटका लावणारं होतं. या तिघांनाही आपल्या मृत्यूची चाहूल खूप अगोदर लागली होती का? असाही प्रश्न यानिमित्ताने पडतो आहे.

सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि मनोहर पर्रिकर या तिन्ही दिग्गज नेत्यांनी आपल्या मृत्यूच्या बरोबर अगोदर महत्त्वाची पदे सोडली होती. यापैकी माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केंद्रातून संरक्षणमंत्री पद सोडत गोव्यात येण्यास पसंती दिली. यावेळी त्यांनी अखेरपर्यंत गोवा मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. मात्र, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांनी शेवटच्या काळात कोणतेही पद घेतले नाही. सुषमा स्वराज यांनी तर निवडणूक लढवण्यास देखील नकार दिला. अरुण जेटली यांनी देखील प्रकृतीचे कारण देत कोणतंही मंत्रीपद घेण्यास नकार दिला.

मनोहर पर्रिकर, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली हे तिन्ही नेते आपल्या शेवटच्या काळापर्यंत सार्वजनिक आयुष्यात कार्यरत होते. त्यांनी नेहमीच लोकांशी संवाद कायम ठेवला होता. तिघांनीही केंद्रीय मंत्रीमंडळात महत्वाच्या पदांवर काम केले आणि आपल्या कामाचा ठसा उमटवला. तसेच योग्यवेळी महत्त्वाच्या पदावरुन पायउतारही केला. अखेरपर्यंत आपल्यालाच मंत्रीपद हवे, असा अट्टाहास करणाऱ्या राजकीय संस्कृतीत या सर्वांचेच वेगळेपण उठून दिसणारे आहे. समाज माध्यमांवरही त्यांच्या या गुणांची स्तुती होताना पाहायला मिळत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...