Aaditya Thackeray : दिलखुलासपणे चौकशी करा, आनंद आहे; आदित्य ठाकरेंचं सरकारला प्रत्युत्तर

Aaditya Thackeray : बीडीडी चाळीत पोलिसांना घरे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य सरकारने घेतला. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. बीडीडी चाळीचा प्रश्न गेले 25 वर्ष रखडला होता, तो आम्ही मार्गी लावला. 25 लाख एवढी कन्स्ट्रक्शन कॉस्ट आणली. अजून जीआर निघालेला नाही.

Aaditya Thackeray : दिलखुलासपणे चौकशी करा, आनंद आहे; आदित्य ठाकरेंचं सरकारला प्रत्युत्तर
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 11:40 PM

मुंबई: राज्य सरकारने मुंबई महापालिकेतील (bmc) घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच आदित्य ठाकरे यांच्या कार्यकाळातील कामाचीही चौकशी सुरू आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या (election) तोंडावर शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला प्रत्युत्तर दिलं आहे. दिलखुलासपणे चौकशी करा, आनंदच आहे. आमची कामं जनतेसमोर आहेत, असं प्रत्युत्तर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दिलं आहे. मंत्र्यांना बंगले दिलेत, पण जिल्हे दिलेले नाहीत. पालकमंत्री आज गरजेचे आहेत. पण गद्दार सरकारचं लक्ष स्वतःवरच आहे, जनतेवर नाही, अशी सडकून टीका आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी विधिमंडळात माध्यमांशी संवाद साधताना केली.

हे सरकार स्थापन झालं तेव्हा दोन जण मंत्री झाले. मंत्री ठरवायला 42 दिवस लागले. पण जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरलेले नाही. खोके ओके हे काही झोमण्यासारखं नाही. मुख्यमंत्र्यांची भाषा योग्य नाही. या आमदावर कुणाचा अंकुश नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले. विभागाच्या पुनर्रचनेत कुणीही पाठिंबा दिला तरी चालेल, कधीही निवडणुका घ्या आम्ही सामोरे जाण्यास तयार आहोत. आधी नियुक्ती केली जाते मग थांबवली जाते. हे सरकार फक्त स्वार्थासाठी सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

हे सुद्धा वाचा

अन् मातोश्रीवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या दुसरीकडे मातोश्रीवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. ज्या बाळासाहेबांच्या मुलाने सर्व काही दिलं त्याच्या पाठित खंजीर खुपसायचा. त्यामुळे यांच्यासाठी ‘गद्दार’हा शब्दच योग्य आहे, असा घणाघाती हल्लाही त्यांनी चढवला.

मुख्यमंत्र्यांनी काल धमकी दिली

तिकडचे 2-3 आमदार गुंडागिरीची भाषा करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला काल सभागृहात धमकी दिली. आज पायऱ्यांवर जे लोकं होते त्यांना काही मिळालं नाही. ते त्यांचं दु:ख असेल. त्यांना योग्य शब्द आहे तो म्हणजे गद्दारच आहेत, अशी टीका त्यांनी केली.

बीडीडी चाळीचा प्रश्न आम्ही मार्गी लावला

बीडीडी चाळीत पोलिसांना घरे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य सरकारने घेतला. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. बीडीडी चाळीचा प्रश्न गेले 25 वर्ष रखडला होता, तो आम्ही मार्गी लावला. 25 लाख एवढी कन्स्ट्रक्शन कॉस्ट आणली. अजून जीआर निघालेला नाही. सरकारने लोकांच्या डोळ्यात धुळफेक केली आहे, असंही ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.