AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्योग, कृषी क्षेत्राचा खोके सरकारवरील विश्वास उडाला;’सॅफ्रन’ राज्याबाहेर गेल्यानं आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 'सॅफ्रन' प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

उद्योग, कृषी क्षेत्राचा खोके सरकारवरील विश्वास उडाला;'सॅफ्रन' राज्याबाहेर गेल्यानं आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल
Image Credit source: tv 9
| Updated on: Oct 30, 2022 | 3:14 PM
Share

मुंबई :  युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर (State Govt) जोरदार निशाणा साधला आहे. ‘सॅफ्रन’ प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. दोन महत्त्वाच्या क्षेत्रांचा खोके सरकारवरुन विश्वास उडाला आहे. त्यामध्ये उद्योग (Industry) आणि कृषी क्षेत्राचा समावेश असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे एकापाठोपाठ एक प्रकल्प राज्याबाहेर जात असल्यानं मुंबईच्या लालबाग परिसरात ठाकरे गटाकडून बॅनर लावत शिंदे सरकारवर टीका करण्यात आली आहे. या बॅनरवर आतापर्यंत महाराष्ट्राबाहेर गेलेल्या सर्व प्रकल्पांची नावं लिहिण्यात आली आहेत. तसंच मुंबईसह महाराष्ट्राची तरुणाई विचारतेय यासाठीच बदल हवाय का? असा सवालही या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

आदित्य ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं?

‘सॅफ्रन’ प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी हे ट्विट केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी राज्य सरकारला जोरदार टोला लगावला आहे. ‘दोन महत्त्वाच्या क्षेत्रांचा खोके सरकारवरुन विश्वास उडाला आहे, उद्योग आणि कृषी… गुंतवणूकदारांचा राजकीय स्थौर्यावरील विश्वास उडाला आहे. तर हवामान संकटावेळी शेतकऱ्यांचा सरकारच्या पाठिंब्यावरचा विश्वास उडाला आहे. राक्षसी महत्त्वकांक्षा + प्रशासनाचा पूर्ण ऱ्हास = महाराष्ट्राचे नुकसान’ असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

शिंदे, फडणवीस सरकारविरोधात बॅनरबाजी

दरम्यान दुसरीकडे आज ठाकरे गटाकडून मुंबईच्या लालबाग परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली. राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पावरून शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. या बॅनवर आतापर्यंत राज्याच्याबाहेर गेलेल्या प्रकल्पाांची यादी देण्यात आली आहे. तसेच मुंबईसह महाराष्ट्राची तरुणाई विचारतेय यासाठीच बदल हवाय का? असा सवालही विचारण्यात आला आहे.

Follow Us
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा...
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा....
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन.
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल.
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन.
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट...
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट....
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात.
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय....
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय.....
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी...
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले.....
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री...
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री....