AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्योग, कृषी क्षेत्राचा खोके सरकारवरील विश्वास उडाला;’सॅफ्रन’ राज्याबाहेर गेल्यानं आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 'सॅफ्रन' प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

उद्योग, कृषी क्षेत्राचा खोके सरकारवरील विश्वास उडाला;'सॅफ्रन' राज्याबाहेर गेल्यानं आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल
Image Credit source: tv 9
| Updated on: Oct 30, 2022 | 3:14 PM
Share

मुंबई :  युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर (State Govt) जोरदार निशाणा साधला आहे. ‘सॅफ्रन’ प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. दोन महत्त्वाच्या क्षेत्रांचा खोके सरकारवरुन विश्वास उडाला आहे. त्यामध्ये उद्योग (Industry) आणि कृषी क्षेत्राचा समावेश असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे एकापाठोपाठ एक प्रकल्प राज्याबाहेर जात असल्यानं मुंबईच्या लालबाग परिसरात ठाकरे गटाकडून बॅनर लावत शिंदे सरकारवर टीका करण्यात आली आहे. या बॅनरवर आतापर्यंत महाराष्ट्राबाहेर गेलेल्या सर्व प्रकल्पांची नावं लिहिण्यात आली आहेत. तसंच मुंबईसह महाराष्ट्राची तरुणाई विचारतेय यासाठीच बदल हवाय का? असा सवालही या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

आदित्य ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं?

‘सॅफ्रन’ प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी हे ट्विट केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी राज्य सरकारला जोरदार टोला लगावला आहे. ‘दोन महत्त्वाच्या क्षेत्रांचा खोके सरकारवरुन विश्वास उडाला आहे, उद्योग आणि कृषी… गुंतवणूकदारांचा राजकीय स्थौर्यावरील विश्वास उडाला आहे. तर हवामान संकटावेळी शेतकऱ्यांचा सरकारच्या पाठिंब्यावरचा विश्वास उडाला आहे. राक्षसी महत्त्वकांक्षा + प्रशासनाचा पूर्ण ऱ्हास = महाराष्ट्राचे नुकसान’ असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

शिंदे, फडणवीस सरकारविरोधात बॅनरबाजी

दरम्यान दुसरीकडे आज ठाकरे गटाकडून मुंबईच्या लालबाग परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली. राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पावरून शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. या बॅनवर आतापर्यंत राज्याच्याबाहेर गेलेल्या प्रकल्पाांची यादी देण्यात आली आहे. तसेच मुंबईसह महाराष्ट्राची तरुणाई विचारतेय यासाठीच बदल हवाय का? असा सवालही विचारण्यात आला आहे.

Follow Us
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....