AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यपालांनी आक्रस्ताळेपणाने निर्णय घेणं संवैधानिक पदाला धरुन नाही : असिम सरोदे

शिवसेनेला वेळ नाकारणे ही राज्यपालांची कृती आक्रस्ताळेपणाची असून संवैधानिक पदाला धरुन नसल्याचं मत कायदातज्ज्ञ असिम सरोदे यांनी (Adv Asim Sarode on Governor Bhagat Singh Koshyari) व्यक्त केलं आहे.

राज्यपालांनी आक्रस्ताळेपणाने निर्णय घेणं संवैधानिक पदाला धरुन नाही : असिम सरोदे
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Nov 11, 2019 | 10:00 PM
Share

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला बहुमतासाठीचं आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर करण्यासाठी वेळ वाढवून देण्यास नकार दिला. राज्यपालांची ही कृती आक्रस्ताळेपणाची असून संवैधानिक पदाला धरुन नसल्याचं मत कायदातज्ज्ञ असिम सरोदे यांनी (Adv Asim Sarode on Governor Bhagat Singh Koshyari) व्यक्त केलं आहे. असिम सरोदे (Adv Asim Sarode on Governor Bhagat Singh Koshyari) म्हणाले, “निवडणुका झाल्यानंतर सरकार स्थापन होणे ही सकारात्मक गोष्ट आहे. पाठिंब्याच्या पत्रासाठी शिवसेनेला वाजवी कालावधी देणं आवश्यक होतं. त्यामुळे राज्यपालांनी इतक्या आक्रस्ताळेपणाने निर्णय घेणं हे संवैधानिक पदावर बसलेलं असताना सकारात्मक कृतीला धरुन होत नाही.”

अॅड. असिम सरोदे म्हणाले, “राज्यपालांचा दृष्टीकोन संविधानाला धरुन असला, तरी तो तार्किक आहे असं मला वाटत नाही. खरंतर सरकार स्थापन होऊ देणं हाच सकारात्मक दृष्टीकोन असायला हवा होता. शिवसेनेने सरकार स्थापनेसाठी जो वेळ मागितला होता, तो अवाजवी वेळ नव्हता. शिवसेनेने पाठिंब्याचं पत्र सादर करण्यासाठी वाजवी वेळ मागितला होता. त्यांनी 3 दिवस वेळ मागितला होता. राज्यपालांनी किमान 1 दिवस वेळ दिला असता, तर काही फरक पडला नसता. मात्र, भाजप सोडता इतर पक्षांबद्दल त्यांना काटेकोरपणा पाळायचा असेल आणि राज्याला राष्ट्रपती राजवटीकडे ढकलायचं असेल तर नाईलाज आहे.”

सरकार स्थापन करण्यासाठी 145 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र महत्त्वाचं आहे. भाजपने 8 दिवसांचा वेळ मागितला, त्यावेळी देखील राज्यपालांनी त्यांना किमान 1 दिवसाचा वेळ देणं अपेक्षित होतं. मात्र, भाजपने वेळ मागताना सरकार स्थापनेचा दावाच केला नव्हता. दुसरीकडे शिवसेनेने राज्यापालांकडे दावा करत सत्तास्थापन करण्यासाठी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे शिवसेनेला वेळ देणं अपेक्षित होतं, असंही असिम सरोदे यांनी नमूद केलं.

“राज्यपालांना राज्याला ठरवून राष्ट्रपती राजवटीच्या दरीत लोटायचं आहे का?”

असिम सरोदे यांनी राज्यपालांना ठरवून राज्याला राष्ट्रपती राजवटीच्या दरीत लोटायचं आहे का असाही सवाल केला. ते म्हणाले, “निवडणुका झाल्यानंतर सरकार स्थापन होणं ही सकारात्मक गोष्ट आहे. पाठिंब्याच्या पत्रासाठी शिवसेनेला वाजवी कालावधी देणं आवश्यक होतं. त्यामुळे राज्यपालांनी किमान काही वेळ देऊन सकारात्मकता दाखवली असती, तर राज्यपालांनाही तोडगा काढायचा आहे हे यातून दिसलं असतं. मात्र, तसं होताना दिसत नाही. म्हणजे ठरवून राज्याला राष्ट्रपती राजवटीच्या दरीत लोटायचं आहे का असा प्रश्न उपस्थित होतो.”

“संविधानाच्या अनुच्छेद 172 चा उद्देशच सरकार स्थापन होऊ देणं, वेळेची मर्यादा नाही”

कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी आपली भूमिका मांडताना संविधानाच्या अनुच्छेद 172 चा आधारही घेतला. असिम सरोदे म्हणाले, “राज्यपाल भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसपासून अगदी मनसेपर्यंत विचारणा करु शकतात. हे सर्वच पक्ष दावा करु शकतात. मात्र, भाजपने सरकार स्थापनेचा दावाच केलेला नाही. त्यांनी थेट नकार दिला आहे. सरकार स्थापनेसाठी पहिला दावा शिवसेनेने केला आहे. संविधानाच्या अनुच्छेद 172 नुसार राज्यपालांवर सरकार स्थापनेसाठी वेळेचं बंधन कोठेही घातलेलं नाही. त्यामुळे राज्यपालांनी वेळ वाढवून देण्यात काहीही अडचण नव्हती.

‘कुणाचं सरकार स्थापन होऊ न देणं किंवा त्यात आडकाठी घालणं हे राज्यपालांचं काम नाही’

असिम सरोदे म्हणाले, “संविधानाच्या अनुच्छेद 172 चा उद्देशच सरकार स्थापन होऊ देणं असा आहे. कुणाचं सरकार स्थापन होऊ न देणं किंवा त्यात आडकाठी घालणं हे राज्यपालांचं काम किंवा भूमिका नाही. त्यामुळे कुणी वाजवी वेळ मागितला असेल, तर तो द्यायला हवा. 8 किंवा 15 दिवसांचा वेळ देऊच नये. मात्र, किमान 3 दिवसांची मागणी असताना 1 दिवसाचा वेळ देणं हे अनुचित ठरलं नसतं.”

आता राज्यपालांनी इतर पक्षांना विचारलं आणि त्यांनी सरकार स्थापनेसाठी नकार दिला, तर पुन्हा शिवसेना राज्यपालांकडे सरकार स्थापनेसाठी दावा करु शकतात. त्यानंतर राज्यपाल पुन्हा शिवसेनेला संधी देऊ शकतात. सर्वात शेवटी कोणताही पक्ष सरकार स्थापनेचा दावा करु शकला नाही, तर राज्यपाल राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करु शकतात. त्याआधी ते विधानसभा स्थगित करु शकतात. त्यानंतर विधानसभा विसर्जित होत नाही. ते स्वतः कारभार हातात घेऊन बिनसनदी अधिकाऱ्यांच्या मदतीने राज्य चालवतात, असंही असिम सरोदे यांनी सांगितलं.

असिम सरोदे म्हणाले, “दरम्यानच्या काळात काही घडामोडी झाल्या, कुणाला सरकार स्थापन करायचं असेल तर तीही संधी मिळेल. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लावावी, असं संविधानाला अपेक्षित आहे. अखेर मध्यावधी निवडणुका घेणं हाच एक पर्याय राहिल.”

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या