AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nirmala Sitharaman : देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर निरीक्षक निर्मला सीतारमण म्हणाल्या…..

Nirmala Sitharaman : "लोकांनी त्यांच्या अनुभवानुसार काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडी सरकार त्यामुळे महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाच्या कामात व्यत्यत आला होता. त्यामुळे लोक वैतागले होते. त्यामुळे राज्यात काय चाललंय असं लोकांच्या मनात होतं"

Nirmala Sitharaman : देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर निरीक्षक निर्मला सीतारमण म्हणाल्या.....
Nirmala Sitharaman
| Updated on: Dec 04, 2024 | 12:24 PM
Share

“नवनिर्वाचित गटनेते देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा. या निवडणुकीत महाराष्ट्रातील 14 कोटी जनता जर्नादनचा निर्णय हा संपूर्ण भारतासाठी संदेश आहे. ही नियमित विधानसभा निवडणूक नव्हती. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील ही निवडणूक त्याआधी हरियाणाची निवडणूक यातून जनतेचा संदेश स्पष्ट आहे. हे अभूतपूर्व यश हा विकसित भारतासाठी संदेश आहे” असं निर्मला सीतारमण म्हणाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या महाराष्ट्र भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेता निवडीसाठी निरीक्षक म्हणून मुंबईत आल्या आहेत. विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये त्यांनी भाषण केलं.

“लोकांनी त्यांच्या अनुभवानुसार काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडी सरकार त्यामुळे महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाच्या कामात व्यत्यत आला होता. त्यामुळे लोक वैतागले होते. त्यामुळे राज्यात काय चाललंय असं लोकांच्या मनात होतं. त्यामुळेच त्यांनी हा कौल दिला आहे. त्यामुळे हा कौल तुम्ही योग्य पद्धतीने पुढे न्याल. डबल इंजिनचं सरकार मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या भविष्यासाठी पुढे न्याल” असं निर्मला सीतारमण म्हणाल्या.

स्टार्टअपसाठी मोठं योगदान

“निवडणुकीतील घोषणा तुम्ही पूर्ण कराल. राज्यातील काँग्रेसच्या काळातील सरकारमध्ये जनतेचं कसं नुकसान झालं हे लोकांना दाखवून आपल्याला पुढे जायचं आहे. शेतकरी, उद्योग आणि कोणत्याही क्षेत्रातील कामे असतील ती पुढे न्यायची आहेत. एआयमध्ये आपले तरुण स्टार्टअपसाठी मोठं योगदान देत आहेत. त्यांना महाराष्ट्रात आणखी प्रोत्साहन मिळालं पाहिजे. मुंबई आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे स्टार्टअपमध्ये आपण मोठं योगदान देऊ शकतो” असं निर्मला सीतारमण म्हणाल्या.

Follow Us
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव.
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी.
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका.
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.