AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना शिवसेना, ना अकाली, पासवानांच्या निधनानंतर NDA जवळपास रिकामी, एकट्या आठवलेंवर भाजपची भिस्त

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान मोदींच्या मंत्रीमंडळात मित्र पक्षांचं स्थान नसल्यासारखं झालं आहे.

ना शिवसेना, ना अकाली, पासवानांच्या निधनानंतर NDA जवळपास रिकामी, एकट्या आठवलेंवर भाजपची भिस्त
| Updated on: Oct 10, 2020 | 12:59 PM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (Ram Vilas Paswan) यांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात मित्र पक्षांचं स्थान नसल्यासारखंच आहे. मोदींचं मंत्रिमंडळ आता केवळ नावापुरतं एनडीएचं (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) मंत्रिमंडळ आहे. पासवानांच्या मृत्यूनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात केवळ एकच मंत्री हे गैरभाजपचे आहेत. उर्वरीत सर्व मंत्री हे भाजपचे आहेत. (After Ram Vilas Paswan demise only one non bjp face in nda cabinet now)

पंतप्रधान मोदींनी दुसऱ्यांदा सरकार स्थापन करताना पूर्वीपेक्षा लहान मंत्रीमंडळ बनवलं होतं. गेल्या दिड वर्षात एक-एक करुन वेगवेगळ्या कारणांमुळे भाजपचे मित्रपक्ष एनडीएमधून बाहेर पडले आहेत. त्यामुळे आता केवळ एकाच पक्षाचे केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान आहे.

गेल्या काही महिन्यांपासून मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या येत आहेत. परंतु त्याबद्दल अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. यंदाच्या नवरात्रीदरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी सुरुवातीला चर्चा होती. परंतु आता पीएम मोदी बिहार निवडणुकीदरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करतील, अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

कॅबिनेटमध्ये 57 मंत्री होते

पीएम मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात बनवलेल्या मंत्रिमंडळात सुरुवातीला 57 मंत्री होते. त्यावेळी जदयू आणि अपना दल या पक्षांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नव्हते. त्यावेळी अशी चर्चा सुरु होती की, मोदी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करतील. त्यामध्ये या दोन पक्षांना स्थान दिले जाईल.

मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद दिले होते. परतु महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. शिवसेनेने राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली आहे.

आता फक्त आठवलेंवर भिस्त

अकाली दलच्या हरसिमरत कौर यांनी नव्या कृषी कायद्याला विरोध करत केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान लोजपाचे रामविलास पासवान यांचे निधन झाले आहे. त्यामुळे आता केंद्रीय मंत्रिमंडळात केवळ एक मंत्री गैरभाजप पक्षाचे आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले केंद्रिय मंत्रीमंडळात सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत.

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात मराठीचा आग्रह संविधानविरोधी, आठवलेंना भय्यांचा पुळका

Ram Vilas Paswan | रामविलास पासवान : राजकीय हवेचा अंदाज अचूक ओळखणारा नेता

Ram Vilas Paswan | रामविलास पासवान यांच्या जाण्याने देशाने द्रष्टा नेता गमावला: राष्ट्रपती रामनाथ कोविंद

(After Ram Vilas Paswan demise only one non bjp face in nda cabinet now)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.