AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नगर-धुळ्यात मनपा निवडणुकीचा प्रचार थंडावला, उद्या मतदान

मुंबई : अहमदनगर आणि धुळे महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अखेर थंडावला आहे. उद्या म्हणजे 9 डिसेंबर रोजी दोन्ही महापालिकांसाठी मतदान होणार आहे. दोन्ही ठिकाणी सर्वच पक्षांनी आपापली प्रतिष्ठा पणाला लावली. अगदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही सभा घेतल्या. त्यामुळे निवडणुकीची चुरस आणखी वाढली आहे. उद्या या दोन्ही शहरातील मतदार आपली मतं देतील आणि पुढील सत्ताधारी ठरवतील. अहमदनगर महापालिका निवडणूक […]

नगर-धुळ्यात मनपा निवडणुकीचा प्रचार थंडावला, उद्या मतदान
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM
Share

मुंबई : अहमदनगर आणि धुळे महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अखेर थंडावला आहे. उद्या म्हणजे 9 डिसेंबर रोजी दोन्ही महापालिकांसाठी मतदान होणार आहे. दोन्ही ठिकाणी सर्वच पक्षांनी आपापली प्रतिष्ठा पणाला लावली. अगदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही सभा घेतल्या. त्यामुळे निवडणुकीची चुरस आणखी वाढली आहे. उद्या या दोन्ही शहरातील मतदार आपली मतं देतील आणि पुढील सत्ताधारी ठरवतील.

अहमदनगर महापालिका निवडणूक

अहमदनगरच्या पालिकेसाठी एकूण 68 जागांसाठी निवडणूक होत आहे. प्रचाराच्या तोफा थंडवल्या असून उद्या 9 डिसेंबरला मतदान पार पडणार आहे. तर मतदारांना प्रलोभन दाखवले जाऊ नये, धमकावले जाऊ नये, पुढील काळात पैसे वाटप होऊ नये, यासाठी आता प्रभागनिहाय एकूण 23 पथके तैनात करण्यात आली आहेत. कुणी उमेदवार मतदारांना प्रलोभन दाखवत असल्यास तक्रार करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त आणि निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी मोबाईल क्रमांक जाहीर केला आहे. नागरिकांना त्यावर तक्रार करण्याचे अवाहन करण्यात आले आहे. तसेच मतमोजणी होईपर्यंत शहरात ‘ड्राय डे’ जाहीर॒ करण्यात आला आहे. त्याचबरोबर शहरातील प्रमुख ८ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.

सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेला बंदोबस्त :

  • अप्पर पोलीस अधीक्षक – 2
  • पोलीस अधीक्षक – 6
  • पोलीस निरीक्षक – 22
  • उपपोलिस निरीक्षक – 85
  • पोलीस कर्मचारी – 1000
  • होमगार्ड – 500
  • एसआरपीएफ जवान – 150
  • आरसीपी जवान – 150

73 इमारतीत 367 मतदान केंद्र राहणार आहेत. यातील केडगाव, सारसनगर आणि मुकुंदनगर येथील 11 इमारतीतील 41 केंद्र अतिसंवेदनशील आहेत, तर 137 संवेदनशील आहेत.

त्याचबरोबर, निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत असून निवडणूक यंत्रणेची सर्व सज्जता झाली आहे, तसेच 337 मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेले सुमारे 2 हजारांवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. तर निवडणुकीसाठी 17 प्रभागांतील प्रत्येकी 4 याप्रमाणे 68 जागांसाठी 339 उमेदवार रिंगणात आहेत. मतदारांची संख्या 2 लाख 56 हजार 719 आहे.

अहमदनगरमध्ये कुठल्या पक्षाचे किती उमेदवार रिंगणात?

  • भाजप – 68
  • शिवसेना – 64
  • राष्ट्रवादी-काँग्रेस – 64
  • मनसे – 14
  • बसपा – 9
  • आप – 8
  • कम्युनिस्ट पार्टी – 3
  • समाजवादी पक्ष – 4
  • रासप – 4
  • भारिप- बहुजन – 1
  • अपक्ष – 106
  • एकूण – 339

Follow Us
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.