AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरक्षणासाठी एमआयएमचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबई : धनगर समाजाचा प्रश्न पुढच्या अधिवेशनात सोडवणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. पण मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दाही पुन्हा चर्चेचा विषय ठरलाय. विरोधकांनी सरकारला विधानसभेत जाब विचारला आणि विशेष म्हणजे पहिल्यांदाच फडणवीस सरकार मुस्लिमांच्या आरक्षणाबद्दल सकारात्मक दिसलं. मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 16 टक्के आरक्षण मिळालंय. धनगरांच्या आरक्षणासंदर्भात पुढच्या अधिवेशनात एटीआर येणार आहे. तर […]

आरक्षणासाठी एमआयएमचा कोर्टात जाण्याचा इशारा
| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM
Share

मुंबई : धनगर समाजाचा प्रश्न पुढच्या अधिवेशनात सोडवणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. पण मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दाही पुन्हा चर्चेचा विषय ठरलाय. विरोधकांनी सरकारला विधानसभेत जाब विचारला आणि विशेष म्हणजे पहिल्यांदाच फडणवीस सरकार मुस्लिमांच्या आरक्षणाबद्दल सकारात्मक दिसलं.

मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 16 टक्के आरक्षण मिळालंय. धनगरांच्या आरक्षणासंदर्भात पुढच्या अधिवेशनात एटीआर येणार आहे. तर आता मुस्लिमांच्या आरक्षणाचं कसं? हा मुद्दा मुस्लीम आमदार आणि राष्ट्रवादीने विधानसभेत लावून धरला आणि सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. अजित पवार आणि नसिम खान यांनी सरकार भेदभाव करत असल्याचा आरोप केला. तर एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी आरक्षणासाठी कोर्टात धाव घेणार असल्याचा इशारा दिलाय.

विरोधक आक्रमक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुस्लीम आरक्षणावर आपली बाजू मांडली. काही जाती मागास असतील तर मागासवर्ग आयोगाकडे प्रकरण पाठवणार असं सांगून एकप्रकारे सकारात्मकता दाखवली.

2014 चा विचार केला तर मराठ्यांबरोबरच मुस्लीम समाजाला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने आरक्षण दिलं होतं. पण हायकोर्टाने मुस्लीम समाजाच्या 5 टक्के आरक्षणावर स्थगिती आणली. तर शैक्षणिक आरक्षण सुरु ठेवलं. मात्र 2 मार्च 2015 ला फडणवीस सरकारने हे आरक्षण रद्द केलं.

सध्या आरक्षणाचा मुद्दा गाजतोय. 2019 च्या लोकसभा निवडणुकीला अवघे सहा महिने शिल्लक आहेत. आता फडणवीस सरकाने मुस्लीम आरक्षणाबाबत काहीसं सकारात्मक झालं असलं तरी पुढं काय घडतं हेही लवकरच कळेल.

Follow Us
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.