AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar NCP : चुकीला माफी नाही, अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, अजित पवार यांच्या पक्षाकडून डायरेक्ट वॉर्निंग

Ajit Pawar NCP : "संतोष देशमुख यांच्या हत्येपेक्षाही भयंकर आणि निर्घृण हत्या पंडित देशमुख यांची झाली होती. हायकोर्टात याविरोधात याचिका दाखल आहे. मात्र 20 वर्षात ही केस बोर्डात आहे. हायकोर्टातील मोठ्या अधिकाऱ्याला हाताशी धरून ही केस बोर्डावर येऊ दिली नाही"

Ajit Pawar NCP : चुकीला माफी नाही, अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, अजित पवार यांच्या पक्षाकडून डायरेक्ट वॉर्निंग
Ajit Pawar NCP
| Updated on: Nov 20, 2025 | 4:55 PM
Share

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपरिषदेची निवडणूक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. सध्या महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. अनगर नगरपरिषदेत 17 पैकी 17 जागा भाजपने बिनविरोध जिंकल्या. आमदार राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील नगराध्यक्षपदी निवडून आल्या. विजयाच्या जल्लोषात राजन पाटील यांचे सुपूत्र बाळराजे पाटील यांनी अजित पवारांना आव्हान दिलं होतं. त्यानंतर बाळराजे राजन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य मागे घेतलं. जाहीर दिलगिरी व्यक्त केली.

आता बाळराजे पाटलांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिलेल्या चॅलेंजनंतर उमेश पाटील आक्रमक झाले आहेत. “पाटलाला माफी नाही. आमच्याकडे चुकीला माफी नाही. अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार” असं उमेश पाटील म्हणाले. ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. “बाळराजे पाटलाने मोहोळच्या पंडित देशमुख यांची हत्या केली. त्यातून तो निर्दोष मुक्त झाला असला तरी हायकोर्टात यावर याचिका आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येपेक्षाही भयंकर आणि निर्घृण हत्या पंडित देशमुख यांची झाली होती. हायकोर्टात याविरोधात याचिका दाखल आहे. मात्र 20 वर्षात ही केस बोर्डात आहे. हायकोर्टातील मोठ्या अधिकाऱ्याला हाताशी धरून ही केस बोर्डावर येऊ दिली नाही” असा दावा उमेश पाटील यांनी केला.

कारण गटार म्हटलं की त्यांना राग येतो

“पालकमंत्री गोरे हे चांगले नेते आहेत. ते सोलापूर जिल्ह्यासाठी वेळ देत आहेत. मात्र भाजपाला लक्षात आले आहे की, मोहोळमध्ये फुलायचं असेल, तर डबक्याची गरज आहे. डबक्याची म्हणतोय कारण गटार म्हटलं की त्यांना राग येतो. म्हणून त्यांनी राजन पाटील या डबल्याला पक्षात घेतलय. मात्र पवार कुटुंबाने यांच्यावर एवढे वर्षे उपकार केले. त्यानंतर 15 दिवसापूर्वी पक्ष बदलल्यावर ते अजितदादांबाबत अशी भाषा वापरत आहेत. त्यामुळे आगामी काळात हे मुख्यमंत्री किंवा पालकमंत्री यांच्याबद्दल बोलायला मागे पडणार नाहीत” असं उमेश पाटील म्हणाले.

Follow Us
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार.