निकालाआधीच हा पक्ष एनडीएची साथ सोडण्याच्या तयारीत

इंफाळ, मणिपूर : लोकसभा निकालापूर्वीच भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीएमध्ये प्रादेशिक स्तरावर धुसफूस असल्याचं दिसतंय. भाजप आमचे विचार आणि मतांना किंमत देत नसल्याची तक्रार नागा पीपल्स फ्रंट या पक्षाने केली आहे. मणिपूरमध्ये भाजपच्या नेतृत्त्वातील युतीमध्ये रहायचं की नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी एनपीएफने शनिवारी बैठक बोलावली आहे. दुसरीकडे मित्र पक्षाने केलेला हा आरोप भाजपने फेटाळलाय. भाजप आम्हाला तुच्छ […]

निकालाआधीच हा पक्ष एनडीएची साथ सोडण्याच्या तयारीत
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM

इंफाळ, मणिपूर : लोकसभा निकालापूर्वीच भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीएमध्ये प्रादेशिक स्तरावर धुसफूस असल्याचं दिसतंय. भाजप आमचे विचार आणि मतांना किंमत देत नसल्याची तक्रार नागा पीपल्स फ्रंट या पक्षाने केली आहे. मणिपूरमध्ये भाजपच्या नेतृत्त्वातील युतीमध्ये रहायचं की नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी एनपीएफने शनिवारी बैठक बोलावली आहे. दुसरीकडे मित्र पक्षाने केलेला हा आरोप भाजपने फेटाळलाय. भाजप आम्हाला तुच्छ समजत असल्याचा आरोप एनपीएफचे प्रदेशाध्यक्ष अवांगबू नेवमई यांनी केला.

2016 मध्ये विविध पक्ष एकत्र येत मणिपूरमध्ये सत्ता स्थापन केल्यापासून भाजपने कधीही या युतीच्या मूळ भावनेचा आदर केला नाही. अनेकदा त्यांच्या नेत्यांनी आमच्या नेत्यांना मित्रपक्षाचा सहकारी मानण्यास नकारही दिला, असा आरोप एनपीएफने केलाय. 60 सदस्य असलेल्या मणिपूर विधानसभेत एनपीएफचे चार आमदार आहेत. या चारपैकी एका आमदाराला मंत्रीपद देण्यात आलंय. भाजपने मित्रपक्षांना दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलं नसल्याचा आरोप एनपीएफच्या प्रदेशाध्यक्षांनी केला.

एनपीएफने भाजपला नेहमी मोठा भाऊ मानलंय, पण त्यांनी कधीही या भावनेचा आदर केला नाही. आम्हाला योग्य तो सन्मान दिला जात नाही, असा आरोप नेवमई यांनी केला. भाजपनेही एनपीएफचे आरोप फेटाळले आहेत. एनपीएफने सत्तेत सहभागी होताना मंत्रीपद नको असं सांगितलं होतं. पण आता त्यांच्या अनेक मागण्या असल्याचं दिसतंय. एनपीएफच्या मागण्या पूर्णपणे निराधार आहेत. सरकार नीट चालवण्यासाठी मित्रपक्षांना हवी ती सुविधा दिली आहे, असं भाजपचे प्रवक्ते सीएच बिजॉय यांनी म्हटलंय.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनीही एनपीएफच्या आरोपांवर उत्तर दिलंय. एनपीएफच्या ज्या मागण्या आहेत, त्यावर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं ते म्हणाले. सरकार स्थापन करताना आमच्यात एकमत होतं, पण काही कारणास्तव त्यांच्या मागण्या अजून मान्य झालेल्या नाहीत. निकालानंतर या मागण्यांवर योग्य तो निर्णय होईल, असं बिरेन सिंग यांनी सांगितलं.

60 जागा असलेल्या मणिपूर विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने 28, भाजपने 21, एनपीएफ 04, एनपीपी 04, एआयटीसी 01 आणि एका अपक्षाने विजय मिळवला होता. सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतरही काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली नव्हती. कारण, स्थानिक पक्षांनी काँग्रेससोबत जाण्यासाठी नकार दिला होता.

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.