AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निकालाआधीच हा पक्ष एनडीएची साथ सोडण्याच्या तयारीत

इंफाळ, मणिपूर : लोकसभा निकालापूर्वीच भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीएमध्ये प्रादेशिक स्तरावर धुसफूस असल्याचं दिसतंय. भाजप आमचे विचार आणि मतांना किंमत देत नसल्याची तक्रार नागा पीपल्स फ्रंट या पक्षाने केली आहे. मणिपूरमध्ये भाजपच्या नेतृत्त्वातील युतीमध्ये रहायचं की नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी एनपीएफने शनिवारी बैठक बोलावली आहे. दुसरीकडे मित्र पक्षाने केलेला हा आरोप भाजपने फेटाळलाय. भाजप आम्हाला तुच्छ […]

निकालाआधीच हा पक्ष एनडीएची साथ सोडण्याच्या तयारीत
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM
Share

इंफाळ, मणिपूर : लोकसभा निकालापूर्वीच भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीएमध्ये प्रादेशिक स्तरावर धुसफूस असल्याचं दिसतंय. भाजप आमचे विचार आणि मतांना किंमत देत नसल्याची तक्रार नागा पीपल्स फ्रंट या पक्षाने केली आहे. मणिपूरमध्ये भाजपच्या नेतृत्त्वातील युतीमध्ये रहायचं की नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी एनपीएफने शनिवारी बैठक बोलावली आहे. दुसरीकडे मित्र पक्षाने केलेला हा आरोप भाजपने फेटाळलाय. भाजप आम्हाला तुच्छ समजत असल्याचा आरोप एनपीएफचे प्रदेशाध्यक्ष अवांगबू नेवमई यांनी केला.

2016 मध्ये विविध पक्ष एकत्र येत मणिपूरमध्ये सत्ता स्थापन केल्यापासून भाजपने कधीही या युतीच्या मूळ भावनेचा आदर केला नाही. अनेकदा त्यांच्या नेत्यांनी आमच्या नेत्यांना मित्रपक्षाचा सहकारी मानण्यास नकारही दिला, असा आरोप एनपीएफने केलाय. 60 सदस्य असलेल्या मणिपूर विधानसभेत एनपीएफचे चार आमदार आहेत. या चारपैकी एका आमदाराला मंत्रीपद देण्यात आलंय. भाजपने मित्रपक्षांना दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलं नसल्याचा आरोप एनपीएफच्या प्रदेशाध्यक्षांनी केला.

एनपीएफने भाजपला नेहमी मोठा भाऊ मानलंय, पण त्यांनी कधीही या भावनेचा आदर केला नाही. आम्हाला योग्य तो सन्मान दिला जात नाही, असा आरोप नेवमई यांनी केला. भाजपनेही एनपीएफचे आरोप फेटाळले आहेत. एनपीएफने सत्तेत सहभागी होताना मंत्रीपद नको असं सांगितलं होतं. पण आता त्यांच्या अनेक मागण्या असल्याचं दिसतंय. एनपीएफच्या मागण्या पूर्णपणे निराधार आहेत. सरकार नीट चालवण्यासाठी मित्रपक्षांना हवी ती सुविधा दिली आहे, असं भाजपचे प्रवक्ते सीएच बिजॉय यांनी म्हटलंय.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनीही एनपीएफच्या आरोपांवर उत्तर दिलंय. एनपीएफच्या ज्या मागण्या आहेत, त्यावर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं ते म्हणाले. सरकार स्थापन करताना आमच्यात एकमत होतं, पण काही कारणास्तव त्यांच्या मागण्या अजून मान्य झालेल्या नाहीत. निकालानंतर या मागण्यांवर योग्य तो निर्णय होईल, असं बिरेन सिंग यांनी सांगितलं.

60 जागा असलेल्या मणिपूर विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने 28, भाजपने 21, एनपीएफ 04, एनपीपी 04, एआयटीसी 01 आणि एका अपक्षाने विजय मिळवला होता. सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतरही काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली नव्हती. कारण, स्थानिक पक्षांनी काँग्रेससोबत जाण्यासाठी नकार दिला होता.

29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.