AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहाटेच्या शपथविधीवर अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

महिला दिनानिमित्त घेतलेल्या अमृता फडणवीस यांनी 'टीव्ही 9 मराठी'शी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तर (Amruta Fadnavis Interview) दिली.

पहाटेच्या शपथविधीवर अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
| Updated on: Mar 07, 2020 | 4:36 PM
Share

मुंबई : “गेल्या महिन्यात काही माणसांची खरी ओळख (Amruta Fadnavis Interview) पटली. कोण आपलं हे कळलं. लोकं कसे वागू शकतात. राजकारणात कुणीही कुणाला धोका देऊ शकतं हे कळलं,” अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दिली. महिला दिनानिमित्त घेतलेल्या ‘टीव्ही 9 मराठी’शी खास संवाद साधला. यावेळी अमृता फडणवीसांनी अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तर दिली.

देवेंद्र फडणवीसांनी पहाटे मुख्यमंत्रिपदाची (Amruta Fadnavis Interview) शपथ घेतली होती, त्या शपथविधीबाबत काय वाटतं? असा प्रश्न अमृता फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या, “मला त्या पहाटे 3 ते 4 वाजता कळलं की उद्या शपथविधी होणार आहे. मी त्या शपथविधीला उपस्थित होते. आजही मला ते प्रसंग आठवतात. तेव्हा त्यावरुन हसायला येतं. पण मी त्या अनुभवातून खूप काही शिकले.”

एकाच दिवशी वाढदिवस, एकाच दिवशी शपथ, एकाच दिवशी राजीनामा

देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी 23 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी आठ वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. तर अजित पवारांनी फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र त्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच म्हणजे 26 नोव्हेंबर रोजी 2019 दुपारी 4 वाजता त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात अल्पकालीन मुख्यमंत्री ठरले होते.

ठाकरे सरकारचं काम सुरुचं नाही

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचे काम अजून सुरु झालेले नाही. त्यांचं काम सगळं पेपरवर आहे. त्यांचं काम दिसेल तेव्हा मी बोलेन,” असेही अमृता फडणवीस म्हणाल्या.

“देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या माणसाला ज्यांनी महिला सक्षमीकरणासाठी कायम आवाज उठवला. अशा माणसाला महिलांची माफी मागायला सांगितली हे पटलं नाही,” असेही अमृता फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

विशेष म्हणजे अमृता फडणवीसांनी यावेळी टीका करणाऱ्यांना धन्यवाद दिले. “मी टीकाकारांना धन्यवाद देते. त्यांनी मला आणखी सशक्त बनवलं.”

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. रश्मी ठाकरे या खूप लोकांच्या आदर्श आहेत. त्यांचं आणि माझं बाँडिग चांगलं आहे. असे अमृता फडणवीस (Amruta Fadnavis Interview) म्हणाल्या.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.