AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना म्हणजे ‘प्राण जाये पर वचन न जाये’; जावडेकरांच्या ‘त्या’ आरोपांवर सावंतांचे प्रत्युत्तर

'प्राण जाये पर वचन न जाये' हे वचन शिवसेना पाळते, असे प्रत्युत्तर शिवसेना नेते अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी दिले.

शिवसेना म्हणजे 'प्राण जाये पर वचन न जाये'; जावडेकरांच्या 'त्या' आरोपांवर सावंतांचे प्रत्युत्तर
| Updated on: Dec 08, 2020 | 8:54 PM
Share

मुंबई : “गद्दारी आणि शिवसेना हा शब्दच लागू पडू शकत नाही. ‘प्राण जाये पर वचन न जाये’ हे वचन शिवसेना पाळते, असे प्रत्युत्तर शिवसेना नेते अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी भाजप नेते प्रकाश जावडेकर यांना दिले. राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना “महाराष्ट्रात जे काही झालं ते शिवसेनेच्या गद्दारीमुळे झाले. भविष्यात त्यांना या सगळ्याचे परिणाम भोगावे लागतील,” असा इशारा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शिवसेनेला मंगळवारी (8 डिसेंबर) दिला. त्यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर म्हणून सावंत यांनी वरिल वक्तव्य केले. ते मुंबईत ‘टिव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (Arvind Sawant replied to Prakash Javadekar criticism)

“मला आश्चर्य वाटतं प्रकाश जावडेकर यांचा तोल गेलाय. सहसा ते असे वक्तव्य करत नाहीत. पण दुर्दैवाने ते असे बोलले असतील. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या जागा कमी करुन त्या 56 जागांवर कशा आणाव्यात याचा विचार कोण करत होतं? गोव्याचे मुख्यमंत्री सिंधुदुर्गात ठाण मांडून का बसले होते?,” असे सावंत म्हणाले. तसेच, शिवसेनेच्या जागा कमी करण्याचा प्रयत्न करणे ही गद्दारी होती की इमानदारी होती, असा सवालही त्यांनी जावडेकर यांना विचारला.

अमित शाहा उत्तर न देता हरियाणाला गेले

“राज्याच्या मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपने शिवसेनेला शब्द दिला आहे, की नाही याचे उत्तर अमित शाहा यांनी दिले नाही. ते उत्तर न देता ते हरियाणाला गेले. सत्याला सामोरं जाण्यासाठी धारिष्ट्य लागतं. अमित शाहा गेले ते आलेच नाहीत. याच कारणामुळे महाराष्ट्राने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेला साथ दिली.” तसेच, विधानपरिषदेच्या निकालामुळे महाराष्ट्र त्यांच्या बाजूने उभा असल्याचंही ते म्हणाले.

प्रकाश जावडे कर काय म्हणाले ?

महाराष्ट्रात जे काही झालं ते शिवसेनेच्या गद्दारीमुळे झाले. भविष्यात त्यांना या सगळ्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा प्रकाश जावडेकर (BJP Prakash Javdekar) यांनी दिला. यावेळी त्यांनी कृषी कायद्यांचे जोरदार समर्थन केले. कृषी कायद्यांबाबत 95 टक्के शेतकऱ्यांना कसलीही समस्या नाही. पाच ते दहा टक्के शेतकऱ्यांचा गैरसमज आहे. तो आम्ही लवकर दूर करू. पंजाबमध्ये सरकारकडून सर्वात जास्त धान्य खरेदी झाली. मात्र, तेथील शेतकऱ्यांचा हमीभावाविषयी गैरसमज झाला आहे. अनेकदा गैरसमज दूर करायला वेळ लागतो. पण उद्याच्या बैठकीत सगळे गैरसमज दूर होतील, असा विश्वास प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. (Arvind Sawant replied to Prakash Javadekar criticism)

संबंधित बातम्या :

शिवसेना बाळासाहेबांची शिकवण विसरली; शरद पवारांपुढे लीन झालेय: प्रविण दरेकर

‘शिवसेनेला शेतीतलं काय कळतं; फक्त मोदींच्या विरोधासाठी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा’

व्यावसायिक वाहतूक संघटनांचे पदाधिकारी कृष्णकुंजवर, राज ठाकरेंच्या भेटीनंतर दिलासा

(Arvind Sawant replied to Prakash Javadekar criticism)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…