AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी इंजिनीअरिंगचा विद्यार्थी, युतीचा प्रयोग करुन पाहिला : अखिलेश यादव

भाजपला हरवण्यासाठी एकत्र आलेल्या सपा आणि बसपा यांची युती पाच महिन्यातच तुटली. युती तोडण्याची घोषणा करताना बसपा प्रमुख मायावती यांनी सपावर काही आरोपही केले आहेत.

मी इंजिनीअरिंगचा विद्यार्थी, युतीचा प्रयोग करुन पाहिला : अखिलेश यादव
| Edited By: | Updated on: Jun 05, 2019 | 6:39 PM
Share

लखनौ : उत्तर प्रदेशात भाजपला शह देण्यासाठी एकत्र आलेल्या सपा आणि बसपा यांची युती औटघटकेची ठरली. ही युती निवडणुकीपुरतीच आहे, असा दावा भाजपकडून केला जात होता आणि भाजपची भविष्यवाणी अखेर खरी ठरली. बसपा प्रमुख मायावती यांनी आगामी पोटनिवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. एक इंजिनीअरिंगचा विद्यार्थी म्हणून प्रयोग करुन पाहिला, असं उत्तर त्यांनी दिलंय.

सपाला यादवांची मतं मिळवता आली नाही, अखिलेश यादव यांना त्यांच्या पत्नीलाही जिंकून आणता आलं नाही, असा आरोप मायावती यांनी केला होता. युती तुटल्याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही, असं उत्तर यापूर्वी अखिलेश यादव यांनी दिलं होतं. मायावती यांनी उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या 11 जागांसाठी होणारी पोटनिवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या 10 वर्षांपासून बसपाने एकही पोटनिवडणूक लढवलेली नाही. पण यावेळी ही भूमिका बदलली आहे.

मायावती यांनी निकालानंतर पहिल्यांदाच पक्षाची बैठक घेतली आणि युतीचा कोणताही फायदा झाला नसल्याचं सांगितलं. यादवांची मतं मिळाली नाही. जर ही मतं मिळाली असती तर सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या कुटुंबातलेच लोक हरले नसते. सपाच्या कित्येक लोकांनी युतीविरोधात काम केलं. मुस्लिमांनी आपल्याला पूर्ण साथ दिली, असं मायावती म्हणाल्या.

उत्तर प्रदेशातील अनेक आमदार खासदार म्हणून निवडून गेले आहेत. दोन्ही सभागृहांसाठी निवड झाल्यानंतर एक जागा रिक्त करणं अनिवार्य आहे. रिक्त जागेवर सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेतली जाते. उत्तर प्रदेशातील अनेक आमदार हे खासदार झाल्यामुळे पोटनिवडणूक होणार आहे.

रामपूर सदर, जलालपूर, बलहा, जैदपूर, माणिकपूर, गंगोह, प्रतापगड, गोविंद नगर, लखनौ कँट, टुडला, इगलास, हमीरपूर या जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहेत. गेल्या निवडणुकीत इथे भाजपने 71 जागा जिंकल्या होत्या. पण यावेळी सपा आणि बसपाचं आव्हान असेल असा अंदाज लावला जात होता. पण भाजपने सर्व अंदाज खोटे ठरवत दणदणीत यश मिळवलं. तरीही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काही जागा मात्र कमी झाल्या आहेत. यावेळी भाजपने 62, सपा-बसपा 15, काँग्रेस 01 आणि अपना दलने 02 जागा जिंकल्या आहेत.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.