AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसला सरकारमध्ये इज्जत नाही, आधी जनतेने झिडकारलं, आता महाविकास आघाडी : आशिष शेलार

आशिष शेलार यांनी औरंगाबादमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर निशाणा साधला (Ashish Shelar slams congress).

काँग्रेसला सरकारमध्ये इज्जत नाही, आधी जनतेने झिडकारलं, आता महाविकास आघाडी : आशिष शेलार
| Updated on: Nov 19, 2020 | 3:57 PM
Share

औरंगाबाद : “काँग्रेसला सरकारमध्ये इज्जत नाही हे पूर्ण सत्य आहे. त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी पायपीट करावी लागते. काँग्रेसला आधी जनतेने झिडकारलं, त्यानंतर आता महाविकास आघाडीनेही झिडकारलं”, अशी खोचक टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारानिमित्ताने शेलार आज (19 नोव्हेंबर) औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. दरम्यान, औरंगाबादमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला (Ashish Shelar slams congress).

“वीजबिलाचा मुद्दा हा आमचा आहे. आमच्या मुद्द्यावर मनसे आंदोलन करत आहे. महाविकास आघाडीने लबाडी केली. याला जनता कधीच माफ करणार नाही. वीजबिलात आधी सवलत देऊ म्हणणाऱ्या नेत्यांना पक्षातील नेत्यांनीच किंमत दिली नाही. त्यामुळे त्यांना हे विधान करावं लागतं. आम्ही चेतावणी देऊ, झोपडीत राहणाऱ्याला जास्त बिल कसं येतं? याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल, आम्ही पाठ सोडणार नाही”, असा घणाघात शेलार यांनी केला.

“तुमच्या झेंड्याची शुद्धीकरण करण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्यवीर सावकरांची बदनामी करणाऱ्या पक्षासोबत ते गेले. त्यांनी आता शुद्धीकरण केलं पाहिजे”, असा खोचक सल्ला आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिला आहे. त्याचबरोबर “आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपचा भगवा झेंडा फडकेल. विकासाच्या वाटेवर जाणं अपेक्षित आहे”, असं आशिष शेलार म्हणाले.

दरम्यान, मराठवाडा पदवीधर संघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या भाजप नेते जयसिंगराव गायकवाड यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. “भाजपला पराभूत करण्यासाठीच मी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेत आहे. भाजप हा पक्ष सध्या हवेत गेला आहे. ते सध्या विमानापेक्षाही जास्त उंचीवर आहेत. मात्र, आता मी भाजपला धडा शिकवणार आहे, त्यासाठी भाजपने तयार राहावे”, असा इशारा जयसिंगराव गायकवाड यांनी दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यालादेखील आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“ज्यांना पक्षाने इतक्या उंचीवर नेलं त्यांनी पक्षाच्या उंचीबाबत बोलू नये. पक्षाने जे देता आलं ते दिल. मात्र, यापुढे अपशब्द वापरला तर आम्ही शांत बसणार नाही”, असं प्रत्युत्तर आशिष शेलार यांनी दिलं (Ashish Shelar slams congress).

“औरंगाबादेत 1680 कोटींचा पाणी योजना मंजूर केली. मात्र सरकार बदलल्याने अंमलबजावणी थांबली. रस्त्यासाठी 125 कोटी, घनकचरासाठी 80 कोटी, वॉटर ग्रीडसाठी गती देण्याच काम केलं. मात्र, ठाकरे सरकारने मराठवाड्याच्या जनतेवर अन्याय करण्याच काम केलं”, अशीदेखील टीका त्यांनी यावेळी केली.

महाविकास आघाडीच पुन्हा मतभेद?

महसलूमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नगरविकास खात्याकडून काँग्रेसच्या नगर पालिका आणि महानगर पालिकांना निधी कमी मिळाला असल्याचे सांगितले. मात्र, आगामी अर्थसंकल्पात ही त्रुटी दूर केली जाईल, असंही थोरात म्हणाले. आमच्याकडे असलेल्या खात्यांवरील अन्यायाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी देखील काही दिवसांपूर्वी काँग्रेच्या महापालिकांना निधी मिळत नसल्याचे म्हटले होते.

संबंधित बातम्या :

आमच्या खात्यांवर अन्याय होतोय ही आमची भावना, काँग्रेसची पुन्हा खदखद

भाजप हा मस्तीत आलेला पक्ष, त्यांना धडा शिकवणार, जयसिंगराव गायकवाड यांचा एल्गार

आम्ही विधान परिषदेच्या सहाच्या सहा जागा जिंकणार, कुणी पलायन केलं तरी पक्षाला फरक पडत नाही : चंद्रकांत पाटील

Follow Us
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.