AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस भाजपला विकून टाकली : इम्तियाज जलील

औरंगाबाद : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी हल्लाबोल केलाय. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस भाजपला विकून टाकली आहे, महापालिकेत निवडून येऊ शकत नाही असा उमेदवार त्यांनी लोकसभेला दिलाय, असं म्हणत इम्तियाज जलील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप केलाय. काँग्रेसने औरंगाबादमधून विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड यांनी उमेदवारी दिली […]

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस भाजपला विकून टाकली : इम्तियाज जलील
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM
Share

औरंगाबाद : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी हल्लाबोल केलाय. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस भाजपला विकून टाकली आहे, महापालिकेत निवडून येऊ शकत नाही असा उमेदवार त्यांनी लोकसभेला दिलाय, असं म्हणत इम्तियाज जलील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप केलाय.

काँग्रेसने औरंगाबादमधून विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड यांनी उमेदवारी दिली आहे. हाच धागा पकडत इम्तियाज जलील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. जे लोक महापालिकेच्या निवडणुकीत निवडून येऊ शकत नाहीत अशा लोकांना लोकसभेचं तिकीट दिलंय. त्यामुळे लोकसभेचे निकाल येतील तेव्हा स्पष्ट होईल की काँग्रेसचे दुश्मन हे बाहेरचे नाहीत, तर घरातलेच आहेत, असा घणाघाती आरोप इम्तियाज जलील यांनी काँग्रेसवर केला.

इम्तियाज जलील यांना बहुजन वंचित आघाडीकडून औरंगाबाद लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत जलील यांनी विजय मिळवला होता. औरंगाबादमध्ये मुस्लीम मतदारांची संख्या जास्त असल्याने औरंगाबाद महापालिका निवडणुकीतही जलील यांच्या नेतृत्त्वात एमआयएमचे 25 नगरसेवक निवडून आले होते.

औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून सुभाष झांबड हे मैदानात आहेत. त्यामुळे औरंगाबादच्या जागेसाठी तिरंगी लढत होईल. औरंगाबादसाठी दुसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होईल. या टप्प्यात जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या जागांचाही समावेश आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.