AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस भाजपला विकून टाकली : इम्तियाज जलील

औरंगाबाद : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी हल्लाबोल केलाय. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस भाजपला विकून टाकली आहे, महापालिकेत निवडून येऊ शकत नाही असा उमेदवार त्यांनी लोकसभेला दिलाय, असं म्हणत इम्तियाज जलील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप केलाय. काँग्रेसने औरंगाबादमधून विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड यांनी उमेदवारी दिली […]

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस भाजपला विकून टाकली : इम्तियाज जलील
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM
Share

औरंगाबाद : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी हल्लाबोल केलाय. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस भाजपला विकून टाकली आहे, महापालिकेत निवडून येऊ शकत नाही असा उमेदवार त्यांनी लोकसभेला दिलाय, असं म्हणत इम्तियाज जलील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप केलाय.

काँग्रेसने औरंगाबादमधून विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड यांनी उमेदवारी दिली आहे. हाच धागा पकडत इम्तियाज जलील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. जे लोक महापालिकेच्या निवडणुकीत निवडून येऊ शकत नाहीत अशा लोकांना लोकसभेचं तिकीट दिलंय. त्यामुळे लोकसभेचे निकाल येतील तेव्हा स्पष्ट होईल की काँग्रेसचे दुश्मन हे बाहेरचे नाहीत, तर घरातलेच आहेत, असा घणाघाती आरोप इम्तियाज जलील यांनी काँग्रेसवर केला.

इम्तियाज जलील यांना बहुजन वंचित आघाडीकडून औरंगाबाद लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत जलील यांनी विजय मिळवला होता. औरंगाबादमध्ये मुस्लीम मतदारांची संख्या जास्त असल्याने औरंगाबाद महापालिका निवडणुकीतही जलील यांच्या नेतृत्त्वात एमआयएमचे 25 नगरसेवक निवडून आले होते.

औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून सुभाष झांबड हे मैदानात आहेत. त्यामुळे औरंगाबादच्या जागेसाठी तिरंगी लढत होईल. औरंगाबादसाठी दुसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होईल. या टप्प्यात जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या जागांचाही समावेश आहे.

Follow Us
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर....
Parbhani | परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर, गावकऱ्यांची मदतीसाठी आर्त हाक!
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ!
तटकरेंचा तट तोडून आले! भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
Chhagan Bhujbal | तटकरेंचा तट तोडून आले! राज्यसभा अर्जावेळी भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस  ठेवला अन्... पुढे काय घडलं?
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच..
Bhandara | क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण....
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...