AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस भाजपला विकून टाकली : इम्तियाज जलील

औरंगाबाद : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी हल्लाबोल केलाय. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस भाजपला विकून टाकली आहे, महापालिकेत निवडून येऊ शकत नाही असा उमेदवार त्यांनी लोकसभेला दिलाय, असं म्हणत इम्तियाज जलील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप केलाय. काँग्रेसने औरंगाबादमधून विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड यांनी उमेदवारी दिली […]

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस भाजपला विकून टाकली : इम्तियाज जलील
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM
Share

औरंगाबाद : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी हल्लाबोल केलाय. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस भाजपला विकून टाकली आहे, महापालिकेत निवडून येऊ शकत नाही असा उमेदवार त्यांनी लोकसभेला दिलाय, असं म्हणत इम्तियाज जलील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप केलाय.

काँग्रेसने औरंगाबादमधून विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड यांनी उमेदवारी दिली आहे. हाच धागा पकडत इम्तियाज जलील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. जे लोक महापालिकेच्या निवडणुकीत निवडून येऊ शकत नाहीत अशा लोकांना लोकसभेचं तिकीट दिलंय. त्यामुळे लोकसभेचे निकाल येतील तेव्हा स्पष्ट होईल की काँग्रेसचे दुश्मन हे बाहेरचे नाहीत, तर घरातलेच आहेत, असा घणाघाती आरोप इम्तियाज जलील यांनी काँग्रेसवर केला.

इम्तियाज जलील यांना बहुजन वंचित आघाडीकडून औरंगाबाद लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत जलील यांनी विजय मिळवला होता. औरंगाबादमध्ये मुस्लीम मतदारांची संख्या जास्त असल्याने औरंगाबाद महापालिका निवडणुकीतही जलील यांच्या नेतृत्त्वात एमआयएमचे 25 नगरसेवक निवडून आले होते.

औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून सुभाष झांबड हे मैदानात आहेत. त्यामुळे औरंगाबादच्या जागेसाठी तिरंगी लढत होईल. औरंगाबादसाठी दुसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होईल. या टप्प्यात जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या जागांचाही समावेश आहे.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.