AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MIM : औरंगाबादचे नाव संभाजीनगर केले; ‘एमआयएम’ गुगल मॅपविरोधात आक्रमक, तक्रार दाखल करणार

गुगल मॅपवर (Google Maps) आता औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे दाखवण्यात येत आहे. यामुळे एमआयएम आक्रमक झाले असून, पक्षाच्यावतीने गुगल मॅपविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

MIM : औरंगाबादचे नाव संभाजीनगर केले; 'एमआयएम' गुगल मॅपविरोधात आक्रमक, तक्रार दाखल करणार
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: | Updated on: Jul 20, 2022 | 8:40 AM
Share

मुंबई : सध्या औरंगाबादच्या (Aurangabad) नामांतराचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे करण्याच्या प्रस्तावाला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारने मंजुरी दिली आहे. मात्र औरंगाबादचे नाव बदलण्यास एमआयएमचा विरोध आहे. प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर गुगल मॅपवर (Google Maps) आता औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे दाखवण्यात येत आहे. यामुळे एमआयएम आक्रमक झाले असून, पक्षाच्यावतीने गुगल मॅपविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. बेकायदेशीर कृत्य करणे, सामाजिक भावना दुखावणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे या कलमानुसार तक्रार दाखल करणार असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासोबतच न्यायालय आणि केंद्रीय यंत्रणांकडे देखील तक्रार नोंदवणार असल्याचे एमआयमएमने म्हटले आहे. सुरुवातीला उद्धव ठाकरे सरकारने औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती, तेव्हा देखील एमआएमच्या वतीने विरोध करण्यात आला होता.

महाविकास आघाडीच्या निर्णयाला स्थगिती

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या शेवटच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यामध्ये औरंगाबादचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. मात्र नवे सरकार सत्तेत येताच महाविकास आघाडीच्या या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच पुन्हा औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. पूर्वीचे सरकार अल्पमतात होते, त्यामुळे काही कायदेशीर पेच निर्माण होऊ नयेत, म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते.

एमआएमचा विरोध

औरंगाबादच्या नामंतरणाचा प्रश्न गेल्या 40 वर्षांपासून रखडला होता. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर असे करण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. मात्र या प्रश्नावर कोणताही तोडगा निघत नव्हता. या मुद्द्यावरून अनेकदा राजकारण तापल्याचे देखील पहायला मिळाले. अखेर उद्धव ठाकरे सरकारने आपल्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीमध्ये औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने देखील या प्रस्ताव मंजुरीला विरोध केला नाही. मात्र एमआएमने या प्रस्तावाला विरोध करत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. आता गुगल मॅपवर औरंगाबादऐवजी संभाजीनगर असे नाव दाखवण्यात येत असल्याने एमआएम आक्रमक झाली असून, गुगल मॅपविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

Follow Us
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर