AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापूर आमच्याच वाट्याला, आम्ही निर्णय घेऊ : बाळासाहेब थोरात

महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापूर पालकमंत्रिपदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे (Kolhapur Gaurdian Ministership).

कोल्हापूर आमच्याच वाट्याला, आम्ही निर्णय घेऊ : बाळासाहेब थोरात
| Updated on: Jan 13, 2020 | 5:54 PM
Share

मुंबई : महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापूर पालकमंत्रिपदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे (Kolhapur Gaurdian Ministership). कोल्हापूर काँग्रेसच्याच वाट्याला आलं आहे. कोल्हापूरचा पालकमंत्री कोण होणार यावर आम्हीच निर्णय घेऊ, असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं (Kolhapur Gaurdian Ministership). ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.

बाळासाहेब थोरात म्हणाले, “आम्हाला 12 पालकमंत्रिपदं मिळाले. यात कोल्हापूर काँग्रेसच्या वाट्याला आलं आहे. त्यामुळे कोल्हापूरचा पालकमंत्री कोण असेल याचा आम्ही निर्णय घेऊ. सध्या मी कोल्हापूरचा पालकमंत्री आहे. मात्र, असं असलं तरी माझ्या ऐवजी आमचा कोणताही एक मंत्री कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी घेईल आणि काम करेल. यात काही रागवणं नाही, रुसणं नाही.”

“वाडिया हॉस्पिटलला मदत केली पाहिजे, कॅबिनेटमध्ये हा विषय आणणार”

बाळासाहेब थोरात यांनी वाडिया हॉस्पिटलबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “वाडिया हॉस्पिटलची मोठी रक्कम थकबाकी आहे. त्या रुग्णालयाला मदत केली पाहिजे. त्यासाठी मी हा विषय कॅबिनेट बैठकीत मांडेल.”

नारायण राणे भाजपमध्ये जाऊन अस्वस्थ आहेत. त्यांची अस्वस्थता काय आहे हे मला माहिती आहे, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी राणेंना टोला लगावला.

भारतीय संस्कृतीप्रमाणे गाईवरुन हात फिरवण्याचं महत्त्व आहे. मात्र, त्याला विशेष वेगळं म्हणून पाहायची गरज नाही, असं म्हणत त्यांनी यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्यावरही भाष्य केलं.

“देश अडचणीत नेणाऱ्याची तुलना शिवरायांशी होऊच कशी शकते?”

बाळासाहेब थोरात म्हणाले, “शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं. ते स्वराज्यासोबतच सुराज्यही होतं. इथं मात्र उलटं करण्यात आलं. देश चांगला सुरु होता, त्याला कठीण परिस्थितीत नेण्याचं काम करण्यात आलं. ते करणाऱ्यांची तुलना शिवाजी महाराजांशी होऊच कशी शकते? म्हणून या पुस्तकाचा आम्ही निषेध करतो. भाजपनं ते पुस्तक तर मागं घ्यावंच, पण संपूर्ण देशातील जनतेची माफी मागावी, अशी आमची मागणी आहे.”

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.