अनेक महिलांचे गंभीर आरोप, मीटू प्रकरणात केंद्रातील या मंत्र्याला द्यावा लागला होता राजीनामा; या राज्याशी होतं कनेक्शन
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यापूर्वी, पंतप्रधान मोदींच्या पहिल्या कार्यकाळात एका मंत्र्याला देखील राजीनामा द्यावा लागला होता. आता हा मंत्री कोण होता? जाणून घ्या...

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी राजीनामा दिला आहे. नीट पेपर लीक प्रकरणाचा निषेद दर्शवत जंतर-मंतर येथे लाखो विद्यार्थी जमले होते. त्यांचे आंदोलन गेल्या काही दिवसांपासून सुरु होते. याच दरम्यान प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात धर्मेंद्र प्रधान हे दुसरे मंत्री आहेत, ज्यांनी वादानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याआधी एमजे अकबर यांना राजीनामा द्यावा लागला होता.
मध्य प्रदेशातून राज्यसभा खासदार होते अकबर
देशातील ज्येष्ठ पत्रकार असलेल्या एमजे अकबर यांनी २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. या दरम्यान त्यांना मध्य प्रदेशातून राज्यसभेत पाठवण्यात आले होते. मध्य प्रदेशातून राज्यसभा खासदार झाल्यानंतर त्यांना पंतप्रधान मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात मंत्री बनवण्यात आले होते. एमजे अकबर यांना परराष्ट्र राज्यमंत्री बनवण्यात आले होते. एमजे अकबर जेव्हा मंत्री होते, तेव्हा अनेक महिलांनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.
काय होता वाद?
एमजे अकबर यांच्याविरुद्ध जवळपास 16 महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. या दरम्यान देशभर ‘मी टू’ मोहीम सुरू होती. एमजे अकबर यांच्यावर लावलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर विरोधी पक्ष सातत्याने निशाणा साधत होते. मात्र एमजे अकबर यांनी सर्व आरोप निरर्थक असल्याचे सांगितले होते आणि ते न्यायालयात न्याय मागण्यासाठी जाणार असल्याचे म्हटले होते.
वादानंतर दिला होता राजीनामा
प्रकरण वाढत असल्याचे पाहून एमजे अकबर यांनी १७ ऑक्टोबर २०१८ रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांना ५ जुलै २०१६ रोजी कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी न्यायालयात प्रकरण दाखल केले होते.
पत्रकारातून राजकारणी बनले होते
एमजे अकबर हे देशातील अनेक प्रसिद्ध वर्तमानपत्रांचे संपादक राहिले आहेत. एमजे अकबर १९८९ मध्ये राजकारणात येण्यापूर्वी मीडियामध्ये मोठी हस्ती म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आपले राजकारण काँग्रेसमधून सुरू केले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अकबर भाजपमध्ये सामील झाले होते. त्यानंतर भाजपने त्यांना मध्य प्रदेशातून राज्यसभा सदस्य बनवले आणि नंतर मोदी कॅबिनेटमध्ये जागा मिळाली होती.
