AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिहारमध्ये पुन्हा NDA सत्तेत आल्यास महाराष्ट्रातही सत्ताबदलाच्या हालचाली!, राजकीय विश्लेषकांचा अंदाज, भाजप नेत्यांकडून मात्र इन्कार

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यास महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाईल, अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून केला जात आहे. भाजप नेत्यांनी मात्र या शक्यतेचा इन्कार केला आहे.

बिहारमध्ये पुन्हा NDA सत्तेत आल्यास महाराष्ट्रातही सत्ताबदलाच्या हालचाली!, राजकीय विश्लेषकांचा अंदाज, भाजप नेत्यांकडून मात्र इन्कार
cm uddhav thackeray- devendra fadnavis
sagar joshi
sagar joshi | Updated on: Nov 10, 2020 | 3:36 PM
Share

मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी यावेळी काहीसा उशीर लागण्याची शक्यता आहे. मात्र, आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील NDAचं सरकार येण्याची शक्यता आहे. तर तेजस्वी यादव यांचा RJD आणि काँग्रेसच्या महाआघाडीला पराभवाची चव चाखावी लागू शकते. आताच्या कलानुसार बिहारमध्ये NDAचं सरकार आल्यास भाजपकडून महाराष्ट्रातही सत्तापालटाच्या हालचाली वाढू शकतात, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. तर भाजप नेत्यांकडून मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे स्वत:च्या कर्मानेच पडेल. भाजप त्यासाठी कुठलाही प्रयत्न करणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. (Analysts predict a change of government in Maharashtra if the NDA government comes to power in Bihar)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. पण शिवसेना मुख्यमंत्रीपद देण्यास भाजपने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे शिवसेनेनं भाजपशी फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणं पसंत केलं. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपवर सत्तेपासून दूर राहण्याची वेळ आली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला वर्ष पूर्ण होत आहे. या पूर्ण वर्षभरात महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे भाजपचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांकडून वारंवार करण्यात आला. मात्र, राज्यातील सरकार पाडण्यात आम्हाला स्वारस्य नाही. हे सरकार त्यांच्या कर्मानेच पायउतार होईल, अशी टीका भाजपकडून करण्यात येते.

महाराष्ट्रातही मध्यप्रदेश पॅटर्न?

तिकडे मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपमध्ये प्रवेश देत कमलनाथ सरकार पाडण्यात आलं. तिथे आज होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत भाजप सत्ता राखण्यात यशस्वी ठरताना दिसत आहे. तर बिहारमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार NDAचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास भाजपकडून महाराष्ट्रात ‘ऑपरेशन कमळ’ राबवण्यात येण्याची शक्यता काही राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

काँग्रेसचं नेतृत्व राहुल गांधी यांच्या हातात गेल्यानंतर काँग्रेस महाराष्ट्रातील सत्तेतून बाहेर पडेल. कारण शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास राहुल गांधी तयार नव्हते, असा दावा विश्लेषकांनी केला आहे.  दुसरीकडे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मोठं खातं दिलं जाईल आणि महाराष्ट्रात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं सरकार दिसेल, अशी शक्यता ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी व्यक्त केली आहे. भाजपनं मात्र या शक्यतेचा इन्कार केला आहे. भाजप नेते राम शिंदे, प्रेरणा होनराव, प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा कुठलाही प्रयत्न भाजपनं केला नाही आणि पुढेही करणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राजकीय विश्लेषकांचा अंदाज खरा ठरेल का? हे बिहार विधानसभा निवडणूक निकालानंतरच कळेल.

बिहारचा संपूर्ण निकाल हाती येण्यास मध्यरात्र होणार!

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यास रात्रीचे १२ वाजू शकतात, असा अंदाज निवडणूक आयोगानं व्यक्त केला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी मतमोजणी केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षीच्या निवडणूक निकालासाठी 2 ते 3 तासांचा उशीर लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मतदानासाठी एकूण 1 लाख 6 हजार 526 मतदान केंद्र उभारण्यात आले होते. जे मागील निवडणुकीच्या तुलनेत 63 टक्के अधिक होते. 2015 च्या निवडणुकीत 65 हजार 367 मतदान केंद्र होते. यंदा मतदान केंद्रांची संख्या वाढवल्यामुळं ईव्हीएम मशीनच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे निवडणूक निकालाच्या अंतिम घोषणेला उशीर लागण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

Bihar election result 2020: बिहार विधानसभा निवडणूक निकालाला काहीसा उशीर लागण्याची शक्यता! काय आहे कारण?

Bihar election result 2020: भाजप ‘मोठा भाऊ’ ठरला तरीही मुख्यमंत्री नितीश कुमारच!, भाजप नेते आणि कार्यकर्त्यांकडून स्पष्ट

Bihar Election: थोडी वाट पाहा, बिहारमध्ये महागठबंधनलाच बहुमत मिळणार; राजद नेत्याचा छातीठोक दावा

Analysts predict a change of government in Maharashtra if the NDA government comes to power in Bihar

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या