AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Political Crisis : नितीशकुमारांची शॉक ट्रीटमेंट, राजकीय कोलांटउड्यांचा इतिहास काय?; जाणून घ्या एका क्लिकवर

Bihar Political Crisis : आरजेडी आणि जेडीयूचं सरकार राज्यात 20 महिने चांगलं चाललं. मात्र 2017मध्ये दोन्ही पक्षात पुन्हा वाद सुरू झाले. एप्रिल 2017मध्ये हा वाद अधिकच पेटला. त्यानंतर नितीश कुमार यांनी अत्यंत खुबीने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. कारण विधानसभेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष होता.

Bihar Political Crisis : नितीशकुमारांची शॉक ट्रीटमेंट, राजकीय कोलांटउड्यांचा इतिहास काय?; जाणून घ्या एका क्लिकवर
नितीशकुमारांची शॉक ट्रीटमेंट, राजकीय कोलांटउड्यांचा इतिहास काय?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 10, 2022 | 8:21 AM
Share

पाटणा: जेडीयूचे नेते नितीश कुमार (nitish kumar) यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन भाजपशी (bjp) फारकत घेतली आहे. नितीश कुमार यांच्या या धक्कातंत्रामुळे भाजपला जोर का झटका लागला आहे. नितीश कुमार केवळ भाजपशी फारकत घेऊन थांबले नाहीत तर त्यांनी थेट आरजेडी (rjd), काँग्रेस आणि डाव्या पक्षांशी आघाडी केली आहे. तिन्ही पक्षांना घेऊन नितीश कुमार राज्यात सरकार स्थापन करणार आहेत. त्यामुळे पुढचे अडीच वर्ष भाजपला विरोधात बसावं लागणार आहे. नितीश कुमार यांनी यापूर्वीही अनेक पक्षांना अशी राजकीय शॉक ट्रीटमेंट दिली आहे. राजकीय कोलांट उड्या मारण्याचा नितीश कुमार यांचा इतिहास जुनाच आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा इतिहास माहीत असूनही अनेक राजकीय पक्ष त्यांच्याशी आघाडी करण्यास नेहमीच इच्छूक असतात. त्याला कारण म्हणजे नितीश कुमारांकडील संख्याबळ आणि त्यांची स्वच्छ प्रतिमा. त्यामुळे बिहारमधील कोणताही राजकीय पक्ष त्यांच्या जाळ्यात आपसूक ओढला जातो.

नितीश कुमारांचं धक्कातंत्र कधी कधी

  1. 1994मध्ये नितीश कुमार यांनी आपले जुने मित्र लालूप्रसाद यादव यांची साथ सोडून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. जनता दलमधून बाहेर पडून नितीश कुमार यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत समता पार्टीची स्थापना केली होती. 1995मध्ये त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्या विरोधात आपला पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरवला होता. मात्र, त्यात त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर ते मित्र पक्षाच्या शोधात होते.
  2. त्यावेळी भाजपचं बिहारमधील अस्तित्व नगण्य होतं. मात्र, लालूप्रसाद यादव यांना टक्कर देण्यासाठी नितीश कुमार यांनी 1996मध्ये भाजपशी हातमिळवणी केली. भाजप आणि समता पार्टीची युती 17 वर्ष चालली. 2003मध्ये समता पार्टीचं रुपांतर जनतादल युनायटेडमध्ये झालं. मात्र, तरीही जेडीयूने भाजपची साथ सोडली नाही. विशेष म्हणजे 2005च्या विधानसभा निवडणुकीत या युतीला मोठं यश मिळालं. 2013मध्ये तर या युतीने राज्यात सरकारही स्थापन केलं.
  3. 2013मध्ये भाजपने 2014च्या लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचा उमदेवार म्हणून घोषित केलं. नितीश कुमारांना ते आवडलंन नाही. त्यामुळे त्यांनी भाजपसोबतचा 17 वर्षाचा घरोबा संपुष्टात आणला. मोदी आणि नितीश कुमार यांचे जुने वैचारिक मतभेद आहेत. त्यानंतर नितीश कुमार यांनी आरजेडीशी युती केली. मात्र, लोकसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या पार्टीचा मोठा पराभव झाला. त्यानंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी जेडीयूचे दलित नेते जीतन राम मांझी यांना मुख्यमंत्री बनविण्यात आले. त्यांनंतर नितीश कुमार 2015च्या विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले.
  4. 2014च्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड पराभव झाल्यानंतर 2015च्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांनी लालूप्रसाद यादव आणि काँग्रेसशी हातमिळवणी करून महाआघाडी तयार केली. या निवडणुकीत आरजेडीला जेडीयूपेक्षा अधिक जागा मिळाल्या. त्यानंतरही लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद दिलं. आणि आपला मुलगा तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्री आणि दुसरा मुलगा तेजप्रताप यादव यांना आरोग्य मंत्री बनवलं.
  5. आरजेडी आणि जेडीयूचं सरकार राज्यात 20 महिने चांगलं चाललं. मात्र 2017मध्ये दोन्ही पक्षात पुन्हा वाद सुरू झाले. एप्रिल 2017मध्ये हा वाद अधिकच पेटला. त्यानंतर नितीश कुमार यांनी अत्यंत खुबीने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. कारण विधानसभेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष होता. त्यामुळे भाजपने मध्यावधी निवडणुका घेण्यास नकार देऊन नितीश कुमार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले. विशेष म्हणजे हे सत्तांतर नाट्य अवघ्या 15 तासात घडलं होतं.

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष