AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रशेखर बावनकुळेंवर नागपूर पदवीधर मतदारसंघाची जबाबदारी; भाजपकडून घोषणा

विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर पूर्व विदर्भाच्या प्रचाराची जबाबदारी होती.  (BJP Chandrashekhar Bawankule Get New responsibility) 

चंद्रशेखर बावनकुळेंवर नागपूर पदवीधर मतदारसंघाची जबाबदारी; भाजपकडून घोषणा
| Updated on: Nov 09, 2020 | 1:32 PM
Share

नागपूर : विधानसभा निवडणुकीत डावलले गेलेले भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंवर पक्षाकडून पुन्हा नवी जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकांसाठी नागपूर पदवीधर निवडणूक प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. यापूर्वी विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर पूर्व विदर्भाच्या प्रचाराची जबाबदारी होती.  (BJP Chandrashekhar Bawankule Get New responsibility)

राज्यातील 5 पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांचं बिगुल वाजले आहे. या निवडणुकांसाठी सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळेंवर भाजपकडून नवी जबाबदारी सोपवली आहे. यानुसार बावनकुळेंची नागपूर पदवीधर निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर इतर नेत्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानंतर आता ही नवी जबाबदारी दिल्याने चंद्रशेखर बावनकुळेंचं पक्षात महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार जाहीर

दरम्यान नागपूर पदवीधर मतदारसंघातून विद्यमान महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संदीप जोशी यांनी याआधीच आपण महापालिका निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. विद्यमान आमदार प्रा. अनिल सोले यांची उमेदवारी रद्द करण्यात आली.

“नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी संधी दिली, त्यांचा विश्वास सार्थ ठरवेन. पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करेन. सहा महिन्यांपासून काम सुरु होते. भाजपचा गड कायम राखण्याचा प्रयत्न राहील” अशी ग्वाही  संदीप जोशी यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली.

एक डिसेंबरला निवडणुकीसाठी मतदान

राज्यातील 5 पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांचं बिगुल वाजले आहे. यामध्ये तीन जागा पदवीधर मतदारसंघ तर 2 जागा शिक्षक मतदारसंघाच्या आहेत. या पाच जागांसाठी पुढील महिन्यात (डिसेंबर) 1 तारखेला मतदान होईल तर 3 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहे.

या निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर आहे. 13 नोव्हेंबरला आलेल्या अर्जांची छानणी होणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख 17 नोव्हेंबर आहे. (BJP Chandrashekhar Bawankule Get New responsibility)

संबंधित बातम्या : 

पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार जाहीर, पंकजा मुंडे समर्थकाला औरंगाबादेतून तिकीट

राज्यातही निवडणुकांचा श्रीगणेशा; पदवीधर मतादरसंघांची निवडणूक जाहीर, 1 डिसेंबरला मतदान

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?