AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : सोनिया गांधींवर ज्या कारणाने टीका केली, त्याची पुनरावृत्ती नको म्हणूनच उपमुख्यमंत्री झालो: देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाल्यावर नागपुरात पहिल्यांदाच आले होते. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही होत्या.

Devendra Fadnavis : सोनिया गांधींवर ज्या कारणाने टीका केली, त्याची पुनरावृत्ती नको म्हणूनच उपमुख्यमंत्री झालो: देवेंद्र फडणवीस
फडणवीसांना उपममुख्यमंत्री करून भाजपनं अपमानित केलंय, दिग्विजय सिंह यांनी पुन्हा डिवचलंImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 05, 2022 | 6:58 PM
Share

नागपूर: देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी एकनाथ शिंदे (eknath shinde) सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. फडणवीस यांचं खच्चीकरण करण्यासाठीच भाजप (bjp) नेतृत्वाने हा निर्णय घेतल्याची चर्चा होती. या निर्णयामुळे फडणवीस नाराज असल्याचंही सांगितलं जात होतं. मात्र, या सर्व चर्चांना फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. उपमुख्यमंत्रीपद घेण्यामागचं नेमकं कारण त्यांनी आज उघड केलं. भाजप एक्स्ट्रॉ कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी (गैरसंवैधानिक अधिकार क्षेत्र) बनण्याच्या विरोधात आहे. सोनिया गांधी जेव्हा एक्स्ट्रॉ कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी बनून काम करत होत्या, तेव्हा आम्ही त्यांच्यावर टीका करत होतो. त्यामुळे भाजपमध्ये तसं घडू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला. आमची इच्छा आहे आणि आदेश आहे त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये जा, असं पक्षाने मला सांगितलं. त्यानुसार मी सरकारमध्ये सामिल झालो आणि उपमुख्यमंत्री झालो, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाल्यावर नागपुरात पहिल्यांदाच आले होते. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही होत्या. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली. पक्षाध्यक्ष जेपी नड्डांनी पब्लिक स्टेटमेंट दिलं. सर्वांची इच्छा होती की सरकार बाहेर राहून चालत नाही. एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटीनी सरकार चालवणं योग्य नाही. सरकार चालवायचं असेल तर सरकारमध्ये गेलं पाहिजे. माझ्या वरिष्ठांच्या आज्ञेचं पालन करत निर्णय बदलला आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, असं फडणवीस यांनी सांगितलं.

त्यात कमीपणा नाही

मी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली यात मला कुठलाही कमीपणा नाही. शिंदेंसोबत आम्ही काम केलंय. ते आज आमचे नेते आहेत. त्यामुळे माझं त्यांना संपूर्ण सहकार्य राहणार आहे. आम्ही दोघे मिळून राज्याची जी गाडी पटरीवरून खाली उतरली ती पुन्हा पटरीवर आणू. मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्र नंबरवन करू, असंही त्यांनी सांगितलं.

घरी बसवलं असतं तरी ऐकलं असतं

पक्षाचा आदेश सर्वोच्च होता. कारण याच पक्षाने मला सर्वोच्च पदावर बसवलं. पक्षाने मला सांगितलं असतं तुमची गरज नाही घरी जा. तर मी काहीही न म्हणता मी घरी गेलो असतो. पण त्यांनी तर माझा सन्मान केला. मला उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली. कारण पक्षाला माझी गरज होती, असं ते म्हणाले.

शहा पहाडासारखे उभे राहिले

अमित शहा या काळात आमच्या पाठी पहाडासारखे उभे राहिले. आमच्या खांद्याला खांदा लावून उभे होते. त्यामुळेच आम्ही हे यश मिळवू शकलो. आता हे सरकार अडीच वर्ष चालेल. नव्याने पुन्हा कौल घेऊन आम्ही निवडून येऊ, असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.