AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : शिवसेनेच्या बंडखोरांमध्ये खदखद कधीपासून होती?; फडणवीसांनी सांगितली अंदर की बात!

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूरला आले. यावेळी त्यांचं आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

Devendra Fadnavis : शिवसेनेच्या बंडखोरांमध्ये खदखद कधीपासून होती?; फडणवीसांनी सांगितली अंदर की बात!
शिवसेनेच्या बंडखोरांमध्ये खदखद कधीपासून होती?; फडणवीसांनी सांगितली अंदर की बात!Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 05, 2022 | 6:08 PM
Share

नागपूर: शिवसेनेच्या एक दोन नव्हे तर तब्बल 40 आमदारांनी बंड केलं. एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्यासोबत या आमदारांनी बंड केलं. त्यांच्यासोबत इतर दहा अपक्ष आमदारही आले. हे आमदार सत्ता असूनही अस्वस्थ होते. आपला मुख्यमंत्री असून कामं होत नव्हती. निधी मिळत नव्हता. कोणी विचारत नव्हते. मुख्यमंत्री भेट देत नव्हते. जे लोक कधी लोकांमधून निवडून आले नाहीत, ते लोक अपमानित करत होते. पक्षावर अशा लोकांचं नियंत्रण आलं होतं. शिवाय खात्यांमध्ये इतरांची ढवळाढवळ सुरू होती. या सर्व कारणांमुळे शिवसेनेच्या (shivsena) आमदारांमध्ये खदखद होते. तीच अवस्था अपक्षांची होती. बंडखोर आमदारांनीच ही सल व्यक्त करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मात्र, आमदार अस्वस्थ आहेत आणि त्यांना आपल्याकडे ओढलं पाहिजे हे भाजपच्या कधी लक्षात आलं? आणि भाजपने या आमदारांवर जाळं कसं टाकलं हा प्रश्न सातत्याने उपस्थित होत होता. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी काही अंशी भाष्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूरला आले. यावेळी त्यांचं आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. ढोलताशे वाजवून त्यांची त्यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर त्यांनी जनतेला संबोधित केलं. संध्याकाळी ते प्रेस क्लबमध्ये आले आणि त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांची मनमुराद गप्पा मारल्या. सर्व गोष्टी आज सांगायच्या नाहीत ही सस्पेन्स फिल्म आहे. ती लवकरच तुमच्याकडे येईल. पण एवढंच सांगतो. ही खदखद पहिल्या दोन महिन्यातच माझ्या लक्षात आली. मी त्यावर नजर ठेवून होतो. योग्यवेळी योग्य गोष्टी करणं यालाच राजकारण म्हणतात. असं सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

ती उद्धव ठाकरेंची चूक नाही

काल पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा माईक खेचला होता. त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज माईक खेचला पुढे काय काय खेचतील माहीत नाही, असा टोला लगावला होता. त्याकडे फडणवीस यांचं लक्ष वेधण्यात आलं. तेव्हा त्यांनी पलटवार केला. ते कशाबाबत बोलले ते माहीत नाही. शिंदे आणि आम्ही ज्यावेळी विश्वासमत जिंकलो. तेव्हा मी पहिल्यांदा बोलायला लागलो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून फार वेळा विधानसभेत आले नाही. अर्थात त्यांची ती चूक नाही. जेव्हा मुख्यमंत्री विश्वासमत जिंकतात तेव्हा ते आभाराचं भाषण करतात. बाकी लोक अभिनंदनाचं भाषण करतात. प्रथा, परंपरा म्हणून मी उपमुख्यमंत्री म्हणून भाषण केलं. आम्ही एकमेकांना देणारे आहोत, घेणारे नाहीत. चिंता करू नका, असा चिमटा त्यांनी ठाकरेंना काढला.

आमच्यात ती पद्धत नाही

फडणवीसांच्या पोस्टरवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो गायब होता. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. वरिष्ठ नेत्यांचा फोटो काढणं ही आमच्यात पद्धत नाही. आम्हाला जे काही यश मिळालंय, जे काही आम्ही आहोत ते मोदी आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांमुळेच. मोदींनी केलेल्या कामामुळेच हे यश मिळालं. कार्यकर्ते खुश आहेत. वरिष्ठ नेते पाठिशी नसते तर मी हे करूच शकलो नसतो, असं त्यांनी सांगितलं.

मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार

लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करू. कारण बैठक घ्यायला वेळ मिळाला नाही. मुख्यमंत्री ठाण्याला गेले नव्हते. मी नागपूरला आलो नव्हतो. त्यामुळे आम्ही आपआपल्या जिल्ह्यात आलो. उद्यापरवा बसून टाईमटेबल ठरवू. फॉर्म्युला ठरवू. तुम्हाला सांगू, असं त्यांनी सांगितलं.

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत