AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाच, दहा कोटी रुपयांसाठी भाजपची टोपी? काँग्रेस आमदाराचा हल्लाबोल

कॉंग्रेसच्या फुटलेल्या आमदारांमध्ये काँग्रेसचे रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांच्याभोवती संशयाची सुई फिरत होती. मात्र, आमदार शिरीष चौधरी यांनी यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी फूटलेल्या आमदारांचे नाव जाहीर करून सत्य काय ते जनतेसमोर मांडावे अशी मागणी केली.

पाच, दहा कोटी रुपयांसाठी भाजपची टोपी? काँग्रेस आमदाराचा हल्लाबोल
SHIRISH CHOUDHARI (2)Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Jul 14, 2024 | 9:11 PM
Share

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या सहा आमदारांची मते फुटल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये जळगावातील रावेरचे काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र, आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली. 1931 पासून आमचे कुटुंब काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे. मी गद्दारी करणार नाही. फुटलेल्या आमदारांमध्ये माझे नाव घेऊन माझी बदनामी करून स्वतःची पोळी भाजण्याचा हा प्रकार असल्याची टीका आमदार शिरीष चौधरी यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी संपर्क झालेला नाही. मात्र, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री सतेज पाटील आणि इतर नेत्यांसोबत बोलणे झाले आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये महायुतीचे 9 उमेदवार निवडून आले. तर, महाविकास आघाडीचे तीनपैकी दोन उमेदवार निवडून आले. कॉंग्रेसकडे अतिरिक्त मते असतानाही महाविकास आघाडीचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. तर, भाजपने या विजयावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसची सहा मते फुटल्याचा दावा केला होता.

कॉंग्रेसच्या फुटलेल्या आमदारांमध्ये काँग्रेसचे रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांच्याभोवती संशयाची सुई फिरत होती. मात्र, आमदार शिरीष चौधरी यांनी यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी फूटलेल्या आमदारांचे नाव जाहीर करून सत्य काय ते जनतेसमोर मांडावे अशी मागणी केली.

भाजप खासदार अशोक चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या जवळचा असल्यामुळे मी फुटलो असा आरोप केला जात आहे. मात्र, या गोष्टीत कुठलेही तथ्य नाही. पाच, दहा कोटी रुपयांसाठी त्यांच्या पाया पडायचे म्हणजे हा राजकीय आत्मघात आहे असे शिरीष चौधरी यांनी म्हटलं आहे.

गेल्या वेळीही मी भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, भाजपमध्ये जाण्याचे कुठ्लेळी कारण माझ्याकडे नाही. अनेक पिढ्यांपासून आम्ही काँग्रेस विचारसरणी सोडली नाही. त्यामुळे यापुढेही त्याच विचारसरणीसोबत रहाणार आहे. स्वतःच्या थोड्याशा फायद्यासाठी भाजपची टोपी डोक्यावर घालणार नाही. जे मिळवायचे आहे ते काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मिळवू. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नाही मिळाले तर घरी बसू. मात्र, भाजपमध्ये कदापि जाणार नाही, असे स्पष्टीकरणही आमदार शिरीष चौधरी यांनी दिले.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा