AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपसोबत 25 वर्षे काम केलं, कुणी कायमचा शत्रू नसतो, संजय राऊतांच्या विधानाचा अर्थ काय?

विरोधी पक्षातील सहकाऱ्यांनी आमच्याशी गोड बोलावं, गोड राहावं, गोड हसावं. त्यांनी सरकारबाबात सकारात्मक विचार करावा, एवढ्याच शुभेच्छा आहेत. | Sanjay Raut

भाजपसोबत 25 वर्षे काम केलं, कुणी कायमचा शत्रू नसतो, संजय राऊतांच्या विधानाचा अर्थ काय?
देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत
| Updated on: Jan 14, 2021 | 11:16 AM
Share

मुंबई: मी भाजपला विरोधी पक्षच मानत नाही, ते आमचे सहकारीच आहेत. मुळात राजकारणात कुणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. आहे. आम्ही भाजपसोबत 25 वर्षे जवळून काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याशी शत्रुत्व असण्याचं कारण नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. (Sanjay Raut says BJP is not our enemy)

ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी तुम्ही विरोधी पक्षाला मकरसंक्रांतीच्या काय शुभेच्छा द्याल, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राऊत यांनी नेहमीच्या मिश्किल शैलीत प्रत्युत्तर दिले.

राजकारणात कुणीही कायमचा शत्रू आणि मित्र नसतो. भाजपा सोबत आम्ही पंचवीस वर्ष काम केले आहे. आम्ही त्यांना शत्रू मानायला तयार नाही. जरी विरोधी पक्षात असले तरी ते आमचेच सहकारी आहे. मकरसंक्रांतींच्या दिवशी मी एवढीच अपेक्षा करतो की, विरोधी पक्षातील सहकाऱ्यांनी आमच्याशी गोड बोलावं, गोड राहावं, गोड हसावं. त्यांनी सरकारबाबात सकारात्मक विचार करावा, एवढ्याच शुभेच्छा आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.

राजकारण्यांनी भान ठेवावं, धनंजय मुंडे प्रकरणात संजय राऊतांचं भाष्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांविषयी संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली. तेव्हा संजय राऊत यांनी हे प्रकरण धनंजय मुंडे यांची कौटुंबिक आणि खासगी बाब असल्याचे सांगितले. त्यामुळे यावरुन कोणतेही राजकारण होता कामा नये, असेही त्यांनी म्हटले.

खासगी आणि कौटुंबिक गोष्टी या त्याच पातळीवर सोडवायच्या असतात. त्यामध्ये राजकारण आणायचे नसते. विशेषत: राजकारण्यांनी या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

संबंधित बातम्या:

नैतिकता महत्त्वाची, धनंजय मुंडे प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं भाष्य

धनंजय मुंडेंनी तात्काळ राजीनामा द्यावा; चंद्रकांत पाटलांची मागणी

धनंजय मुंडे यांची आमदारकी धोक्यात आहे का?

(Sanjay Raut says BJP is not our enemy)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.